शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

करडई क्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 1:52 PM

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ४१ हजार तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत सर्वात कमी हे क्षेत्र उरले आहे.

अकोला : करडई तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असून, राज्यात तीन लाख हेक्टरच्यावर असलेले करडईचे क्षेत्र आता केवळ अठरा हजार हेक्टरपर्यंत उरले आहे. हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने करडई पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. यावर्षी पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांना करडई पिकाबाबात मार्गदर्शन केले जात आहे; परंतु याहीवर्षी शेतकऱ्यांनी करडई पेरणीकडे पाठ फिरविली आहे.१९९९-२००० पर्यंत राज्यात करडईचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते; परंतु या पिकाला मिळणारे दर अत्यंत कमी आहेत. गतवर्षी तर प्रतिक्ंिवटल दोन ते दोन हजार पाचशे रुपयेच दर होते. हे पीक काटेरी असल्याने काढण्यासाठी या पिकाला मजूर मिळत नाहीत.परिणामी, या पिकाचे क्षेत्र कमी होत गेले. २०११-१२ पर्यंत राज्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्र होते. विदर्भात तर दोन लाख हेक्टर असलेले हे क्षेत्र याच कारणामुळे कमी झाले. २०११-१२ मध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ४१ हजार तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत सर्वात कमी हे क्षेत्र उरले आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तेलबियांचे अनेक नवे वाण विकसित केले आहे; पण यावर्षीदेखील शेतकºयांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे. मागणी घटल्याने महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने तर करडई बियाण्याचे यावर्षी अल्प नियोजन केले. २०११ पर्यंत राज्यात ४० लाख हेक्टरवर भुईमूग, जवस, सूर्यफूल, करडई व सोयाबीन या तेलबिया पिकांचे उत्पादन घेतले जात होते. यात आता ४ लाख हेक्टरची घट झाली असून, ३६ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली उरले आहे. विशेष म्हणजे, अलीकडच्या काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने या ३६ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये सोयबीनचा वाटा ३२ लाख हेक्टर आहे.करडईचे पीक आरोग्यवर्धक आहे. विदर्भातील शेतकºयांनी हे पीक घ्यावे, यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. चांगले दर मिळाल्यास शेतकरी या पिकाकडे वळतील, असा विश्वास आहे.- डॉ. एस. बी. साखरे, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी