शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घाणीच्या साम्राज्याने डासांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST

------------------------------- रेनकोटच्या विक्रीत झाली वाढ पातूर : तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून, पावसाळी वातावरण कायम आहे. त्यामुळे रेनकोटच्या मागणीत ...

-------------------------------

रेनकोटच्या विक्रीत झाली वाढ

पातूर : तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून, पावसाळी वातावरण कायम आहे. त्यामुळे रेनकोटच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेतील अनेक दुकानात रेनकोट व छत्री विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून, तेथे ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.

---------------------

बँकांत ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

तेल्हारा : शहरातील बँकांत निराधार, वयोवृद्ध, पेन्शनधारक, अपंग यांना योग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेत स्वतंत्र सोय करावी, अशी मागणी आहे.

----------------------

जनावरांचे लसीकरण करण्याची मागणी

तेल्हारा : पावसाळ्याच्या तोंडावर गेल्या वर्षी जनावरांवर साथीच्या आजाराचे मोठे आक्रमण होऊन जनावरे मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यावर्षी जनावरांवर साथीच्या आजाराचे आक्रमण होऊ नये, यासाठी लसीकरण करावे, अशी मागणी आहे.

---------------------

गरिबांच्या घरातून गॅस झाला गायब

अकोट : लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने पैसा नाही. त्यातच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर भडकल्याने खेड्यातील सिलिंडर आता अडगळीत गेला आहे. खेड्यातील नागरिक जंगलातून सरपण आणून चुलीवर स्वयंपाक करीत आहेत.

---------------------------

वाडेगाव येथील पुलावर पडले खड्डे

वाडेगाव : वाडेगाव-अकोला मार्गावरील पुलाजवळ व पुलावर जागोजागी खड्डेच खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागते. त्यातच या पुलाला संरक्षक कठडेही बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे अपघाताचीही शक्यता आहे.

--------------------------

दिग्रस बु. परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित

दिग्रस बु. : पातूर तालुक्यात वीजसमस्या कायम आहे. दिग्रस बु. परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. वीज वितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन बंद असतात. त्यामुळे तक्रार करण्यासही जागा राहात नाही. यापूर्वी अनेकदा वीज वितरणकडे समस्यांबाबत नागरिकांनी निवेदन दिले आहे.

---------------------

घूसर परिसरात दमदार पाऊस

म्हातोडी : परिसरातील घूसर, घूसरवाडी, म्हातोडी, दोनवाडा आदी गावात शनिवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, हळद, ऊस आदी पिके पावसाअभावी सुकू लागली होती.

-----------------------------

अवैध धंद्यांवर आळा घालण्याची मागणी

बार्शीटाकळी : कोरोनाच्या नावाखाली पोलीस विभाग अवैध धंद्यावर आळा बसल्याचे सांगत असले, तरी दुसरीकडे मात्र सट्टा, दारू, जुगार जोमात सुरू आहे. याकडे पोलीस विभागांचे दुर्लक्ष असल्याने अवैध व्यावसायिकांचे चांगलेच फावत आहे.

------------------------------

म्हातोडी गावात अस्वच्छतेचा कहर

म्हातोडी : गावात डासांच्या प्रादुर्भावामुळे अनेक आजार डोके वर काढत असल्याचे दिसून येते आहे. नाल्या तुंबल्या असून खताचे उघडे खड्डे वाहत्या कच्या नाल्या यामुळे त्रास वाढलेला आहे. फवारणी केली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

-----------------------

ग्रामीण भागात बसफेऱ्यांची वानवा

आगर : अकोला तालुक्यातील आगर परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. आगारप्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

-------------------------

व्हायरल फिव्हरमुळे नागरिक हैराण

पिंजर : वातावरणातील बदल व रस्त्याचे काम सुरू असल्याने सगळीकडे धूळ आहे. व्हायरल फिव्हर तसेच सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास अशा विविध आजारांनी नागरिक हैराण असून दवाखान्यात दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी पाहावयास मिळत आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने खोदकामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे.

---------------------

पातुरात पावसाने शेतकरी सुखावले

पातूर : तालुक्यातील शेतकरी पेरणी करून पावसाची वाट पाहत होते. अनेकांची पिके वर आल्यावर पाणी नसल्याने पीक वाळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. आता दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले.

---------------------

ग्रामीण भागात आकोडे टाकून वीजचोरी

बाळापूर : ग्रामीण भागात सर्रास विद्युत खांबावर आकोडे टाकून विजेची चोरी केली जात आहे. या प्रकाराकडे वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वीजचोरी करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

---------------------------

भाजीपाल्याचे भाव वाढल्याने चिंता

तेल्हारा : काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. तालुक्यातील गृहिणींचे आर्थिक बजेट बिघडले आहे. प्रत्येक भाजीवर किलोमागे २० ते ३० रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींमध्ये चिंता आहे.

---------------

पूर्वीप्रमाणे बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी

चिखलगाव : अनलॉक झाल्यानंतरही तालुक्यातील बहुतांश गावात अद्यापही बस जात नाही. तेथील गावकऱ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनधारकही अव्वाच्या सव्वा दराने तिकीट वसूल करीत आहेत.

--------------------------

बाभूळगाव परिसरात पिकांना संजीवनी

पातूर : तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. मरसूळ शिवारात शेतकरी सोयाबीनच्या डवरणीला लागले आहेत. समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत. शेतशिवारात चहलपहल वाढली आहे.