शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

Maharashtra Assembly Election 2019 : बाळापुरात परिवर्तन होणार की वंचित जागा कायम ठेवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 10:39 IST

मतदारसंघामध्ये एमआयएमच्या उमेदवारीमुळे झालेल्या मतविभाजनाचा काँग्रेस-राकाँला फटका बसणार असल्याची चर्चा आहे.

बाळापूर: मतदारसंघामध्ये भाजप-सेना युती, काँग्रेस-राकाँ महाआघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या उमेदवारांमध्ये सोमवारी मतदानाच्या दिवशी काट्याची चौरंगी लढत पाहावयास मिळाली. आता बाळापूर मतदारसंघात परिवर्तन होणार की ही जागा वंचित बहुजन आघाडी कायम राखणार, हे २४ आॅक्टोबर रोजी मतपेटीतून दिसून येईलच. या मतदारसंघामध्ये एमआयएमच्या उमेदवारीमुळे झालेल्या मतविभाजनाचा काँग्रेस-राकाँला फटका बसणार असल्याची चर्चा आहे.बाळापूर मतदारसंघामध्ये राजकीय पक्षांनी प्रथमच नवे उमेदवार रिंगणात उतरविले. दहा वर्षांपासून हा मतदारसंघ भारिप-बमसं (वंचित बहुजन आघाडी)च्या ताब्यात आहे. यंदा भाजपच्या वाट्याची ही जागा सेनेला सुटली आणि सेनेने जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांना संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा बाळापूर मतदारसंघ प्र्रतिष्ठेचा करीत, काँग्रेसकडून ही जागा खेचून आणली. राकाँने जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांना रिंगणात उतरवून चुरस निर्माण केली. वंचित बहुजन आघाडीने विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांचे तिकीट कापून डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना संधी देत, मराठा कार्ड खेळले. ऐनवेळी वंचितमधून बाहेर पडलेले डॉ. रहेमान खान यांनी प्रथम एमआयएमचा झेंडा हाती घेत, निवडणूक प्रतिष्ठेची केली. सोमवारी झालेल्या मतदानामध्ये नव्या दमाचे उमेदवार रिंगणात असल्याने, मतदारांमध्येसुद्धा उत्साह दिसून आला. मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांवर जात मतदारांनी मतदान करून कर्तव्य बजावले. चारही राजकीय पक्षांमध्ये सोमवारी चांगलीच चुरस बघायला मिळाली. बाळापूर मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाल्यामुळे उमेदवारही खुशीत दिसत होते. चारही राजकीय पक्षांचे उमेदवार तगडे असल्यामुळे त्यांचा विजय होणार असल्याचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सांगत आहेत. चौरंगी लढतीमुळे निवडणुकीचा काय निकाल लागेल, हे सांगणे कठीण असले तरी, अंदाजानुसार उमेदवार विजय आपलाच होणार असल्याचा दावा करीत आहेत. भाजपला ही जागा न सुटल्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेना उमेदवाराच्या प्रचारात दिसून आले नाहीत. त्याचा फटका सेनेला बसू शकतो. एमआयएममुळे मुस्लीम मतांचे विभाजन कोणाच्या पथ्थ्यावर पडते तसेच अखेरच्या दोन दिवसांमध्ये काँग्रेस-राकाँ उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीने जनसंपर्क, जातीय समीकरणावर भर देत, चांगलीच चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता या मतदारसंघात परिवर्तन होणार की वंचित ही जागा कायम राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Akolaअकोलाbalapur-acबाळापूरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीShiv Senaशिवसेना