भारनियमन बंद न केल्यास आंदोलन
By Admin | Updated: May 3, 2014 19:13 IST2014-05-03T13:23:33+5:302014-05-03T19:13:00+5:30
तालुक्यात सिंगलफेज असलेल्या गावामधील भारनियमन तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गोपाल विखे यांनी वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनात दिला आहे.

भारनियमन बंद न केल्यास आंदोलन
तेल्हारा : तालुक्यात सिंगलफेज असलेल्या गावामधील भारनियमन तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गोपाल विखे यांनी वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनात दिला आहे.
तेल्हारा तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये सिंगल फेज कार्यान्वित आहे. ग्रामस्थांना २४ तास वीजपुरवठा मिळावा, असा त्यामागे उद्देश होता. या गावांमधून ८० टक्के वीज मिलाची वसुली होत असते. तरीही सिंगल फेज योजना असलेल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात भारनिमन होत आहे. दानापूर गावामध्येही सिंगल फेज योजना आहे. तसेच तेथे वीज बिलाची वसुलीदेखील मोठ्या प्रमाणात आहे. तरीही दानापूर येथे रात्री-बेरात्री भारनियमन होत असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन कराा लागत आहे. ज्या गावामध्ये बिल वसुली बर्यापैकी आहे तेथे पुन्हा सिंगफेज योजना कार्यान्वित करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष गोपाल विखे यांनी दिला आहे. ( प्रतिनिधी)