शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

अहंम् बाजूला ठेवून जीवनात सेवा, सर्मपण अंगिकारा - डॉ. स्मिता कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 8:45 PM

सेवा है यज्ञकुंड..समिधासम हम जले..या वृत्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत मेळघाट येथील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवानिमित्त आयोजित महिला संमेलनात त्यांनी आपले विचार प्रकट केले.

ठळक मुद्देमहिला संमेलनात झाले कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीवर विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जन्माला आल्यावर कोणीच सोबत खिसा घेऊन येत नाही आणि जातानासुद्धा कोणी खिशात काहीच घेऊन जाऊ शकत नाही. अवतीभवती फिरताना, निराशेचे वातावरण, दु:ख, दारिद्रय़ दृष्टीस पडतं. त्यामुळे स्वत:तील अहंम् बाजूला ठेवून जीवनामध्ये सेवा, सर्मपणाचा भाव अंगिकारावा. सेवा है यज्ञकुंड..समिधासम हम जले..या वृत्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत मेळघाट येथील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी व्यक्त केले. अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने स्वराज्य भवन प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवास शनिवारपासून सुरुवात झाली. रविवारी या महोत्सवामध्ये दुपारी महिला संमेलन पार पडले. महिला संमेलनामध्ये महिलांची कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी विचारपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता कोल्हे होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून यावली शहिद येथील भाग्यश्री देशमुख, सुधा जवंजाळ, अँड. श्रद्धा आखरे, शैलजा गावंडे, साक्षी पवार, ग्रामगिताचार्य मंगला पांडे, माजी नगरसेविका पुष्पा गुलवाडे आदी होत्या. डॉ. स्मिता कोल्हे म्हणाल्या की, माझं शिक्षण नागपुरात झालं. एक मुलगी. अनेक अडचणी आल्या; परंतु जिद्दीने अभ्यास केला. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर वकीलीचं शिक्षण घेतलं. नागपुरात दवाखाना थाटला. चांगला जम बसला. पैसाही मिळत होता. सुखसंपन्नता नांदत होती; परंतु समाधान नव्हते. अशातच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांच्याशी परिचय झाला. त्यांनी लग्न करायचे असेल तर  चारशे रुपये महिन्याने घर चालविता आले पाहिजे, दररोज ४0 किमी पायी चालावे लागेल, ५ रुपयांमध्ये लग्न लावावे लागेल आणि वेळप्रसंगी भीक मागावी लागेल. या चार माझ्यासमोर अटी  ठेवल्या. या अटी मी मान्य केल्या आणि मेळघाटमधील जगाशी संपर्क नसलेले बैरागड गावी गेले. पतीसोबत आदिवासींची सेवा करण्यास सुरुवात केली. असं सांगत, डॉ. कोल्हे यांनी, सुखाचा त्याग करून मी अंधारात, जात्यावर दळणं, चूल पेटवणं, सारं काही शिकले.  डॉक्टर होण्यापेक्षा आदिवासी बनून आम्ही जीवन जगलो. स्वत:तला अहंम् बाजूला ठेवला, असे सांगत, त्यांनी जीवनातील अनेक अनुभव यावेळी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ममता इंगोले यांनी केले. 

महिला संमेलनात महिलांच्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीवर विचारमंथनमहिला संमेलनामध्ये अँड. श्रद्धा आखरे हिने, देशात हुंडा प्रतिबंधक कायदे आहेत; परंतु कायद्याची अंमलबजावणी होत नाही. हुंडा देणे व घेण्याचे प्रकार समाजात सर्रास घडत आहेत.  त्यामुळे महिला व युवतींनी हुंडा न देण्याचे धाडस दाखवावे, असे मत व्यक्त केले. साक्षी पवार हिने ग्रामगितेमध्ये राष्ट्रसंतानी महिलोन्नतीचा अध्याय आहे, त्यामुळे ग्रामगितेचा विचार महिलांनी घरामध्ये रूजविण्याची गरज आहे, असे मत मांडले. भाग्यश्री देशमुख, सुधा जवंजाळ, शैलजा गावंडे यांनी महिलांची कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी विषयावर मत व्यक्त केले. 

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजAkola cityअकोला शहर