शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
2
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
3
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
5
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
6
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
7
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
8
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
9
२०२६ मध्ये पगारात वाढ होणार की वाट पहावी लागणार? आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट
10
"राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम..."; हिदायत पटेल हत्येवरून काँग्रेसची टीका
11
'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा
12
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
13
BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू
14
लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
15
India-Israel: पंतप्रधान मोदींना नेतान्याहूंचा फोन; दहशतवादाविरुद्ध भारत-इस्रायल एकत्र!
16
“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद
17
IND vs NZ : श्रेयस अय्यरला मोठा दिलासा! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत खेळण्याचा मार्ग झाला मोकळा
18
"जे स्वतःला 'शेर' म्हणायचे, ते आता पळ काढत आहेत"; शिरसाटांचा जलील यांच्यावर हल्लाबोल
19
Viral Video: दोन बसच्या मध्ये रिक्षाला चिरडले! चालकाचा जागेवरच मृत्यू; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ पहा
20
Video: टोनी स्टार्क भाजप, तर हल्कला शिवसेनेकडून उमेदवारी; महाराष्ट्राच्या राजकारणात हॉलिवूडचे सुपरहिरो
Daily Top 2Weekly Top 5

घाणीच्या साम्राज्याने डासांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST

------------------------------- रेनकोटच्या विक्रीत झाली वाढ पातूर : तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून, पावसाळी वातावरण कायम आहे. त्यामुळे रेनकोटच्या मागणीत ...

-------------------------------

रेनकोटच्या विक्रीत झाली वाढ

पातूर : तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून, पावसाळी वातावरण कायम आहे. त्यामुळे रेनकोटच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेतील अनेक दुकानात रेनकोट व छत्री विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून, तेथे ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.

---------------------

बँकांत ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

तेल्हारा : शहरातील बँकांत निराधार, वयोवृद्ध, पेन्शनधारक, अपंग यांना योग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेत स्वतंत्र सोय करावी, अशी मागणी आहे.

----------------------

जनावरांचे लसीकरण करण्याची मागणी

तेल्हारा : पावसाळ्याच्या तोंडावर गेल्या वर्षी जनावरांवर साथीच्या आजाराचे मोठे आक्रमण होऊन जनावरे मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यावर्षी जनावरांवर साथीच्या आजाराचे आक्रमण होऊ नये, यासाठी लसीकरण करावे, अशी मागणी आहे.

---------------------

गरिबांच्या घरातून गॅस झाला गायब

अकोट : लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने पैसा नाही. त्यातच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर भडकल्याने खेड्यातील सिलिंडर आता अडगळीत गेला आहे. खेड्यातील नागरिक जंगलातून सरपण आणून चुलीवर स्वयंपाक करीत आहेत.

---------------------------

वाडेगाव येथील पुलावर पडले खड्डे

वाडेगाव : वाडेगाव-अकोला मार्गावरील पुलाजवळ व पुलावर जागोजागी खड्डेच खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागते. त्यातच या पुलाला संरक्षक कठडेही बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे अपघाताचीही शक्यता आहे.

--------------------------

दिग्रस बु. परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित

दिग्रस बु. : पातूर तालुक्यात वीजसमस्या कायम आहे. दिग्रस बु. परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. वीज वितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन बंद असतात. त्यामुळे तक्रार करण्यासही जागा राहात नाही. यापूर्वी अनेकदा वीज वितरणकडे समस्यांबाबत नागरिकांनी निवेदन दिले आहे.

---------------------

घूसर परिसरात दमदार पाऊस

म्हातोडी : परिसरातील घूसर, घूसरवाडी, म्हातोडी, दोनवाडा आदी गावात शनिवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, हळद, ऊस आदी पिके पावसाअभावी सुकू लागली होती.

-----------------------------

अवैध धंद्यांवर आळा घालण्याची मागणी

बार्शीटाकळी : कोरोनाच्या नावाखाली पोलीस विभाग अवैध धंद्यावर आळा बसल्याचे सांगत असले, तरी दुसरीकडे मात्र सट्टा, दारू, जुगार जोमात सुरू आहे. याकडे पोलीस विभागांचे दुर्लक्ष असल्याने अवैध व्यावसायिकांचे चांगलेच फावत आहे.

------------------------------

म्हातोडी गावात अस्वच्छतेचा कहर

म्हातोडी : गावात डासांच्या प्रादुर्भावामुळे अनेक आजार डोके वर काढत असल्याचे दिसून येते आहे. नाल्या तुंबल्या असून खताचे उघडे खड्डे वाहत्या कच्या नाल्या यामुळे त्रास वाढलेला आहे. फवारणी केली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

-----------------------

ग्रामीण भागात बसफेऱ्यांची वानवा

आगर : अकोला तालुक्यातील आगर परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. आगारप्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

-------------------------

व्हायरल फिव्हरमुळे नागरिक हैराण

पिंजर : वातावरणातील बदल व रस्त्याचे काम सुरू असल्याने सगळीकडे धूळ आहे. व्हायरल फिव्हर तसेच सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास अशा विविध आजारांनी नागरिक हैराण असून दवाखान्यात दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी पाहावयास मिळत आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने खोदकामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे.

---------------------

पातुरात पावसाने शेतकरी सुखावले

पातूर : तालुक्यातील शेतकरी पेरणी करून पावसाची वाट पाहत होते. अनेकांची पिके वर आल्यावर पाणी नसल्याने पीक वाळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. आता दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले.

---------------------

ग्रामीण भागात आकोडे टाकून वीजचोरी

बाळापूर : ग्रामीण भागात सर्रास विद्युत खांबावर आकोडे टाकून विजेची चोरी केली जात आहे. या प्रकाराकडे वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वीजचोरी करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

---------------------------

भाजीपाल्याचे भाव वाढल्याने चिंता

तेल्हारा : काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. तालुक्यातील गृहिणींचे आर्थिक बजेट बिघडले आहे. प्रत्येक भाजीवर किलोमागे २० ते ३० रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींमध्ये चिंता आहे.

---------------

पूर्वीप्रमाणे बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी

चिखलगाव : अनलॉक झाल्यानंतरही तालुक्यातील बहुतांश गावात अद्यापही बस जात नाही. तेथील गावकऱ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनधारकही अव्वाच्या सव्वा दराने तिकीट वसूल करीत आहेत.

--------------------------

बाभूळगाव परिसरात पिकांना संजीवनी

पातूर : तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. मरसूळ शिवारात शेतकरी सोयाबीनच्या डवरणीला लागले आहेत. समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत. शेतशिवारात चहलपहल वाढली आहे.