शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

जिवंत मतदारांच्या मस्तकी मारला ‘डिलिट’चा शिक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 13:28 IST

भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या व कामकाजात दुरुस्ती करण्याची मागणी निवडणूक विभागाकडे केली आहे.

अकोला: मतदारांची नावे यादीतून गहाळ होणे, जिवंत मतदारांना चक्क मयत दाखविणे, मयत उमेदवाराचे नाव बाद न करता त्यांच्या कुटुंबातील इतर मतदारांचे नाव बाद करणे, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा दुरुस्तीसाठी सादर केलेल्या अर्जाशिवाय असंख्य मतदारांवर ‘डिलिट’चा शिक्का मारून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इमानेइतबारे पार पाडले होते. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत हा घोळ टाळण्यासाठी भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील व भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या व कामकाजात दुरुस्ती करण्याची मागणी निवडणूक विभागाकडे केली आहे.लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया कोणत्याही अडचणींशिवाय पार पडेल, असा आशावाद जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला होता. ऐन मतदानाच्या दिवशी शहरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील असंख्य मतदारांना निवडणूक विभागाच्या हलगर्जीपणामुळे मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे चित्र समोर आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत असाच घोळ पुन्हा झाल्यास मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेता भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजप पदाधिकारी व नगरसेवकांनी निवडणूक विभागाकडे धाव घेतली. तसेच नागरिकांना त्या-त्या भागातील मतदान केंद्र उपलब्ध न करून दिल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचा दावाही भाजपकडून क रण्यात आला. अशा मतदान केंद्रांमध्ये बदल करण्याची मागणी भाजपच्यावतीने भानुदास एन्नावार, नगरसेवक विजय इंगळे अजय शर्मा, अमोल गोगे, बबलू पळसपगार, रणजित खेडकर, राजेश चौधरी, योगेश नागपुरे, हेमंत शर्मा व रमेश करिहार यांनी केली आहे.जिवंत मतदार केले ‘डिलिट’!लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान केंद्र गाठल्यावर मतदार यादीमध्ये त्यांच्या छायाचित्रावर ‘डिलिट’चा शिक्का मारला असल्याचे प्रकार समोर आले होते. या प्रकारामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. मतदार जनजागृती मोहिमेत नवीन मतदारांचा समावेश करणे, मयत मतदारांची नावे बाद करणे तसेच पत्ता बदलण्यासाठी नागरिकांनी अर्ज सादर केल्यावरच ‘बीएलओं’नी दुरुस्त्या करणे क्रमप्राप्त होते. या ठिकाणी मतदारांनी कोणत्याही दुरुस्त्यांचे अर्ज सादर न करताही निवडणूक विभागाने परस्पर घोळ घातला होता. यामुळे निवडणूक विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपा