शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

भावी पिढीसाठी पाणी व वातावरण शुद्ध ठेवणे गरजेचे! -जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय  

By atul.jaiswal | Updated: March 16, 2018 16:54 IST

अकोला: पाण्याचा साठा मर्यादीत असल्यामुळे भविष्यात पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवु शकतो. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने भविष्यात शुध्द वातावरण मिळणे कठिण होवू शकते, हा धोका लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या पुढील पिढीसाठी पाण्याचे पुनर्भरण करणे तसेच वृक्ष लागवड करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.

ठळक मुद्देजलसंपदा विभाग अकोला,अकोला सिंचन मंडळ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जल जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. पाण्याचे पुनर्भरण करणे तसेच वृक्ष लागवड करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले. चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.

अकोला: पाण्याचा साठा मर्यादीत असल्यामुळे भविष्यात पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवु शकतो. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने भविष्यात शुध्द वातावरण मिळणे कठिण होवू शकते, हा धोका लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या पुढील पिढीसाठी पाण्याचे पुनर्भरण करणे तसेच वृक्ष लागवड करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिसरात जिल्हा नियोजन भवनामध्ये जलसंपदा विभाग अकोला,अकोला सिंचन मंडळ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जल जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जिल्हापरिषदेचे कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, अकोला पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कार्यकारी अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता जलसंधारण श्री बोके, पाटबंधारे विभागाच्या संशोधन विभागाच्या कार्यकारी अभियंता रश्मी देशमुख, पाटबंधारे विभागाच्या प्रकल्प अन्वेषन विभागाच्या कार्यकारी अभियंता आशालता महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.जागतीक जलदिन २२ मार्च रोजी साजरा करण्यात येतो या जलदिनाचे औचित्य साधुन जलजागृती सप्ताहाचे आयोजन १६ ते २२ मार्च पर्यंत शासनाच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती अकोला पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई यांनी दिली.कार्यक्रमाचे संचालन पाटबंधारे विभागाचे अरविंद भोंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी मानले यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी , कर्मचारी,पाणीवापर संस्थेचे प्रतिनिधी, शेतकरी व नागरीक उपस्थित होते.पाणी जपून वापरा - जितेंद्र वाघयावर्षी अपुऱ्या पावसाळयामुळे शहराला पाणी पुरवठा करणा-या महान धरणामध्ये अत्यंत अल्प पाणीसाठा आहे. हे लक्षात घेवून शहरवाशीयांनी पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने केला पाहिजे असे आवाहन मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले. जलसप्ताहाच्या निमित्याने मनपाव्दारे वाटर मीटर लावणे , अवैध नळ कनेक्शन वैध करणे तसेच पाईपलाईनेच लिकेज दुरूस्ती करणे यासारखे कामे करण्यात येणार आहे, या कामी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

चित्ररथाचे उद्घाटनजनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. सदर चित्ररथ धरणाच्या लाभ क्षेत्रात व गावा गावात फिरणार आहे. यामुळे जलवापराबाबत जनजागृती होईल अशी अपेक्षा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय