शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

मोदी देशावरील सर्वात मोठे संकट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 23:26 IST

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप : भाजप, संघ परिवारावर टिका

अकोला : भाजपा सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारावर टिका करीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशावरील सर्वात मोठे संकट आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला. 

धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हा शाखेच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.  गत चार वर्षात देशातील ७५ हजार कुटुंब देश सोडून परदेशात गले असून, ते सर्व हिंदू आहेत, सरकारच्या धोरणाला कंटाळून ते देश सोडून गेले असे सांगत, सर्व काळा पैसा पांढरा झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात; मात्र पैसा गेला कुठे असा सवाल उपस्थित करीत, हा पैसा अमित शहांकडे तर ठेवला नाहीना, असा आरोपही  अ‍ॅड.आंबेडकर यांनी केला.

 विजया दशमीला रा.स्व.संघाच्यावतीने शस्त्राची पूजा केली केली जाते. शस्त्राची पूजा करणाºया सरसंघाचालक मोहन भागवत यांच्याविरुध्द ‘मोक्का ’का लावला जात नाही, अशी विचारणा करीत, रा.स्व.संघाकडे आतंकवाद्यांची शस्त्र आली कशी, याचे उत्तर सरकारने दिले पाहीजे, अन्यथा जिल्हयाजिल्ह्यात आम्ही हा प्रश्न पेटविणार असल्याचा इशारा अ‍ॅड.आंबेडकर यांनी दिला.

देशात ‘ब्लॅकमेलींग’चे राजकारण !देशात ‘ब्लॅकमेलींग’चे राजकारण सुरु झाल्याचा आरोप अ‍ॅड.आंबेडकर यांनी केला. पंतप्रधान मोदी एकटे खात नाहीत, दुसºयाला खायला लावतात आणि त्यातील वाटा मागतात.उद्या पाकिस्तान, चायना सोबत युध्द झालेच तर खरेदी केलेली विमाने वापरली पाहीजे; मात्र रिलायन्स कंपनीने विमाने वापरण्याच्या स्थितीत ठेवली नाही तर, सरकारचा अधिकार काय, असा प्रश्न उपस्थित करुन सरकारच्या धोरणावर आंबेडकर यांनी टिका केली.

देश असुरक्षित !सुरक्षेच्या दृष्टभने देश असुरक्षित असल्याचा आरोप अ‍ॅड.आंबेडकर यांनी केला.रशियासोबत केलेला मिसाईल करारनामा १५ दिवसांत सरकारने सार्वजनिक करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी