शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Intervieve : मोदींची सोनिया गांधींवरील टीका राजकिय नैराश्यातून - अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 16:45 IST

अकोट: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस व सोनिया गांधी यांच्यावर केलेली टीका ही केवळ राजकिय नैराश्यातून आहे, असे मत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देजनसंघर्ष यात्रा दरम्यान अकोट (जि.अकोला) येथे आलेल्या अशोक चव्हाण यांची ‘लोकमत’ने विशेष मुलाखत घेतली. भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा यांना महाआघाडीत घेण्यास काँग्रेस तयार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्रात आघाडी केल्यानंतर जागा वाटणे हे महत्वाचे नसून जागा निवडून येणे हे महत्वाचे असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

- विजय शिंदेअकोट (जि. अकोला): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस व सोनिया गांधी यांच्यावर केलेली टीका ही केवळ राजकिय नैराश्यातून असून, एखाद्या महिलेबद्दल असे उद्गार काढणे, राजकारणात न शोभणारी बाब आहे. ही टीका म्हणजे त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षण आहे, असे मत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.जनसंघर्ष यात्रा दरम्यान अकोट (जि.अकोला) येथे आलेल्या अशोक चव्हाण यांची ‘लोकमत’ने विशेष मुलाखत घेतली.नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधींना उद्देशून केलेल्या विधानाचा निषेध करीत अशोक चव्हाण यांनी हा प्रकार म्हणजे निश्चितच महिलांचा अपमान असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांचे वाटेल त्या धमक्या देणे, सोनिया गांधी, राहुल गांधी बद्दल वक्तव्य करणे, धाड घालणे, कारवाई करणे, हे राजकिय नैराश्यातून होत आहे.राज्यातील आगामी निवडणूकीच्या आघाडीबाबत बोलताना भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा यांना महाआघाडीत घेण्यास काँग्रेस तयार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. महाआघाडीत एमआयएम हाच खरा अडचणीचा विषय आहे. त्यातून काय मार्ग काढता येईल , तो चर्चेतून काढू. विषय अजून संपलेला नाही. बोलणी सुरु आहे, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.पाच राज्यांतील निवडणुकीनंतर ‘एक्झिट पोल’चा कौल काँग्रेसच्या दिशेने असल्याच्या पृष्ठभूमीवर महाराष्ट्रात आघाडी केल्यानंतर जागा वाटणे हे महत्वाचे नसून जागा निवडून येणे हे महत्वाचे असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. जागावाटपात उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता पाहणे महत्वाचे असल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा