शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

खरिपाच्या कर्जासाठी मुदत संपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:38 IST

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना  म्हणून सुरू केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी कधी नव्हे एवढा  कालापव्यय करत गरजू शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ तर  सोडाच पीक कर्ज मिळण्यापासूनही वंचित राहण्याची वेळ  शासनाने आणली. खरिपाच्या पेरणीसाठी दहा हजारांची मदत  नाही, त्यातच मुदतीत कर्जमाफी न झाल्याने ३0 सप्टेंबरनंतर  खरिप हंगामासाठी पीक कर्ज देताना आता बँका हात वर करत  आहेत. या प्रकाराने शेतकर्‍यांना कर्जमाफीबद्दल हसावे की  रडावे, हेच सुचेनासे झाले आहे.

ठळक मुद्दे कर्जमाफीच्या याद्या आजपासून दिसण्याची शक्यता

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना  म्हणून सुरू केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी कधी नव्हे एवढा  कालापव्यय करत गरजू शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ तर  सोडाच पीक कर्ज मिळण्यापासूनही वंचित राहण्याची वेळ  शासनाने आणली. खरिपाच्या पेरणीसाठी दहा हजारांची मदत  नाही, त्यातच मुदतीत कर्जमाफी न झाल्याने ३0 सप्टेंबरनंतर  खरिप हंगामासाठी पीक कर्ज देताना आता बँका हात वर करत  आहेत. या प्रकाराने शेतकर्‍यांना कर्जमाफीबद्दल हसावे की  रडावे, हेच सुचेनासे झाले आहे.दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे  सांगत शासनाने त्यांच्याकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले.  त्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतरही दिवाळी पूर्वी म्हणजे, १९ ऑक्टोबरपर्यंत शेतकर्‍यांना प्रत्यक्ष  कर्जमाफीचा लाभ देण्यात शासन अपयशी ठरले आहे. या  प्रकाराने कर्जमाफी आणि त्या आधारे मिळणार्‍या खरीप पीक  कर्जाच्या भरवशावर बसलेल्या शेतकर्‍यांची तर क्रूर थट्टा त्या तून झाली आहे. विशेष म्हणजे, कर्जमाफीचा लाभ देण्यापूर्वी शे तकर्‍यांना खरीप हंगामात पेरणीसाठी मदत म्हणून दहा हजार रु पये कर्ज बँकांकडून दिले जातील, असेही ठरले होते. त्याबाबत  माहिती घेतली असता जिल्हय़ात २ लाख ७९ हजार शेतकरी  खातेदारांपैकी केवळ २४६ खातेदारांना ती मदत मिळाली, हे  विशेष. त्यातच अल्प पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन पीक हा तचे गेले. काही भागात अल्प प्रमाणात आलेले पीक परतीच्या पावसाने मा तीत मिसळले. त्यामुळे लाखो शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरणीसाठी  केलेल्या खर्चाची तोंडमिळवणी करणे जिकिरीचे झाले आहे.  त्यातून शेतकरी कमालीचा त्रस्त झाला आहे. त्यातच खरिपाचे  पीक कर्ज मिळणार नसल्याचे बँकांनी स्पष्ट केले आहे.  शासनाने चालवलेल्या या थट्टेने तर आता गर्भगळित होण्याची  वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. 

पात्र लाभार्थी यादीच तयार नाही!शासनाने नमुन्यादाखल कर्जमाफी केलेल्या शेतकर्‍यांना प्रमाण पत्र दिवाळीपूर्वी वाटप केले. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ  मिळालेला नाही. आता १५ नोव्हेंबरपर्यंत लाभ मिळेल, असे  सांगितले जात आहे. त्याचा खरिपाच्या पीक कर्जासाठी कोणताच  फायदा नाही. कोरडवाहू भागातील ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीन, मूग, उडिदाची  पेरणी केली. त्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्या शेतकर्‍यांना  कर्जमाफीचा लाभ मिळून खरिपाचे कर्ज मिळण्याची अपेक्षा हो ती; मात्र शासनाच्या उपद्व्यापाने तेही शेतकर्‍यांना मिळणार  नाही, हे निश्‍चित झाले आहे. 

बँकांचे कर्जवाटपाच्या मुदतीकडे बोटखरीप हंगामाचे पीक कर्ज वाटप ३0 सप्टेंबर तर रब्बी  हंगामसाठी ३१ जानेवारीपर्यंत केले जाते. खरिपाची मुदत  केव्हाची संपल्याने ते कर्ज वाटप होणारच नाही, अशी भूमिका  बँकांनी घेतली आहे. तर रब्बीसाठी मागणी करणार्‍यांना ३0 जून पर्यंत परतफेडीच्या अटीवर कर्ज दिले जाणार आहे. 

लाभार्थी याद्या दिसणार, पात्रता नंतर ठरणारकर्जमाफी योजनेच्या तत्त्वत: आणि निकषानुसार काही  लाभासाठी पात्र ठरणार्‍या खातेदारांच्या याद्या उद्या सोमवार  सायंकाळपर्यंत ऑनलाइन दिसण्याची शक्यता आहे; मात्र त्यांना  मिळणारा लाभ नेमका कोणता असेल, हे १५ नोव्हेंबरनंतरच  समजणार आहे. 

१ लाख ३८ हजार अर्जदारांनाच मिळेल लाभजिल्हय़ात कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी असलेली खात्यांची  संख्या १ लाख ९१ हजार दिसत असली तरी त्यासाठी ज्या १  लाख ३८ हजार ९६२ शेतकर्‍यांनी अर्ज केले, त्यांनाच लाभ  मिळणार आहे. अर्जदारांचे एकापेक्षा अधिक खाते असल्याने  लाभार्थी संख्या फुगलेली दिसत आहे.

मोठय़ा शेतकर्‍यांचा झाला ‘गेम’कर्जमाफी पात्र लाभार्थींमध्ये स्त्री शेतकर्‍यांचा प्राधान्य गट आहे.  त्यानंतर नियमित कर्ज घेऊन मुदतीत परतफेड करतात, त्यांना  प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. त्यानंतर ३0 जून २0१६  अखेरपर्यंत १ लाख ५0 हजारांपेक्षा कमी रक्कम थकीत  असलेल्या खातेदारांना माफीचा लाभ मिळेल. त्यानंतर १ लाख  ५0 हजारांपेक्षा जास्त रक्कम थकीत असलेल्या शेतकर्‍यांना  अधिकची रक्कम बँकेत भरणा केल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ  मिळण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. त्या गटात  असलेले शेतकरी मोठे आहेत. त्यांना योजनेचा लाभ मिळतो की  नाही, हाच मोठा प्रश्न आता निर्माण होत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी