शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सुविधा नसलेले नागरिकीकरण घातक

By admin | Updated: November 7, 2014 23:34 IST

अकोला येथील राष्ट्रीय अर्थशास्त्र परिपदेत जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांचे प्रतिपादन.

अकोला - पाणीपुरवठा व्यवस्थीत नसणे, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य तर्‍हेने न लावणे, पर्यावरण दक्षता ठेवण्यास हलगर्जी तसेच योग्य सुवीधा नसलेले नागरिकीकरण घातक असल्याचे मत आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी शुक्रवारी येथे आयोजीत परिषदेत व्यक्त केले. नगर आणि महानगरातील झोपडपट्टयांमधील वाढत असलेली लोकसंख्या हा चिंतेचा विषय बनला असून त्यामूळे विषमता वाढत जाण्याचा धोका निर्माण होत असल्याचे चितळे यांनी स्पष्ट केले.श्री शिवाजी महाविद्यालयात तीन दिवसीय मराठी अर्थशास्त्राच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. प्रा. नि. वी. सोवणी यांच्या स्मृतीत आयोजीत नागरीकीकरण का व कसे या विषयावरील व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणूण डॉ. चितळे बोलत होते. पुढे बोलतांना डॉ. चितळे म्हणाले की, पर्यावरणशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र या चार शास्त्रांची सांगड घालून नागरिकीकरण गरजेचे आहे. नागरीकरण योग्य दिशेने व्हावे, त्यांना सुवीधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरांमध्ये स्पर्धा लागण्याची आवश्यकता आहे. मात्र शहरांमध्ये स्पर्धा लावण्यापूर्वी त्याचे मापदंड आणि नियमावली आवश्यक आहे. तामीळनाडूतील कोइंबतूरमध्ये रोजगार निर्मीतीसह विविध सुवीधा उपलब्ध होत असून त्या पाठोपाठ जमशेदपूरमध्येही योग्य नागरिकीकरण होत असल्याचा अभ्यास जागतीक बँकेने सुरु केला आहे. चिनमध्ये ज्या प्रमाणे उत्तम शहरे उत्तम जीवन ही योजना राबविण्यात आली याचा बोध भारतीयांनी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. चितळे यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर विठ्ठल वाघ, जळगाव खांदेश येथील डॉ. श्रीराम जोशी उपस्थित होते. या व्याख्यानासाठी देशातील तब्बल २00 अर्थशास्त्राचे प्राध्यापक व अभ्यासक उपस्थित होते.