शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
2
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
3
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
4
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
5
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
6
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
7
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
8
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
9
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
10
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
11
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
12
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
13
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
14
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
15
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
16
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
17
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
18
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणं; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
19
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
20
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी, उन्हाळी पिकांना धरणातून पाणी पुरवठा बंद; पिके आली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 18:56 IST

अकोला : पश्चिम विदर्भात यावर्षी कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर झाला असून, ज्या शेतकºयांनी पेरणी केली, त्यांना पिके जगविण्यासाठी पराकोटीची धडपड करावी लागत आहे. बहुतांश भागात भूगर्भ पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकºयांना संरक्षित ओलितासाठी पाणी नाही.

- राजरत्न सिरसाटअकोला : पश्चिम विदर्भात यावर्षी कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर झाला असून, ज्या शेतकºयांनी पेरणी केली, त्यांना पिके जगविण्यासाठी पराकोटीची धडपड करावी लागत आहे. बहुतांश भागात भूगर्भ पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकºयांना संरक्षित ओलितासाठी पाणी नाही. जेथे थोडेफार पाणी तसेच वीज उपलब्ध आहे, तेथील शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पिके जगविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.  खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन हातचे गेल्याने शेतकºयांची भिस्त रब्बी हंगामावर होती; पण परतीचा दमदार पाऊस न झाल्याने जमिनीत पूरक ओलावाच नव्हता. परिणामी, पश्चिम विदर्भातील एकूण रब्बीच्या क्षेत्रापैकी ३६ टक्के क्षेत्र नापेर आहे. ज्या शेतकºयांनी पेरणी केली, त्यांना आता पिके जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील धरणात यावर्षी पूरक जलसाठा संचयित झाला नसल्याने हिवाळी, उन्हाळी पिकांना पाणी न सोडण्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केल्याने शेतकरी हतबल झाला.   यावर्षी पश्चिम विदर्भात ९१ टक्के क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली. अकोला जिल्ह्यातील शेतकºयांनी ४८,१४७ पेरणी केलेल्या क्षेत्रापैकी ४६,३५९ हेक्टरवर हरभरा पेरणी केली. बुलडाणा जिल्ह्यात ९१ हजार १३६ हेक्टरवर हरभरा पेरणी करण्यात आली असून, वाशिम जिल्ह्यात ३४,४४४ हेक्टरवर, यवतमाळ जिल्ह्यात ७६,३४३ तर अमरावती जिल्ह्यात ६२ हजार २६४ हेक्टरवर हरभरा पेरणी केली. हरभरा पिकाला जमिनीत ओलावा बºयापैकी लागतो, त्यानंतर हिवाळ्यातील थंडीमुळे हे पीक येते. तथापि, हरभरा पेरणीनंतर पंधरा दिवस ढगाळ वातावरण होते. त्याचा प्रतिकूल परिणाम या पिकावर झाल्याचे चित्र आहे. ज्या शेतकºयांकडे संरक्षित ओलिताची सोय आहे, तेथे पाणी देऊन हरभरा जगविण्याचे शेतकºयांचे प्रयत्न सुरू  आहेत; पण बहुतांश शेतकºयांकडे पाण्याची सोय नाही.

 कृषी विद्यापीठातील हरभरा तुषार सिंचनावर!डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर हरभरा पेरणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हरभºयाचे बीजोत्पादन घेण्यासाठी कृषी विद्यापीठाने हरभरा पेरणी केली; पण जमिनीत ओलावा नसल्याने कृषी विद्यापीठाला तुषार सिंचनावर हे पीक जगवावे लागत आहे.

शेतकºयांकडे संरक्षित ओलितासाठी पाणी उपलब्ध असेल, तर त्या पाण्याचे नियोजन करावे, पाण्याच्या उपलब्धतेनुसार क्षेत्र ठरवावे, तेवढ्याच क्षेत्राला पाणी द्यावे.- डॉ. सुभाष टाले,विभाग प्रमुख,मृद व जलसंधारण,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola Ruralअकोला ग्रामीणagricultureशेती