शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

मूर्तिजापूर : एसटीच्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 7:29 PM

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या एसटी कर्मचारी संघटानांनी धनत्रयोदशीपासून सुरू केलेल्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍यांनी या संधीचा फायदा घेऊन दिवाळी साजरी केल्याचे म्हटल्या जात आहे.

ठळक मुद्देधनतेरसच्या दिवशी एसटीच्या तिजोरीत खडखडाटखासगी वाहतूकदारांनी उचलला संपाचा फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : दीपावलीच्या पर्वावर आपल्या गावाकडे परतणार्‍या चाकरमान्यांसह सासरहून माहेरी जाणार्‍या नवविवाहिता, विवाहितांसह मामाच्या गावाला जाण्याची ओढ असलेल्या बच्चे कंपनीमुळे बसस्थानके गर्दीने फुलून जातात. एसटी विभागाच्या उत्पन्नातील घट भरून काढण्यास दीपावली सणानिमित्त प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या वाढणार्‍या गर्दीचा मोठा हातभार लागतो. प्रवासी सर्वात पहिली पसंती एसटी प्रवासालाच देतात. त्यामुळे एसटीने आपले स्थान प्रवासी वर्गात टिकवून ठेवले आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या एसटी कर्मचारी संघटानांनी धनत्रयोदशीपासून सुरू केलेल्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍यांनी या संधीचा फायदा घेऊन दिवाळी साजरी केल्याचे म्हटल्या जात आहे.एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने स्थानिक बसस्थानकावरून सुटणार्‍या बसफेर्‍या सकाळपासून बंद होत्या. मूर्तिजापूर येथे मुंबई-हावडा लोहमार्गाचे जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे कारंजा, दारव्हा, यवतमाळ, दर्यापूर, अंजनगावसह तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील प्रवाशांची येथे मोठी गर्दी झाली होती. एसटीचा संप असल्याने या प्रवाशांची तारांबळ उडाली व मनस्ताप सहन करावा लागला. खासगी वाहनाने घर गाठण्याकरिता दुप्पट तिकीट द्यावे लागले. संपामुळे बसस्थानकावर शुकशुकाट होता. खासगी वाहतूकदारांनी या संधीचा फायदा करून घेतला. कारंजा, दर्यापूर या ठिकाणी जाण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागल्याचे प्रवाशांनी सांगितले. संपूर्ण कुटुंबासह गावाकडे जाणार्‍या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. सदर संपामुळे मूर्तिजापूर आगाराच्या ६0 पेक्षा अधिक बसफेर्‍या रद्द झाल्या. दररोज विविध ठिकाणांवरून येणार्‍या-जाणार्‍या २00 पेक्षा अधिक बसफेर्‍या रद्द झाल्या. दीपावलीच्या सणानिमित्त ग्रामीण भागातून खरेदीकरिता येणारे गावकरी, शाळकरी, विद्यार्थी यांची कुचंबणा झाली. आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ झाली पाहिजे, त्यांच्या समस्यांचा निपटारा झाला पाहिजे; परंतु दीपावली या महत्त्वपूर्ण सणाच्या काळात संप करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न प्रवासी वर्गात चर्चिल्या जात होता. 

दिवाळीचा सण गावावरून मुलगा, मुलगी, नातू, भाऊ, बहीण, आत्या, मावशी, काका-काकू अशी नात्यातील माणसे येणार म्हणून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे; परंतु ऐनवेळी एसटीचा बेमुदत संप सुरू झाल्याने सणासाठी नात्यातील माणसे वेळेवर पाोहोचतात की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एसटीच्या संपामुळे खासगी वाहतूकदारांचा फायदा होत आहे.- श्रीकृ ष्ण रा. गवई, प्रवासी, खापरवाडा.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ