शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

नापिकीने कोलमडले तेल्हारा तालुक्यातील शेतकर्‍यांचे बजेट! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 01:56 IST

दिवसरात्र हाडाचं पाणी करून सुखी जीवनाचे स्वप्न रंगविणार्‍या शेतकर्‍यांच्या नशिबी मात्र यावर्षी कोणत्याच पिकाने साथ न दिल्याने घरातील सदस्यांचे लग्नसमारंभ तर दूरच पण साधी बियाणे व फवारणी औषधीची उधारी देण्याइतपत उत्पन्नही न झाल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात मनोधैर्य खचल्याचे विदारक चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

ठळक मुद्देलग्नसमारंभ पडले लांबणीवर तेल्हारा तालुक्यातील वास्तव 

अनिल अवताडे । लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : शेतकर्‍यांच्या बारा महिन्याच्या उदरनिर्वाहाची, मुलांच्या शिक्षणाची, घरातील सदस्यांच्या लग्नसमारंभाची, घरातील इतर खर्चाची तरतूद यासह जीवनातील आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी शेतकर्‍यांची नजर ही शेतातून येणार्‍या कापूस, सोयाबीन, उडीद, ज्वारी या मुख्य पिकांकडे लागलेली असते. त्याकरिता दिवसरात्र हाडाचं पाणी करून सुखी जीवनाचे स्वप्न रंगविणार्‍या शेतकर्‍यांच्या नशिबी मात्र यावर्षी कोणत्याच पिकाने साथ न दिल्याने घरातील सदस्यांचे लग्नसमारंभ तर दूरच पण साधी बियाणे व फवारणी औषधीची उधारी देण्याइतपत उत्पन्नही न झाल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात मनोधैर्य खचल्याचे विदारक चित्र तेल्हारा तालुक्यात दिसून येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत होते. त्यामध्ये जुन्या कापसाचा जीन काढून त्यातून निघालेली सरकी, आधीच्या वर्षाच्या पिकातून ज्वारी, उडीद, मूग, सुरक्षित ठेवून त्याचा पेरणीकरिता वापर केला जात असे. रासायनिक औषधांचे नावही शेतकर्‍यांना माहीत नव्हते. पेरणीपुरताच रासायनिक खताचा वापर केला जात असे. अशाही परिस्थितीत कमी खर्चात समाधानकारक उत्पन्नाची सांगड लावण्यात शेतकरी यशस्वी होत होते; परंतु काळ बदलत गेला, नवनवीन कंपनीचे बियाणे शेतकर्‍यांनी स्वीकारले. त्यामध्ये मुख्य पीक असलेल्या कापसाकरिता बीटी बियाण्याचा स्वीकार शेतकर्‍यांनी केला. याव्यतिरिक्त रासायनिक महागडे बियाणे विकत घेऊन उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आणि त्यात यशस्वी झाले. आजही तीच परंपरा कायम आहे. याही वर्षी महागडे बीटी कापसाचे बियाणे शेतकर्‍यांनी घेतले. एकरी चार-पाच पोते रासायनिक खत, कीटकनाशकांचे महागडे फवारे, निंदण, रखवाली यासह एकरी ३0 हजार रुपये खर्च जमिनीत टाकला. सुरुवातीला शेतातील पीक जसजसे बहरत गेले, तशा उत्पन्नाच्या आशा पल्लवित होत गेल्या; परंतु सोयाबीन, उडीद व मुगाच्या परिपक्वतेच्या काळात निसर्गाने शेतकर्‍यांची साथ सोडली. पर्‍हाटीच्या बोंड्या फुटण्याआधीच परतीच्या पावसाने कहर केला. त्यामुळे तोंडी आलेला घास हिरावल्या गेला. आजपर्यंत कधी न आलेली एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील बोंडअळी पर्‍हाटीला नेस्तनाबूद करून, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस उलंगवाडी पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकर्‍यांनी अनुभवली.

शेतकर्‍यांचे मनोधैर्य खचले जमिनीला पेरणीपासून तर आतापर्यंतचा खर्चही न निघाल्याने शेतकर्‍यांचे बजेट कोलमडले. ज्या पिकाच्या भरवशावर शेतकर्‍यांनी कुटुंबातील सदस्यांच्या लग्नसमारंभाची योजना आखली ते पीकच आले नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी लग्नसमारंभ पुढे ढकलले.  मुलांच्या उज्‍जवल भविष्यासाठी आपल्या मुलांना शहरात शिक्षणाकरिता भाड्याने खोली घेऊन राहण्याकरिता लागणारा खर्च, उधारीवर घेतलेले बियाणे, रासायनिक फवारे याची बाकी असलेली उधारी, बारा महिन्याचा खर्च, कर्जमाफीचा गुंता अजूनही कायम असून, पुढील वर्षाची करावी लागणारी पेरणी, गुरांना लागणारा चारा, कुटुंबाचा दवाखाना खर्च, यासह जीवनावश्यक असणार्‍या कोणत्याच बाबींची पूर्तता या वर्षीच्या पिकातून होण्याची आशा मावळल्याने शेतकर्‍यांचे मनोधैर्य खचल्याचे भयाण वास्तव दिसून येत आहे.

टॅग्स :Telharaतेल्हाराcottonकापूस