शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

पेरण्या उलटण्याचा धोका; शेतकरी चिंतेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 13:44 IST

आणखी काही दिवस पावसाने हजेरी लावली नाही, तर खरीप पेरण्या उलटण्याचा धोका निर्माण झाल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे

ठळक मुद्दे२ लाख ७८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर (५८ टक्के) खरीप पिकांची पेरणी आटोपली.दमदार पाऊस बरसला नसल्याने, जमिनीत ओलावा कमी आहे. दुपारच्या वेळी तापत्या उन्हामुळे उगवलेली पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत.

- संतोष येलकर अकोला : जिल्ह्यात ९ जुलैपर्यंत २ लाख ७८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर (५८ टक्के) खरीप पेरण्या आटोपल्या असल्या तरी, सार्वत्रिक दमदार पावसाअभावी जमिनीत ओलावा कमी असल्याने, उगवलेली पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस पावसाने हजेरी लावली नाही, तर खरीप पेरण्या उलटण्याचा धोका निर्माण झाल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस केव्हा बरसणार, याबाबत शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.जिल्ह्यात सरासरी ४ लाख ८० हजार ५२० हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून, त्यादृष्टीने कृषी विभागामार्फत खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा पावसाळा सुरू झाल्यानंतर २० दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पेरण्या सुरू होण्यास विलंब झाला. जिल्ह्यात अद्यापही सार्वत्रिक जोरदार पाऊस बरसला नसून, कुठे कमी तर कुठे जास्त रिमझिम बरसलेल्या पावसात ९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यांत २ लाख ७८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर (५८ टक्के) खरीप पिकांची पेरणी आटोपली. पेरणीनंतर सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने, जमिनीत ओलावा कमी असून, दुपारच्या वेळी तापत्या उन्हामुळे उगवलेली पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आणखी काही दिवसांत जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पावसाने हजेरी लावली नाही, तर खरीप पेरण्या उलटण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने दुष्काळी परिस्थितीत खरीप पेरणीवर केलेला खर्च पाण्यात तर नाही जाणार, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे सार्वत्रिक दमदार पाऊस केव्हा बरसणार, याबाबत जिल्ह्यातील शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.जिल्ह्यात अशी झाली खरीप पेरणी!पीक                      पेरणी (हेक्टर)कापूस                    १०२६७३सोयाबीन               ११२६४५तूर                         ३४४८८मूग                        १२१८०उडीद                      ९१८५ज्वारी                     ७५३८तीळ                          १४७..................................................एकूण                    २७८८५६दुबार पेरणीचे सावट; शेतकºयांपुढे प्रश्न!पेरणीनंतर उगवलेली पिके जमिनीत ओलावा कमी असल्याने, कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आणखी काही दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे सावट निर्माण झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकºयांनी खरीप पेरणीवर खर्च केला; मात्र आता दुबार पेरणीचा खर्च भागविणार कसा, असा प्रश्न शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे.दाटून येणारे ढग बसणार केव्हा? शेतकºयांचे डोळे आभाळाकडे!दररोज आकाशात काळेभोर ढग दाटून येतात, पावसाचे वातावरणही तयार होते; परंतु पाऊस पडत नाही. त्यामुळे दाटून येणारे ढग बरसणार केव्हा आणि जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस होणार केव्हा, यासंदर्भात प्रतीक्षा करणाºया शेतकºयांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस