शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

मोदी सरकारचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या नव्हे भांडवलदारांच्या हिताचे - ॲड. प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 10:25 IST

Prakash Ambedkar, Dhammchakra Pravartan Din मोदी सरकारने केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला.

ठळक मुद्देधम्मचक्र प्रवर्तन समारंभाचे फेज बुकवर लाइव्ह प्रसारण करण्यात आले.मोदी यांचे वागणे दारुड्यासारखेच असल्याची टीका ॲड. आंबेडकर यांनी केली.

अकोला: केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात पारित केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असून, भांडवलदारांच्या हिताचे आहेत. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी केला.

भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन समारंभाचे फेज बुकवर लाइव्ह प्रसारण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असून, बाजारपेठ खुली केल्याने भांडवलदारांचा फायदा होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारने केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्तन आणि दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचे वर्तन यामध्ये काही फरक आहे काय, असा सवाल करीत दारुडा व्यक्ती घरातील भांडीकुंडी विकतो, तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकार चालवायचे आहे, असे सांगत देशाची संपत्ती विकत आहेत. त्यामुळे मोदी यांचे वागणे दारुड्यासारखेच असल्याची टीका ॲड. आंबेडकर यांनी केली. 

 

चीनसोबत युध्द झाले तर जिंकणार कसे?

नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली असून, चीनसोबत युध्द झाल्यास जिंकणार कसे, असा सवाल करीत, चीनसोबत लढण्याची आपली कुवत तपासून, त्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर वक्तव्य केले पाहिजे, असा टोला ॲड. आंबेडकर यांनी मोदी सरकारला लगावला.

तीन पायांचे आघाडी सरकार अपयशी!

राज्यात तीन पायांचे आघाडी सरकार सत्तेवर आले असून, हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचे टीकास्त्र ॲड. आंबेडकर यांनी सोडले.

भारतीय बाैध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष् पी.जे. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्ष निवास्थान परिसरात आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अंजली आंबेडकर, भन्ते बी. संघपाल, भन्ते बुध्दपालजी, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, आकाश शिरसाट, मनीषा बोर्डे, पंजाबराव वडाळ, साहील आनंदराज आंबेडकर आदी उपस्थित होते. सामूहिक बौध्द वंदनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे संचालन बौध्द महासभेचे जिल्हा महासचिव प्रा.डाॅ. एम.आर. इंगळे व आभार प्रदर्शन रमेश गवई गुरुजी यांनी केले. सरणंतयने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी