शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

चान्नी पोलिसांच्या दंडेलशाहीविरोधात खासदार-आमदार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 1:49 AM

अकोला: मळसूर येथे झालेल्या अपघातातील मृतकाची हत्या झाल्याचा आरोप चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केल्यानंतर पोलिसांनी एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून मळसूर, अंबाशी व चरणगाव येथील ग्रामस्थांना चार दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीतील जखमींनी खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांना आपबिती सांगताच त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची भेट घेतली.

ठळक मुद्देपोलिसांची ग्रामस्थांना बेदम मारहाण, पोलीस अधीक्षकांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मळसूर येथे झालेल्या अपघातातील मृतकाची हत्या झाल्याचा आरोप चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केल्यानंतर पोलिसांनी एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून मळसूर, अंबाशी व चरणगाव येथील ग्रामस्थांना चार दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीतील जखमींनी खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांना आपबिती सांगताच त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची भेट घेतली. चान्नी पोलिसांच्या या दंडेलशाहीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.मळसूर परिसरात दीपक गडदे नामक युवकाचा २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अपघात झाला होता. या अपघातस्थळाच्या काही अंतरावर एक काठी मिळाली असून, या काठीवर रक्त सांडलेले होते. तसेच रोडवरही तीन ते चार ठिकाणी रक्ताचा सळा होता. यावरून दीपक गडदेचा अपघात झाला नसून, हत्या झाल्याची तक्रार त्यांचे मामा शिवाजी काळे यांनी चान्नी पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीच्या आधारे तसेच एका नेत्याच्या सांगण्यावरून चान्नी पोलिसांनी अंबाशी येथील रहिवासी गुणवंत रामकृष्ण महल्ले, मळसूर येथील उमेश नाना बोचरे, चरणगाव येथील गजानन सुंदरलाल देशमुख, गजानन बाबूलाल काळे, मळसूरचे सरपंच जगदीश देवकते व पंजाब हिरामन राठोड यांना मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर पंजाब राठोड व जगदीश देवकते या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अकोल्यात आणले, तर उर्वरित चार ग्रामस्थांना चान्नी पोलिसांनी दोराने बांधून मारहाण केली. गजानन देशमुख, गजानन काळे, उमेश बोचरे व गुणवंत महल्ले या चार जणांना बाजीराव तसेच पट्टय़ाने मारहाण केल्याने ते प्रचंड दहशतीत आहेत. मंगळवारी रात्री मारहाण केल्यानंतर त्यांना अटक तसेच ताब्यात घेतले नसल्याचे दाखवून शुक्रवारपर्यंत मारहाण केली. या मारहाणीमुळे चारही जण प्रचंड भेदरल्याने त्यांनी खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर धोत्रे व सावरकर यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कलासागर यांची भेट घेऊन ग्रामस्थांवर अत्याचार करणार्‍या पोलिसांवर कारवाईची मागणी केली. या सहा जणांपैकी कुणीही या अपघात किंवा खुनात सहभागी असेल, तर त्यांच्यावर काहीही कारवाई करा, मात्र काहीही संबंध नसताना केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन पोलिसांनी ग्रामस्थांना मारहाण करणे चुकीचे असल्याचेही यावेळी धोत्रे व सावरकर यांनी पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले.केवळ कुणाच्या सांगण्यावरून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांना रेकॉर्डवर न घेता तब्बल मंगळवार ते शुक्रवार चार दिवस मारहाण करणे चुकीचे असल्याचा आरोप खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी केला. कोणत्याही व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चोवीस तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणे बंधनकारक आहे. मात्र, चान्नी प्रकरणात पोलिसांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे दिसून येत आहे.

चौकशी करून कारवाईचान्नी पोलिसांनी केलेला प्रकार, तसेच मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात घडलेल्या लाचखोरीच्या गंभीर प्रकरणानंतरही पोलीस अधीक्षकांनी अद्याप कारवाई केली नसल्याचाही मुद्दा यावेळी उपस्थित झाला. त्यावर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून लवकरच कारवाई करणार असल्याचे आश्‍वासन दिले. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासणार असल्याचेही यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

तर उपोषणास बसू - आ. सावरकरचान्नी व मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकारानंतरही पोलिसांनी या दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांना पाठीशी घातल्यास वरिष्ठ पोलीस अधीकार्‍यांविरोधात उपोषणास बसणार असल्याचा इशारा आ. रणधीर सावरकर यांनी दिला. गुरुवारपर्यंत कारवाई न झाल्यास भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांसह उपोषणास प्रारंभ करणार असल्याचेही यावेळी आ. रणधीर सावरकर यांनी पोलीस अधीक्षकांसमोर स्पष्ट केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक विनोद बोर्डे, गणेश पावसाळे, गिरीष जोशीही उपस्थित होते.

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रेRandhir Savarkarरणधीर सावरकर