शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

मुकीम अहमद व शेख शफी हत्या प्रकरण; पैशाचा पाऊस उठला दोघांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 12:38 IST

 अकोला - राज्यातील विविध घनदाट जंगलांमध्ये रात्रीला कथितरित्या पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष व त्याच कारणावरून दोन मौलवींसह १३ जणांमध्ये निर्माण झालेलया अंतर्गत वादात आपचे नेते मुकीम अहमद व मौलवी शेख शफी शेख कादरी या दोघांचे हत्याकांड घडल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देमुकीम अहमद हे पैशाचा पाऊ स पाडण्याचे आमिष देणाऱ्या काही मांत्रिकांच्या संपर्कात आले होते. मौलवी तसब्बूर कादरी यांच्या निवासस्थानी मौलवी शेख शफी शेख कादरी व मुकीम अहमद या दोघांना बोलावण्यात आले. त्यानंतर संगनमताने या दोघांची गळा आवळून हत्या करण्यात आली.

- सचिन राऊत

 अकोला - राज्यातील विविध घनदाट जंगलांमध्ये रात्रीला कथितरित्या पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष व त्याच कारणावरून दोन मौलवींसह १३ जणांमध्ये निर्माण झालेलया अंतर्गत वादात आपचे नेते मुकीम अहमद व मौलवी शेख शफी शेख कादरी या दोघांचे हत्याकांड घडल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. अकोल्यातील आझाद कॉलनीमध्ये या दोघांची गळा आवळून हत्या झाल्यानंतर, त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील जंगलात लावण्यात आली.आप नेते मुकीम अहमद हे पैशाचा पाऊ स पाडण्याचे आमिष देणाऱ्या काही मांत्रिकांच्या संपर्कात आले होते, तर अशाच प्रकारे दोन ते तीन गट कथितरित्या पैशाचा पाऊस पाडण्यासाठी रात्री-बेरात्री जंगलामध्ये फिरायचे. यासाठी त्यांच्यासोबत मांत्रिकही असायचे. गत अनेक वर्षांपासून त्यांचा हा खटाटोप सुरू होता. मात्र, प्रत्यक्षात यश येत नसल्याने तीनही गटात अंतर्गत कलह सुरू झाला. याच कलहात दोन मौलवी जे स्वत: मांत्रिक होते, त्यांचेही वाद सुरू झाले. या वादातच या गटातील सदस्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिस तक्रारी सुरू केल्या. कट रचून बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, यासह विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र या गटातील सहकाºयांनी एकमेकांच्या विरोधात रचले. तेलंगणातील अदिलाबाद, हिंगोली जिल्ह्यात व अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्यात या गटातील सदस्यांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल आहेत. एकमेकांना फसविण्याची स्पर्धाच त्यांच्यात लागल्याने त्यांचे वाद विकोपाला गेले. या वादातच मुकीम अहमद व मौलवी शेख शफी शेख कादरी यांच्या हत्येचा कट रचल्या गेला. ३० जुलै रोजी रात्री आझाद कॉलनी येथील मौलवी तसब्बूर कादरी यांच्या निवासस्थानी मौलवी शेख शफी शेख कादरी व मुकीम अहमद या दोघांना बोलावण्यात आले. यांचे जेवण सुरू असतानाच मौलवी तसब्बूरने १३ आरोपींना दोघांचीही माहिती दिली. त्यानंतर संगनमताने या दोघांची गळा आवळून हत्या करण्यात आली. मध्यरात्री दोघांचेही मृतदेह पोत्यात बांधून कारने बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा परिसरातील जंगलात नेऊन खोल दरीत फेकण्यात आले, त्यावर दगडांचा खच टाकण्यात आला. मृतदेह नेण्यासाठी त्यांनी दोनदा तीन कार बदलल्या. संगनमताने कट रचून हे हत्याकांड घडविले. मात्र, अकोला पोलीस प्रशासन ताकदीने कामाला लागल्यानंतर, या प्रकरणाचा तीन दिवसांतच पर्दाफाश केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMurderखूनCrimeगुन्हा