शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

पश्चिम वऱ्हाडात होणार उमेदवारी वाटपात उलथापालथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 23:45 IST

काँग्रेस आघाडीसह, युती आणि वंचित बहुजन आघाडीमध्येही उमेदवारी वाटपात मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत आहेत.

- राजेश शेगोकार

अकोला: पश्चिम वऱ्हाडात काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीसह, युती आणि वंचित बहुजन आघाडीमध्येही उमेदवारी वाटपात मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत आहेत. अकोल्यात पाच मतदारसंघ असून, यापैकी चार भाजपाकडे व एक भारिप-बमसं (वंचित) कडे आहे. भाजपाचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा, हरीश पिंपळे यांच्यासह भारिपचे बळीराम सिरस्कार यांच्या उमेदवारीबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातून शर्मा हे सलग पाच वेळा विजयी झाले असून, ते सत्तरीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे यावेळी नवा उमेदवार द्यावा, असा आग्रह इच्छुकांनी धरला आहे.भाजप यावेळी ७५ वर्षे पार केलेला उमेदवार देणार नसल्याने अकोला पश्चिमसाठी वयाची ही अट आणखी कमी होईल, अशी आशा इच्छुकांना आहे. मूर्तिजापूरमधून आ. पिंपळे हे दुसऱ्यांदा विजयी झाले असून, यावेळी त्यांना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने जाहीर विरोध करण्याचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे येथे युतीधर्मच धोक्यात आहे. भाजपमधूनही पिंपळे यांना मोठ्या प्रमाणात विरोध असून, भाजपमधील खासदार संजय धोत्रे यांचा गट अजूनही त्यांच्यापासून अंतर ठेवून असल्याची चर्चा असल्याने पिपंळे यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. बाळापुरातून सलग दुसऱ्यांदा भारिप-बमसंचा गड सर करणारे आ. बळीराम सिरस्कार यांची उमेदवारी सामाजिक समीकरणांमध्ये अडकली आहे. सिररस्कार यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी बुलडाण्यातून रिंगणात उतरविले होते. त्यानंतर ते आता बाळापुरात उमेदवार नसतील, अशी चर्चा सुरू झाली होती. या मतदारसंघातील सामाजिक समीकरणे लक्षात घेता काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण, यावर वंचितची उमेदवारी ठरणार आहे. काँग्रेसने मुस्लीम उमेदवार दिल्यास सिरस्कारांना पुन्हा संधी मिळू शकते; मात्र काँग्रेसने माळी समाजाचे कार्ड खेळल्यास वंचितकडून मुस्लीम उमेदवार तयार ठेवला आहे. दुसरीकडे मराठा समाजाला उर्वरित चार मतदारसंघात प्रतिनिधित्व देता आले नाही तर वंचितकडून बाळापुरातही मराठा कार्ड खेळण्याचा पर्याय खुला असल्याने सिरस्कार चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे यांच्या विरोधात भाजपातीलच इच्छुकांनी स्थानिक उमेदवाराचा आग्रह धरला होता; मात्र पक्ष भारसाकळे यांच्या पाठीशी राहील, असे संकेत बुथप्रमुखांच्या मेळाव्यातच मिळाले होते. त्यामुळे भारसाकळे कुणावरही आरोप-प्रत्यारोपात न अडकता कामाला लागलेले दिसत आहेत. या मतदारसंघात युतीचे जागा वाटप हा कळीचा मुद्दा असल्याने सेनेला हा मतदारसंघ मिळालाच तर उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. वाशिममधील वाशिम या मतदारसंघात भाजपामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. आ. लखन मलिकांनी सलग दोनदा विजय मिळविला असला तरी त्यांच्या विरोधात पक्षातही नाराजीचा सूर आहे. मलिक हे तिसºयांदा आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात एन्टी इन्कम्बन्सी असल्याने भाजपकडून येथे धक्कातंत्राचे राजकारण होण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019