शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
3
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
4
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
5
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
6
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
7
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
8
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
9
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
10
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
11
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
12
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
13
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
14
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
15
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
20
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
Daily Top 2Weekly Top 5

निंब बीज व सीड बॉल रोपण अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 10:52 IST

निंब वृक्ष लागवड व सीड बॉल रोपण अभियानाचा शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते नायगाव येथे प्रारंभ करण्यात आला.

अकोला : भारत वृक्ष क्रांती मिशन या संस्थेमार्फत जिल्ह्यात निंब वृक्ष लागवड व सीड बॉल रोपण अभियानाचा शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते नायगाव येथे प्रारंभ करण्यात आला. अकोला जिल्हा व शहराला पर्यावरणदृष्ट्या अत्यंत लाभदायक असलेल्या या अभियानात प्रत्येक अकोलेकरांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसीलदार विजय लोखंडे तसेच भारत वृक्ष क्रांती मिशनचे ए. एस. नाथन यांची उपस्थिती होती. यावेळी अकोला ते अकोट या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा हे बीजारोपण करण्यात येणार असून, वटवृक्षाच्या बियांचे सीड बॉलही दुतर्फा टाकून त्यांचे रोपण करण्यात येणार आहे. ए.एस. नाथन यांनी अकोला येथून अकोटकडे हे बीजारोपण करीत व सीड बॉल टाकत पदयात्रा सुरू केली. भारत वृक्ष क्रांती मिशन अंतर्गत सन २०१५ पासून अकोला जिल्ह्यात ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’, ‘एक जन्म, एक वृक्ष’ ही वृक्षारोपणाची मोहीम राबविली. या मोहिमेला ‘अकोला पॅटर्न’ म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. आता वृक्ष रोपणाचा एक भाग म्हणून संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावात निंबाच्या झाडाच्या बीजांचे रोपण करण्याचा मिशनचा प्रयत्न आहे. निंबाच्या झाडाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे या लागवड अभियानाचा साऱ्यांना फायदाच होईल, असे ए.एस. नाथन यांनी सांगितले.

असे राबविण्यात येणार अभियानया उपक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी निंबाच्या झाडाच्या बिया गोळा करून आपआपल्या शेताच्या बांधावर ७ ते १० फूट अंतरावर दोन इंचाचे खड्डे करून त्यात दोन बिया रोपण कराव्यात. तसेच आपआपल्या घराजवळील परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानाच्या आजूबाजूला, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी व इतर ठिकाणी दोन इंचाचे खड्डे करून त्यात दोन बिया रोपण कराव्यात. गावातील नागरिक, विद्यार्थी, युवा संघटना व सामाजिक संघटना यांनी ई-क्लास जमीन, खुली जमीन, वनजमीन, डोंगराळ जमीन, रस्त्याचे आजूबाजूला व इतर पडीक जमिनीमध्ये दोन इंचाचे खड्डे करून त्यात दोन बिया रोपण कराव्यात. प्रत्येक ग्रामपंचायत तसेच शहरातील नगरपालिका यांच्यामार्फत बियांचे रोपण करण्यात येईल.

 

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरण