शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांत ५१ जागांवर ‘महायुती’ची बाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 13:06 IST

शेतकरी आणि ग्रामीण जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने असल्याची बाब विधानसभा निवडणुकीच्या निकालातून समोर येत आहे.

- संतोष येलकर

अकोला : विधानसभा निवडणुकीच्या निकालात विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील ८० मतदारसंघांपैकी ५१ मतदारसंघात भाजपा-शिवसेना महायुती विजयी झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील ५१ जागांवर ‘महायुती’ने बाजी मारली आहे.विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ आॅक्टोबर रोजी जाहीर झाले. या निवडणूक निकालात पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यासह मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, जालना, बीड, परभणी व लातूर इत्यादी शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील ८० विधानसभा मतदारसंघांपैकी ५१ मतदारसंघांमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील विधानसभेच्या ५१ जागांवर बाजी मारल्याने, या जिल्ह्यांतील शेतकरी आणि ग्रामीण जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने असल्याची बाब विधानसभा निवडणुकीच्या निकालातून समोर येत आहे.१४ जिल्ह्यांत ‘महायुती’ने अशा प्राप्त केल्या जागा!शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीने विधानसभेच्या ५१ जागा प्राप्त केल्या. त्यामध्ये विदर्भातील अकोला जिल्ह्यात ५ पैकी ५, अमरावती जिल्ह्यात ८ पैकी १, बुलडाणा जिल्ह्यात ७ पैकी ५,वाशिम जिल्ह्यात ३ पैकी २, वर्धा जिल्ह्यात ४ पैकी ३ जागा महायुतीने प्राप्त केल्या, तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात ९ पैकी ९, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ पैकी ४, नांदेड जिल्ह्यात ९ पैकी ४, हिंगोली जिल्ह्यात ३ पैकी २, जालना जिल्ह्यात ५ पैकी ३, बीड जिल्ह्यात ६ पैकी २, परभणी जिल्ह्यात ४ पैकी ३ व लातूर जिल्ह्यात ६ पैकी २ जागांवर महायुतीने विजय मिळविला.विधानसभा निवडणुकीत विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील ८० जागांपैकी ५१ जागांवर भाजपा-शिवसेना महायुतीने विजय प्राप्त केला. त्यामुळे या जिल्ह्यांमधील शेतकरी व ग्रामीण जनतेच्या मताचा कौल महायुतीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होत आहे.-किशोर तिवारीअध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन मिशन.

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019