शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

नापिकीने कोलमडले तेल्हारा तालुक्यातील शेतकर्‍यांचे बजेट! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 01:56 IST

दिवसरात्र हाडाचं पाणी करून सुखी जीवनाचे स्वप्न रंगविणार्‍या शेतकर्‍यांच्या नशिबी मात्र यावर्षी कोणत्याच पिकाने साथ न दिल्याने घरातील सदस्यांचे लग्नसमारंभ तर दूरच पण साधी बियाणे व फवारणी औषधीची उधारी देण्याइतपत उत्पन्नही न झाल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात मनोधैर्य खचल्याचे विदारक चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

ठळक मुद्देलग्नसमारंभ पडले लांबणीवर तेल्हारा तालुक्यातील वास्तव 

अनिल अवताडे । लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : शेतकर्‍यांच्या बारा महिन्याच्या उदरनिर्वाहाची, मुलांच्या शिक्षणाची, घरातील सदस्यांच्या लग्नसमारंभाची, घरातील इतर खर्चाची तरतूद यासह जीवनातील आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी शेतकर्‍यांची नजर ही शेतातून येणार्‍या कापूस, सोयाबीन, उडीद, ज्वारी या मुख्य पिकांकडे लागलेली असते. त्याकरिता दिवसरात्र हाडाचं पाणी करून सुखी जीवनाचे स्वप्न रंगविणार्‍या शेतकर्‍यांच्या नशिबी मात्र यावर्षी कोणत्याच पिकाने साथ न दिल्याने घरातील सदस्यांचे लग्नसमारंभ तर दूरच पण साधी बियाणे व फवारणी औषधीची उधारी देण्याइतपत उत्पन्नही न झाल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात मनोधैर्य खचल्याचे विदारक चित्र तेल्हारा तालुक्यात दिसून येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत होते. त्यामध्ये जुन्या कापसाचा जीन काढून त्यातून निघालेली सरकी, आधीच्या वर्षाच्या पिकातून ज्वारी, उडीद, मूग, सुरक्षित ठेवून त्याचा पेरणीकरिता वापर केला जात असे. रासायनिक औषधांचे नावही शेतकर्‍यांना माहीत नव्हते. पेरणीपुरताच रासायनिक खताचा वापर केला जात असे. अशाही परिस्थितीत कमी खर्चात समाधानकारक उत्पन्नाची सांगड लावण्यात शेतकरी यशस्वी होत होते; परंतु काळ बदलत गेला, नवनवीन कंपनीचे बियाणे शेतकर्‍यांनी स्वीकारले. त्यामध्ये मुख्य पीक असलेल्या कापसाकरिता बीटी बियाण्याचा स्वीकार शेतकर्‍यांनी केला. याव्यतिरिक्त रासायनिक महागडे बियाणे विकत घेऊन उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आणि त्यात यशस्वी झाले. आजही तीच परंपरा कायम आहे. याही वर्षी महागडे बीटी कापसाचे बियाणे शेतकर्‍यांनी घेतले. एकरी चार-पाच पोते रासायनिक खत, कीटकनाशकांचे महागडे फवारे, निंदण, रखवाली यासह एकरी ३0 हजार रुपये खर्च जमिनीत टाकला. सुरुवातीला शेतातील पीक जसजसे बहरत गेले, तशा उत्पन्नाच्या आशा पल्लवित होत गेल्या; परंतु सोयाबीन, उडीद व मुगाच्या परिपक्वतेच्या काळात निसर्गाने शेतकर्‍यांची साथ सोडली. पर्‍हाटीच्या बोंड्या फुटण्याआधीच परतीच्या पावसाने कहर केला. त्यामुळे तोंडी आलेला घास हिरावल्या गेला. आजपर्यंत कधी न आलेली एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील बोंडअळी पर्‍हाटीला नेस्तनाबूद करून, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस उलंगवाडी पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकर्‍यांनी अनुभवली.

शेतकर्‍यांचे मनोधैर्य खचले जमिनीला पेरणीपासून तर आतापर्यंतचा खर्चही न निघाल्याने शेतकर्‍यांचे बजेट कोलमडले. ज्या पिकाच्या भरवशावर शेतकर्‍यांनी कुटुंबातील सदस्यांच्या लग्नसमारंभाची योजना आखली ते पीकच आले नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी लग्नसमारंभ पुढे ढकलले.  मुलांच्या उज्‍जवल भविष्यासाठी आपल्या मुलांना शहरात शिक्षणाकरिता भाड्याने खोली घेऊन राहण्याकरिता लागणारा खर्च, उधारीवर घेतलेले बियाणे, रासायनिक फवारे याची बाकी असलेली उधारी, बारा महिन्याचा खर्च, कर्जमाफीचा गुंता अजूनही कायम असून, पुढील वर्षाची करावी लागणारी पेरणी, गुरांना लागणारा चारा, कुटुंबाचा दवाखाना खर्च, यासह जीवनावश्यक असणार्‍या कोणत्याच बाबींची पूर्तता या वर्षीच्या पिकातून होण्याची आशा मावळल्याने शेतकर्‍यांचे मनोधैर्य खचल्याचे भयाण वास्तव दिसून येत आहे.

टॅग्स :Telharaतेल्हाराcottonकापूस