शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुंबई विद्यापीठाचे नामांतर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करा - मधूकरराव कांबळे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 3:33 PM

अकोला : मुंबई विद्यापीठाचे नामातंर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करावे, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)मधूकरराव कांबळे यांनी शुक्रवारी येथे दिली.

ठळक मुद्दे शुक्रवार,१५जून रोजी कांबळे यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केली. शासनाने साडेसहाशे कोटीची तरतूद केली असून, हे भव्य स्मारक मुंबईतील घाटकोपर भागातील चिराग नगर येथे साकारणार आहे.याचा आराखडा लवकरच तयार करणार असून, त्याअगोदर चिराग नगरातील लोकांचे इमारतीमध्ये पूर्नवसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अकोला : मुंबई विद्यापीठाचे नामातंर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करावे, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)मधूकरराव कांबळे यांनी शुक्रवारी येथे दिली. त्यांनी मुंबईतील घाटकोपर भागात अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक सरकार उभारणा असल्याचेही सांगितले.मुंबई विद्यापीठाला मॉ जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली असून, त्यांनतर लगेचच शुक्रवार,१५जून रोजी कांबळे यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केली. यासंदर्भात नामातंराच्या नव्या वादाला ही सुरू वात समजायची का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता मुंबई विद्यापिठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची आमची जुनीच मागणी असल्याचे कांबळे यांनी सांगितले. संयुक्त महाराष्ट्रचा आवाज अण्णाभाऊ साठे यांनी बुलंद केला. कामगार,कष्टकरी,समतावादी चळवळ उभी केली. भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबध त्यांनी दृढ केले. त्यांच्या अजरामर साहित्याने समाज जागृती केली,या भूमीपुत्राचे नाव मुंबई विद्यापीठाला दिल्यास विद्यापीठाचा गौरव वाढणारा आहे. म्हणून ही आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे हा वादाचा विषयच नसल्यसाचे त्यांनी अधोरेखित केले. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक बांधण्यासाठी शासनाने साडेसहाशे कोटीची तरतूद केली असून, हे भव्य स्मारक मुंबईतील घाटकोपर भागातील चिराग नगर येथे साकारणार आहे. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय  ग्रंथालय,राष्ट्रीय व राज्य लोकसेवा आयोगाची विद्यार्थ्यांना पूर्व तयार करता यावी म्हणून, निवासी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल.वातानुकूलीत सभागृह, मुला-मुलीचे वसतीगृही येथे असेल. याचा आराखडा लवकरच तयार करणार असून, त्याअगोदर चिराग नगरातील लोकांचे इमारतीमध्ये पूर्नवसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.आरक्षणाच्या मुद्दयावर त्यांनी आरक्षण अनुसूचित जातीतील एकाच मोठ्या वर्गाला मिळाले असल्याचा आरोप करीत आरक्षणाचे वर्गीकरण करू न अनुसचित जातीतील शेवटच्या घटकापर्यंत हे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठीची मागणी अनेकवर्षापासून करतो आहे. याकरिता अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार आरक्षण असावे, यासाठीचा आमचा संघर्ष यापुढेही सुरू राहणार असल्याने त्यांनी सांगितले. जळगाव जिल्हयात दलित (मांतग)समाजाच्या मुलांनी विहिरीत आंघोळ केली म्हणून मारहाण करण्यात आली.

दलितावरील अत्याचार आणि सरकारचा संबध नाही 

दलितावरील अन्यायाचे प्रकार या सरकारमध्ये वाढले आहेत, या प्रश्नावर बोलताना त्यांनी अन्याय अत्याचार आणि सरकारचा यात काहीच संबध नसल्याचे सांगत, दलितावरील अत्याचर हजारोवर्षापासून सुरू आहेत. याचा सरकारशी संबध नसतो, यापुर्वीच्या सरकारमध्येही अत्याचार झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाMumbai Universityमुंबई विद्यापीठ