शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

किस्सा खुर्ची का : लोकसभेच्या तिसऱ्या निवडणुकीत गाजला वेगळ्या विदर्भाचा मुद्दा, बियाणी यांनी राजीनामा देत काँग्रेसलाच दिले होते आव्हान

By नितिन गव्हाळे | Updated: April 10, 2024 19:15 IST

काँग्रेसचे प्रमुख नेते विदर्भ केसरी ब्रिजलाल बियाणी यांनी काँग्रेससह पदांचा राजीनामा देत, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यांवर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मो. मोहिब्बुल हक यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवारी दाखल करीत, काँग्रेसलाच आव्हान देत, १९६२ लोकसभा निवडणुकीतच स्वपक्षालाच कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली होती. 

नितीन गव्हाळे -अकोला : मार्च १९६२ मध्ये दुसरी लोकसभा विसर्जित करून तिसऱ्या लोकसभेसाठी निवडणूक घेण्यात आली. विदर्भ प्रांत संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्या काळात स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन जोरात होते. काँग्रेसचे प्रमुख नेते विदर्भ केसरी ब्रिजलाल बियाणी यांनी काँग्रेससह पदांचा राजीनामा देत, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यांवर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मो. मोहिब्बुल हक यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवारी दाखल करीत, काँग्रेसलाच आव्हान देत, १९६२ लोकसभा निवडणुकीतच स्वपक्षालाच कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली होती. 

एक व्यक्ती, एक पद या मुद्द्यावर आबासाहेब खेडकर यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागेवर काँग्रेसने अकोल्यातून मो.मोहिब्बुल हक आणि खामगाव लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मण भटकर यांना रिंगणात उतरविले होते. त्यांच्याविरुद्ध ब्रिजलाल बियाणी दंड थोपटले. आंदोलनही तीव्र झाल्याने, विदर्भाच्या प्रश्नावर जनमत खवळले होते. त्यामुळे तत्कालिन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांना विदर्भात प्रचारासाठी यावे लागले. 

लोकसभा निवडणुकीत ६७.४३ टक्के मतदान झाले. पंडित नेहरू यांच्या सभेमुळे काँग्रेसला बळ मिळाले. उमेदवार मो.मोहिब्बुल हक हे १ लाख ३५ हजार मते घेऊन विजयी झाले. स्वतंत्र विदर्भासाठी काँग्रेसविरोधात भूमिका घेणारे ब्रिजलाल बियाणी यांनी पं.नेहरूंची सभा झाल्यानंतरही तब्बल ८८ हजारांवर मते घेतली होती. रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार शंकरलाल खंडारे यांनी ६२ हजारांवर मते घेत, तिसरा क्रमांक मिळविला. 

ब्रिजलाल बियाणी यांना मतदारांनी ३०.८४ टक्के मतदान करीत, स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला जनाधार असल्याचे दाखवून दिले होते, अशी माहिती प्रा.डॉ.विनोद खैरे यांच्या अकोला लोकसभा मतदारसंघातील राजकारण या पुस्तकामध्ये मांडलेली आहे.

ब्रिजलालजींच्या भूमिकेमुळे पं.नेहरू विदर्भात -ब्रिजलाल बियाणी हे विदर्भातील काँग्रेसचे मातब्बर नेते होते. १९५२, १९५७ या विधानसभा दोन निवडणुकांमध्ये अकोला व मंगरुळपीर मतदारसंघाचे आमदार होते. दरम्यान, स्वतंत्र विदर्भाची मागणी पुढे येत होती. त्यात ब्रिजलालजी अग्रेसर होते, परंतु काँग्रेसचा स्वतंत्र विदर्भाला विरोध असल्याने, त्यांनी स्वपक्षांविरुद्धच बंड केले, जनमत त्यांच्या पाठीशी असल्याने, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच प्रचारासाठी विदर्भात उतरावे लागले होते.आता विदर्भाचा मुद्दा गायबलोकसभा निवडणुका दृष्टीसमोर ठेवून भाजपने स्वतंत्र्य विदर्भाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली आणि वैदर्भीय जनतेने सर्वाधिक जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या. मात्र, त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा मुद्द्याला बगल दिली. त्यानंतर, लोकसभेच्या चार निवडणुका झाल्या, पण विदर्भाचा मुद्दा कुठेच दिसला नाही. आता तर स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दाच गायब झालेला आहे. 

टॅग्स :Vidarbhaविदर्भPoliticsराजकारणcongressकाँग्रेस