शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

बाजार समित्या ओस; खेडा खरेदीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 15:12 IST

अकोला: शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी लावलेल्या कठोर नियमांमुळे तसेच व्यापारी-अडत्यांसाठी अवलंबलेल्या जाचक धोरणांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या ओस पडल्या आहेत, तर दुसरीकडे खेडा खरेदीला उधाण आले आहे.

- सचिन राऊत

अकोला: शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी लावलेल्या कठोर नियमांमुळे तसेच व्यापारी-अडत्यांसाठी अवलंबलेल्या जाचक धोरणांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या ओस पडल्या आहेत, तर दुसरीकडे खेडा खरेदीला उधाण आले असून, यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने शासनाचा कोट्ट्यवधी रुपयांचा कर बुडविणाºया खेड्यातील खरेदीदार मात्र बिनबोभाट सुटले आहेत. बाजार समित्यांमध्ये नियमाने खरेदी-विक्री करणारे अडते व व्यापारी मात्र या धोरणामुळे प्रचंड अडचणीत आले आहेत.शासनाच्या म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा अधिकृत परवाना घेऊन शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाºया व्यापारी व अडत्यांकडे शेतमाल खरेदी-विक्रीसाठी आणल्यानंतर शेतकºयांना गेटवरच पासबुकची झेरॉक्स द्यावी लागते. हमीभावाने खरेदी करावी लागते. शेतकºयांच्या खात्यात ई-पेमेंटद्वारे पैसे द्यावे लागते. भावाची आॅनलाइन नोंद ठेवणे, तोलाई-मापाई या सर्व नियमांचे पालन करावे लागते. यामध्ये किरकोळही चूक झाल्यास व्यापारी व अडत्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मात्र खेडा खरेदीला उधाण आले असून, या खरेदीदारांना परवान्याची गरज नाही. लाखो रुपयांचा व्यवहार रोखीने करण्यात येत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात येते, जीएसटी भरण्याकडे कानाडोळा, शेतकºयांची तोलाई-मापाईत फसवणूक निश्चित आहे; मात्र त्यानंतरही केवळ शासनाच्या कठोर धोरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या ओस पडत असून, दुसरीकडे खेड्यात मात्र व्यापाºयांनी शेतकºयांची फसवणूक करीत कोट्ट्यवधी रुपयांचा कर बुडवित शेतमालाची खरेदी सुरू केली असून, याकडे संबंधित यंत्रणेचे सपशेल दुर्लक्ष आहे. वाहनचालकांची कमिशनखोरीखेड्यातील शेतकºयांकडील शेतमाल विशिष्ट ठिकाणच्या बाजार समिती किंवा ई-चौपालवर नेण्यासाठी वाहनचालकांना क्विंटलमागे २५ ते ३० रुपये कमिशन देण्यात येते. त्यामुळे वाहनचालकही शेतकºयांना खोटी आमिषे देऊन खामगाव, रिसोड, कारंजा, अकोट, पिंजर, मूर्तिजापूर या ठिकाणी शेतमाल खरेदीसाठी नेत आहेत; मात्र केवळ कमिशनखोरीसाठी वाहनचालकांनी भाववाढीचा फंडा वापरत शेतकºयांना आणखी खड्ड्यात लोटण्याचा प्रताप सुरू केला आहे. भावांतर योजनेलाही मुकतील शेतकरीमध्यप्रदेश, राजस्थान सरकारने शेतकºयांसाठी भावांतर योजना लागू केली. यासाठी अधिकृत अडत्यामार्फतच खरेदी-विक्री करणाºया शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्यात आला. खेडा खरेदीमधल्या शेतकºयांना मात्र या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकºयांनी जागृत होऊन कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येच शेतमाल विक्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीAkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी