शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

नेर-धामणा बॅरेज : भूमीगत जलवाहिनीच्या कामाची किंमत गेली ७० वरून दिडशे कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 3:51 PM

अकोला : पाटबंधारे विभागाच्या अनास्थेचा परिणाम जिल्ह्यातील पथदर्शी नेरधामणा बॅरेजवर झाला आहे.मागील ९ वर्षापासून बॅरेजची कामे अर्धवटच आहेत. बांधकामाधीन अनेक कामे तर प्रलबिंत आहेतच भविष्यात करावयाच्या कामाबाबत अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने या बॅरेजचे भविष्य अधातंरी लटकले आहे.

ठळक मुद्देपाटचाऱ्या आता बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्याने सिंचनासाठी जलवाहीनीव्दारे पाणी सोडले जाणार आहे. निविदेसाठी विंलब होत असल्याने ७० कोटी रू पये मूळ किमत असलेल्या या भूमीगत सिंचन जलवाहीनीच्या कामाची किंमत आता दिडशे कोटी रू पयांवर गेली आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : पाटबंधारे विभागाच्या अनास्थेचा परिणाम जिल्ह्यातील पथदर्शी नेरधामणा बॅरेजवर झाला आहे.मागील ९ वर्षापासून बॅरेजची कामे अर्धवटच आहेत. बांधकामाधीन अनेक कामे तर प्रलबिंत आहेतच भविष्यात करावयाच्या कामाबाबत अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने या बॅरेजचे भविष्य अधातंरी लटकले आहे.पाटचाऱ्या आता बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्याने सिंचनासाठी जलवाहीनीव्दारे पाणी सोडले जाणार आहे. नेरधामणा बॅरेज प्रकल्पाच्या या कामाच्या निविदेसाठी विंलब होत असल्याने ७० कोटी रू पये मूळ किमत असलेल्या या भूमीगत सिंचन जलवाहीनीच्या कामाची किंमत आता दिडशे कोटी रू पयांवर गेली आहे. विशेष म्हणजे या पाईपलाईन प्रणालीव्दारे ३० टक्के पाण्याची बचत होते.त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ करणे गरजेचे आहे त्याचे कोणतेही काम झालेले नाही. ३० टक्के बचत होणाºया पाण्यामुळे निंबोरा,पाळोदी इत्यादी मागणी असलेल्या गावांचा या लाभ क्षेत्रात समावेश करता येईल पण ते करणार कोण असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे. तसेच यासाठी लागणाºया पंपीग मशीनची चाचणी घेऊन उच्च दाबाने शेतापर्यंत पणी पोहोचण्यात सक्षम आहे का याची खात्री करावी लागणार आहे. कारण ठिबक व तुषार सिंचनाने पिकांना पाणी देण्यासाठी २ ते ३ किलोग्रॅम प्रती सेमी. स्केवअर एवढा दाब शेतात मिळणे आवश्यक आहे. बॅरेजस्थळी जाण्यासाठी रस्ता नाही तर बॅरेजच्या गेटचे संचालन कसे करणार हा प्रश्न आहे. त्यासाठी फ्लड झोनचे काम करणे गरजेचे होते पण तेही झाले नाही.पाणीपुरवठ्यासाठी येथे विद्युतपुरवठा आवश्यक आहे त्यासाठी ३३ केव्ही उपकेंद्र उभारणीच्या कामाचे काय झाले हा प्रश्न अनुत्तरीत आहे.धामणा व नेर गावांच्या सुरक्षीततेसाठी या गावालगत घाट बांधून दोन गावांना जोडणाºया बाधीत रस्त्याची पूर्नस्थापना करावी लागणार असून, नदीचे पात्र रूद झाल्याने पुराच्या प्रवाहाची दिशा पावसाळ््यात बदलते असते. त्यामुळे या भागातील शेकडो हेक्टर शेतातील पिके व जमिन खरडून जाण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. या पुराच्या प्रवाहाची दिशा बदलने गरजेचे आहे त्यासाठी जमिनीचे संपादन करू न त्याचा मोबदला संबधिताना द्यावा लागेल पण अद्याप एकाही कामाखा मूहुर्त निघाला नाही. पानेटव इतर तिर्थक्षेत्र या बॅरेजच्या बुडीत क्षेत्रात जात असल्याने ही तिर्थक्षेत्र योग्य ठिकाणी स्थलांतरीत करू न घाट बांधावा लागणार आहे. बुडीत क्षेत्रातील वाहिन्या बाहेर काढणे,उपनद्यावरील पूल रस्त्याची पुर्नस्थापना करावी लागणार आहे. 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाNer-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेज