शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

जिवंत मतदारांच्या मस्तकी मारला ‘डिलिट’चा शिक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 13:28 IST

भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या व कामकाजात दुरुस्ती करण्याची मागणी निवडणूक विभागाकडे केली आहे.

अकोला: मतदारांची नावे यादीतून गहाळ होणे, जिवंत मतदारांना चक्क मयत दाखविणे, मयत उमेदवाराचे नाव बाद न करता त्यांच्या कुटुंबातील इतर मतदारांचे नाव बाद करणे, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा दुरुस्तीसाठी सादर केलेल्या अर्जाशिवाय असंख्य मतदारांवर ‘डिलिट’चा शिक्का मारून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इमानेइतबारे पार पाडले होते. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत हा घोळ टाळण्यासाठी भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील व भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या व कामकाजात दुरुस्ती करण्याची मागणी निवडणूक विभागाकडे केली आहे.लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया कोणत्याही अडचणींशिवाय पार पडेल, असा आशावाद जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला होता. ऐन मतदानाच्या दिवशी शहरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील असंख्य मतदारांना निवडणूक विभागाच्या हलगर्जीपणामुळे मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे चित्र समोर आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत असाच घोळ पुन्हा झाल्यास मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेता भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजप पदाधिकारी व नगरसेवकांनी निवडणूक विभागाकडे धाव घेतली. तसेच नागरिकांना त्या-त्या भागातील मतदान केंद्र उपलब्ध न करून दिल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचा दावाही भाजपकडून क रण्यात आला. अशा मतदान केंद्रांमध्ये बदल करण्याची मागणी भाजपच्यावतीने भानुदास एन्नावार, नगरसेवक विजय इंगळे अजय शर्मा, अमोल गोगे, बबलू पळसपगार, रणजित खेडकर, राजेश चौधरी, योगेश नागपुरे, हेमंत शर्मा व रमेश करिहार यांनी केली आहे.जिवंत मतदार केले ‘डिलिट’!लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान केंद्र गाठल्यावर मतदार यादीमध्ये त्यांच्या छायाचित्रावर ‘डिलिट’चा शिक्का मारला असल्याचे प्रकार समोर आले होते. या प्रकारामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. मतदार जनजागृती मोहिमेत नवीन मतदारांचा समावेश करणे, मयत मतदारांची नावे बाद करणे तसेच पत्ता बदलण्यासाठी नागरिकांनी अर्ज सादर केल्यावरच ‘बीएलओं’नी दुरुस्त्या करणे क्रमप्राप्त होते. या ठिकाणी मतदारांनी कोणत्याही दुरुस्त्यांचे अर्ज सादर न करताही निवडणूक विभागाने परस्पर घोळ घातला होता. यामुळे निवडणूक विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपा