शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक अटळः अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 17:36 IST

विधानसभेची मध्यावधी निवडणूक अटळ असल्याचे मत वचिंत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

- राजरत्न सिरसाट

अकोला : राज्याच्या राजकारणातील उलथापालथ ही केवळ सत्तेसाठी असून, हीच स्थिती कायम राहिल्यास विधानसभेची मध्यावधी निवडणूक अटळ असल्याचे मत वचिंत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ही इतिहासाची पुनरावृत्ती असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

शनिवारी सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकारण अचानक पलटले आहे. याच पार्श्वभूमीवर अ‍ॅड. आंबेडकर यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी हीच स्थिती कायम राहिल्यास मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने राज्य वाटचाल करीत असल्याचे सांगताना. ४० वर्षापूर्वी स्व.वसंतदादा पाटील यांच्या बाबतीत जे घडलं म्हणजेच शरद पवारांनी जे पेरले ते आता उगवले. ही इतिहासाची पुर्नरावृत्ती असल्याचे ते म्हणाले. घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो का? या बाबत बोलताना त्यांनी राजकीय पक्षाची कार्यकारी समिती ही महत्वाची असून, राजकीय पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंद झालेली असते. विधीमंडळ नेता हा पक्षा सभागृहातील नेता निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांनी जरी निवडला असला तरी अंतिम अधिकार पक्षाकडे असतात असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर