शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मुकीम अहमद व शेख शफी हत्या प्रकरण; पैशाचा पाऊस उठला दोघांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 12:38 IST

 अकोला - राज्यातील विविध घनदाट जंगलांमध्ये रात्रीला कथितरित्या पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष व त्याच कारणावरून दोन मौलवींसह १३ जणांमध्ये निर्माण झालेलया अंतर्गत वादात आपचे नेते मुकीम अहमद व मौलवी शेख शफी शेख कादरी या दोघांचे हत्याकांड घडल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देमुकीम अहमद हे पैशाचा पाऊ स पाडण्याचे आमिष देणाऱ्या काही मांत्रिकांच्या संपर्कात आले होते. मौलवी तसब्बूर कादरी यांच्या निवासस्थानी मौलवी शेख शफी शेख कादरी व मुकीम अहमद या दोघांना बोलावण्यात आले. त्यानंतर संगनमताने या दोघांची गळा आवळून हत्या करण्यात आली.

- सचिन राऊत

 अकोला - राज्यातील विविध घनदाट जंगलांमध्ये रात्रीला कथितरित्या पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष व त्याच कारणावरून दोन मौलवींसह १३ जणांमध्ये निर्माण झालेलया अंतर्गत वादात आपचे नेते मुकीम अहमद व मौलवी शेख शफी शेख कादरी या दोघांचे हत्याकांड घडल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. अकोल्यातील आझाद कॉलनीमध्ये या दोघांची गळा आवळून हत्या झाल्यानंतर, त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील जंगलात लावण्यात आली.आप नेते मुकीम अहमद हे पैशाचा पाऊ स पाडण्याचे आमिष देणाऱ्या काही मांत्रिकांच्या संपर्कात आले होते, तर अशाच प्रकारे दोन ते तीन गट कथितरित्या पैशाचा पाऊस पाडण्यासाठी रात्री-बेरात्री जंगलामध्ये फिरायचे. यासाठी त्यांच्यासोबत मांत्रिकही असायचे. गत अनेक वर्षांपासून त्यांचा हा खटाटोप सुरू होता. मात्र, प्रत्यक्षात यश येत नसल्याने तीनही गटात अंतर्गत कलह सुरू झाला. याच कलहात दोन मौलवी जे स्वत: मांत्रिक होते, त्यांचेही वाद सुरू झाले. या वादातच या गटातील सदस्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिस तक्रारी सुरू केल्या. कट रचून बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, यासह विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र या गटातील सहकाºयांनी एकमेकांच्या विरोधात रचले. तेलंगणातील अदिलाबाद, हिंगोली जिल्ह्यात व अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्यात या गटातील सदस्यांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल आहेत. एकमेकांना फसविण्याची स्पर्धाच त्यांच्यात लागल्याने त्यांचे वाद विकोपाला गेले. या वादातच मुकीम अहमद व मौलवी शेख शफी शेख कादरी यांच्या हत्येचा कट रचल्या गेला. ३० जुलै रोजी रात्री आझाद कॉलनी येथील मौलवी तसब्बूर कादरी यांच्या निवासस्थानी मौलवी शेख शफी शेख कादरी व मुकीम अहमद या दोघांना बोलावण्यात आले. यांचे जेवण सुरू असतानाच मौलवी तसब्बूरने १३ आरोपींना दोघांचीही माहिती दिली. त्यानंतर संगनमताने या दोघांची गळा आवळून हत्या करण्यात आली. मध्यरात्री दोघांचेही मृतदेह पोत्यात बांधून कारने बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा परिसरातील जंगलात नेऊन खोल दरीत फेकण्यात आले, त्यावर दगडांचा खच टाकण्यात आला. मृतदेह नेण्यासाठी त्यांनी दोनदा तीन कार बदलल्या. संगनमताने कट रचून हे हत्याकांड घडविले. मात्र, अकोला पोलीस प्रशासन ताकदीने कामाला लागल्यानंतर, या प्रकरणाचा तीन दिवसांतच पर्दाफाश केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMurderखूनCrimeगुन्हा