जमिनीची सुपीकता टिकवावी लागेल!
By Admin | Updated: August 28, 2015 23:46 IST2015-08-28T23:46:59+5:302015-08-28T23:46:59+5:30
कृषी विद्यापीठात आयोजित पिकांचे पोषण व जमिनीची सुपीकता चर्चासत्रात कृषी शास्त्रज्ञांचा सूर.

जमिनीची सुपीकता टिकवावी लागेल!
अकोला : पिकांच्या पोषणासाठी शेत, जमिनीची सुपीकता टिकवायची असेल तर मातीचे परीक्षण करणे काळाची गरज असून, त्यानुसार विविध खतांचे प्रमाण ठरवावे लागणार असल्याचा सूर गुरुवारी कृषी विद्यापीठात आयोजित कृषी शास्त्रज्ञ चर्चासत्रात उमटला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शिक्षण विस्तार संचालनालय व विदर्भ कृषी विकास मंचाच्यावतीने पिकांचे पोषण, जमिनीची सुपीकता, तणनाशकांचा वापर, या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी. दाणी यांच्यासह विदर्भ कृषी विकास मंचाचे अध्यक्ष डॉ. बी.जी. बथकल, कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले, संचालक विस्तार शिक्षण डॉ.पी.जी. इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. चर्चासत्रात यांच्यासह डॉ.आर.एम. काटकर, रसायनशास्त्रज्ञ डॉ.एन.एम. कोंडे, डॉ. जे.पी.देशमुख, इफकोचे मुख्य क्षेत्र व्यवस्थापक एस.एन. लोंढे, धानुकाचे शंशाक ठाकरे, शेतकरी विजय धाबे आदींसह या विषयाशी निगडित शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. या परिचर्चेत माती परीक्षण आणि कोणत्या खताचा पिकांसाठी वापर करावा, जमिनीचे आरोग्य सुरळीत ठेवण्यासाठी सेंद्रिय, जीवाणू, रासायनिक, विद्राव्य खते देताना कोणता बदल करावा, या विषयावर चर्चा झाली. या पद्धतीने खताचे नियोजन केल्याने परिणामकारक बदल समोर आले आहेत. त्यादृष्टीने यापुढे शेतकर्यांपर्यंंत माहितीचा विस्तार होण्यासाठीची गरज अधोरेखित करण्यात आली. चर्चासत्राचे संचालन प्रा.एस.पी. सलामे यांनी व आभार प्रदर्शन डॉ.एस.व्ही. सुपे यांनी केले. डॉ.एन.आर. कोष्टी, डॉ.पी.के. वाळके, डॉ.के.टी. लहरिया, डॉ.पी.पी. चव्हाण, डॉ. सचिन नंदापुरे, व्हार्सडार्सचे डॉ. आर. एस. बोंडे, डॉ. पी. बी.काळे, डॉ. एल. एस. जाधव, व्ही.एम. महातळे यांच्यासह कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.