शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

किस्सा खुर्ची का : लोकसभेच्या तिसऱ्या निवडणुकीत गाजला वेगळ्या विदर्भाचा मुद्दा, बियाणी यांनी राजीनामा देत काँग्रेसलाच दिले होते आव्हान

By नितिन गव्हाळे | Updated: April 10, 2024 19:15 IST

काँग्रेसचे प्रमुख नेते विदर्भ केसरी ब्रिजलाल बियाणी यांनी काँग्रेससह पदांचा राजीनामा देत, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यांवर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मो. मोहिब्बुल हक यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवारी दाखल करीत, काँग्रेसलाच आव्हान देत, १९६२ लोकसभा निवडणुकीतच स्वपक्षालाच कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली होती. 

नितीन गव्हाळे -अकोला : मार्च १९६२ मध्ये दुसरी लोकसभा विसर्जित करून तिसऱ्या लोकसभेसाठी निवडणूक घेण्यात आली. विदर्भ प्रांत संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्या काळात स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन जोरात होते. काँग्रेसचे प्रमुख नेते विदर्भ केसरी ब्रिजलाल बियाणी यांनी काँग्रेससह पदांचा राजीनामा देत, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यांवर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मो. मोहिब्बुल हक यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवारी दाखल करीत, काँग्रेसलाच आव्हान देत, १९६२ लोकसभा निवडणुकीतच स्वपक्षालाच कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली होती. 

एक व्यक्ती, एक पद या मुद्द्यावर आबासाहेब खेडकर यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागेवर काँग्रेसने अकोल्यातून मो.मोहिब्बुल हक आणि खामगाव लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मण भटकर यांना रिंगणात उतरविले होते. त्यांच्याविरुद्ध ब्रिजलाल बियाणी दंड थोपटले. आंदोलनही तीव्र झाल्याने, विदर्भाच्या प्रश्नावर जनमत खवळले होते. त्यामुळे तत्कालिन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांना विदर्भात प्रचारासाठी यावे लागले. 

लोकसभा निवडणुकीत ६७.४३ टक्के मतदान झाले. पंडित नेहरू यांच्या सभेमुळे काँग्रेसला बळ मिळाले. उमेदवार मो.मोहिब्बुल हक हे १ लाख ३५ हजार मते घेऊन विजयी झाले. स्वतंत्र विदर्भासाठी काँग्रेसविरोधात भूमिका घेणारे ब्रिजलाल बियाणी यांनी पं.नेहरूंची सभा झाल्यानंतरही तब्बल ८८ हजारांवर मते घेतली होती. रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार शंकरलाल खंडारे यांनी ६२ हजारांवर मते घेत, तिसरा क्रमांक मिळविला. 

ब्रिजलाल बियाणी यांना मतदारांनी ३०.८४ टक्के मतदान करीत, स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला जनाधार असल्याचे दाखवून दिले होते, अशी माहिती प्रा.डॉ.विनोद खैरे यांच्या अकोला लोकसभा मतदारसंघातील राजकारण या पुस्तकामध्ये मांडलेली आहे.

ब्रिजलालजींच्या भूमिकेमुळे पं.नेहरू विदर्भात -ब्रिजलाल बियाणी हे विदर्भातील काँग्रेसचे मातब्बर नेते होते. १९५२, १९५७ या विधानसभा दोन निवडणुकांमध्ये अकोला व मंगरुळपीर मतदारसंघाचे आमदार होते. दरम्यान, स्वतंत्र विदर्भाची मागणी पुढे येत होती. त्यात ब्रिजलालजी अग्रेसर होते, परंतु काँग्रेसचा स्वतंत्र विदर्भाला विरोध असल्याने, त्यांनी स्वपक्षांविरुद्धच बंड केले, जनमत त्यांच्या पाठीशी असल्याने, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच प्रचारासाठी विदर्भात उतरावे लागले होते.आता विदर्भाचा मुद्दा गायबलोकसभा निवडणुका दृष्टीसमोर ठेवून भाजपने स्वतंत्र्य विदर्भाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली आणि वैदर्भीय जनतेने सर्वाधिक जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या. मात्र, त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा मुद्द्याला बगल दिली. त्यानंतर, लोकसभेच्या चार निवडणुका झाल्या, पण विदर्भाचा मुद्दा कुठेच दिसला नाही. आता तर स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दाच गायब झालेला आहे. 

टॅग्स :Vidarbhaविदर्भPoliticsराजकारणcongressकाँग्रेस