शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

मोदी सरकारचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या नव्हे भांडवलदारांच्या हिताचे - ॲड. प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 10:25 IST

Prakash Ambedkar, Dhammchakra Pravartan Din मोदी सरकारने केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला.

ठळक मुद्देधम्मचक्र प्रवर्तन समारंभाचे फेज बुकवर लाइव्ह प्रसारण करण्यात आले.मोदी यांचे वागणे दारुड्यासारखेच असल्याची टीका ॲड. आंबेडकर यांनी केली.

अकोला: केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात पारित केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असून, भांडवलदारांच्या हिताचे आहेत. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी केला.

भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन समारंभाचे फेज बुकवर लाइव्ह प्रसारण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असून, बाजारपेठ खुली केल्याने भांडवलदारांचा फायदा होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारने केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्तन आणि दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचे वर्तन यामध्ये काही फरक आहे काय, असा सवाल करीत दारुडा व्यक्ती घरातील भांडीकुंडी विकतो, तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकार चालवायचे आहे, असे सांगत देशाची संपत्ती विकत आहेत. त्यामुळे मोदी यांचे वागणे दारुड्यासारखेच असल्याची टीका ॲड. आंबेडकर यांनी केली. 

 

चीनसोबत युध्द झाले तर जिंकणार कसे?

नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली असून, चीनसोबत युध्द झाल्यास जिंकणार कसे, असा सवाल करीत, चीनसोबत लढण्याची आपली कुवत तपासून, त्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर वक्तव्य केले पाहिजे, असा टोला ॲड. आंबेडकर यांनी मोदी सरकारला लगावला.

तीन पायांचे आघाडी सरकार अपयशी!

राज्यात तीन पायांचे आघाडी सरकार सत्तेवर आले असून, हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचे टीकास्त्र ॲड. आंबेडकर यांनी सोडले.

भारतीय बाैध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष् पी.जे. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्ष निवास्थान परिसरात आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अंजली आंबेडकर, भन्ते बी. संघपाल, भन्ते बुध्दपालजी, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, आकाश शिरसाट, मनीषा बोर्डे, पंजाबराव वडाळ, साहील आनंदराज आंबेडकर आदी उपस्थित होते. सामूहिक बौध्द वंदनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे संचालन बौध्द महासभेचे जिल्हा महासचिव प्रा.डाॅ. एम.आर. इंगळे व आभार प्रदर्शन रमेश गवई गुरुजी यांनी केले. सरणंतयने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी