शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Intervieve : मोदींची सोनिया गांधींवरील टीका राजकिय नैराश्यातून - अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 16:45 IST

अकोट: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस व सोनिया गांधी यांच्यावर केलेली टीका ही केवळ राजकिय नैराश्यातून आहे, असे मत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देजनसंघर्ष यात्रा दरम्यान अकोट (जि.अकोला) येथे आलेल्या अशोक चव्हाण यांची ‘लोकमत’ने विशेष मुलाखत घेतली. भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा यांना महाआघाडीत घेण्यास काँग्रेस तयार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्रात आघाडी केल्यानंतर जागा वाटणे हे महत्वाचे नसून जागा निवडून येणे हे महत्वाचे असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

- विजय शिंदेअकोट (जि. अकोला): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस व सोनिया गांधी यांच्यावर केलेली टीका ही केवळ राजकिय नैराश्यातून असून, एखाद्या महिलेबद्दल असे उद्गार काढणे, राजकारणात न शोभणारी बाब आहे. ही टीका म्हणजे त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षण आहे, असे मत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.जनसंघर्ष यात्रा दरम्यान अकोट (जि.अकोला) येथे आलेल्या अशोक चव्हाण यांची ‘लोकमत’ने विशेष मुलाखत घेतली.नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधींना उद्देशून केलेल्या विधानाचा निषेध करीत अशोक चव्हाण यांनी हा प्रकार म्हणजे निश्चितच महिलांचा अपमान असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांचे वाटेल त्या धमक्या देणे, सोनिया गांधी, राहुल गांधी बद्दल वक्तव्य करणे, धाड घालणे, कारवाई करणे, हे राजकिय नैराश्यातून होत आहे.राज्यातील आगामी निवडणूकीच्या आघाडीबाबत बोलताना भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा यांना महाआघाडीत घेण्यास काँग्रेस तयार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. महाआघाडीत एमआयएम हाच खरा अडचणीचा विषय आहे. त्यातून काय मार्ग काढता येईल , तो चर्चेतून काढू. विषय अजून संपलेला नाही. बोलणी सुरु आहे, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.पाच राज्यांतील निवडणुकीनंतर ‘एक्झिट पोल’चा कौल काँग्रेसच्या दिशेने असल्याच्या पृष्ठभूमीवर महाराष्ट्रात आघाडी केल्यानंतर जागा वाटणे हे महत्वाचे नसून जागा निवडून येणे हे महत्वाचे असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. जागावाटपात उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता पाहणे महत्वाचे असल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा