शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांत ५१ जागांवर ‘महायुती’ची बाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 13:06 IST

शेतकरी आणि ग्रामीण जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने असल्याची बाब विधानसभा निवडणुकीच्या निकालातून समोर येत आहे.

- संतोष येलकर

अकोला : विधानसभा निवडणुकीच्या निकालात विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील ८० मतदारसंघांपैकी ५१ मतदारसंघात भाजपा-शिवसेना महायुती विजयी झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील ५१ जागांवर ‘महायुती’ने बाजी मारली आहे.विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ आॅक्टोबर रोजी जाहीर झाले. या निवडणूक निकालात पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यासह मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, जालना, बीड, परभणी व लातूर इत्यादी शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील ८० विधानसभा मतदारसंघांपैकी ५१ मतदारसंघांमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील विधानसभेच्या ५१ जागांवर बाजी मारल्याने, या जिल्ह्यांतील शेतकरी आणि ग्रामीण जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने असल्याची बाब विधानसभा निवडणुकीच्या निकालातून समोर येत आहे.१४ जिल्ह्यांत ‘महायुती’ने अशा प्राप्त केल्या जागा!शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीने विधानसभेच्या ५१ जागा प्राप्त केल्या. त्यामध्ये विदर्भातील अकोला जिल्ह्यात ५ पैकी ५, अमरावती जिल्ह्यात ८ पैकी १, बुलडाणा जिल्ह्यात ७ पैकी ५,वाशिम जिल्ह्यात ३ पैकी २, वर्धा जिल्ह्यात ४ पैकी ३ जागा महायुतीने प्राप्त केल्या, तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात ९ पैकी ९, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ पैकी ४, नांदेड जिल्ह्यात ९ पैकी ४, हिंगोली जिल्ह्यात ३ पैकी २, जालना जिल्ह्यात ५ पैकी ३, बीड जिल्ह्यात ६ पैकी २, परभणी जिल्ह्यात ४ पैकी ३ व लातूर जिल्ह्यात ६ पैकी २ जागांवर महायुतीने विजय मिळविला.विधानसभा निवडणुकीत विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील ८० जागांपैकी ५१ जागांवर भाजपा-शिवसेना महायुतीने विजय प्राप्त केला. त्यामुळे या जिल्ह्यांमधील शेतकरी व ग्रामीण जनतेच्या मताचा कौल महायुतीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होत आहे.-किशोर तिवारीअध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन मिशन.

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019