शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सुविधा नसलेले नागरिकीकरण घातक

By admin | Updated: November 7, 2014 23:34 IST

अकोला येथील राष्ट्रीय अर्थशास्त्र परिपदेत जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांचे प्रतिपादन.

अकोला - पाणीपुरवठा व्यवस्थीत नसणे, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य तर्‍हेने न लावणे, पर्यावरण दक्षता ठेवण्यास हलगर्जी तसेच योग्य सुवीधा नसलेले नागरिकीकरण घातक असल्याचे मत आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी शुक्रवारी येथे आयोजीत परिषदेत व्यक्त केले. नगर आणि महानगरातील झोपडपट्टयांमधील वाढत असलेली लोकसंख्या हा चिंतेचा विषय बनला असून त्यामूळे विषमता वाढत जाण्याचा धोका निर्माण होत असल्याचे चितळे यांनी स्पष्ट केले.श्री शिवाजी महाविद्यालयात तीन दिवसीय मराठी अर्थशास्त्राच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. प्रा. नि. वी. सोवणी यांच्या स्मृतीत आयोजीत नागरीकीकरण का व कसे या विषयावरील व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणूण डॉ. चितळे बोलत होते. पुढे बोलतांना डॉ. चितळे म्हणाले की, पर्यावरणशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र या चार शास्त्रांची सांगड घालून नागरिकीकरण गरजेचे आहे. नागरीकरण योग्य दिशेने व्हावे, त्यांना सुवीधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरांमध्ये स्पर्धा लागण्याची आवश्यकता आहे. मात्र शहरांमध्ये स्पर्धा लावण्यापूर्वी त्याचे मापदंड आणि नियमावली आवश्यक आहे. तामीळनाडूतील कोइंबतूरमध्ये रोजगार निर्मीतीसह विविध सुवीधा उपलब्ध होत असून त्या पाठोपाठ जमशेदपूरमध्येही योग्य नागरिकीकरण होत असल्याचा अभ्यास जागतीक बँकेने सुरु केला आहे. चिनमध्ये ज्या प्रमाणे उत्तम शहरे उत्तम जीवन ही योजना राबविण्यात आली याचा बोध भारतीयांनी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. चितळे यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर विठ्ठल वाघ, जळगाव खांदेश येथील डॉ. श्रीराम जोशी उपस्थित होते. या व्याख्यानासाठी देशातील तब्बल २00 अर्थशास्त्राचे प्राध्यापक व अभ्यासक उपस्थित होते.