मूर्तिजापूर तहसील कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण
By Admin | Updated: December 26, 2014 01:06 IST2014-12-26T01:06:19+5:302014-12-26T01:06:19+5:30
तब्बल ४३ पदे रिक्त : उपलब्ध कर्मचा-यांवर कामाचा ताण, नागरिकांनाही त्रास.

मूर्तिजापूर तहसील कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण
मूर्तिजापूर (अकोला) : स्थानिक तहसील कार्यालयातील कर्मचार्यांची तब्बल ४३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे तेथे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांवर कमालीचा ताण येत आहे, तर कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे. मूर्तिजापूर तहसील कार्यालयात कर्मचार्यांची १५१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्य:स्थितीत १0८ कर्मचारी कार्यालयात कार्यरत आहेत; मात्र थोडीथोडकी नव्हे, तर ४३ कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. तालुक्यातील नागरिकांच्या अनेक कामांवर त्याचा परिणाम होत आहे. तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांना लागणारी विविध प्रकारची कागदपत्रे, प्रमाणपत्रे व मूलभूत गरजांच्या पूर्ततेशी संबंधित कामे तहसील स्तरावरच होतात. ही कामे करण्यासाठी निदान कार्यालयासाठी मंजूर असलेली कर्मचार्यांची पदे वरिष्ठ प्रशासनाकडून भरली जाणे आवश्यक असते. या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ह्यशासन आपल्या दारीह्ण आणि शासनाच्या जनहितार्थ सेवांचा फज्जा उडत आहे. मूर्तिजापूर तहसील कार्यालयात रिक्त असणार्या पदांपैकी महत्त्वाच्या असलेल्या सामान्य प्रशासनाच्या आस्थापनेमध्ये पाच पदे रिक्त आहेत. पुरवठा विभागात पाच पदे रिक्त आहेत. त्याचा रेशन वाटपासंबंधीच्या कामांवर परिणाम होत आहे. रेशन कार्ड मिळण्यासंबंधीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. निवडणूक विभागातील कनिष्ठ लिपिकाचे पद रिक्त आहे. विशेष बाब म्हणजे, या विभागाचे नायब तहसीलदार मोरे या ३१ मार्चला सेवानवृत्त होणार आहेत. त्यामुळे ३१ मार्चनंतर या विभागात दोन पदे रिक्त होतील. संजय गांधी निराधार योजना विभागात चार पदे रिक्त आहेत. त्यातही या विभागाचे नायब तहसीलदार पी. के. देशमुख हे ३१ डिसेंबरला सेवानवृत्त होणार आहेत. त्यामुळे तेथील पाच पदे रिक्त राहतील. त्याचा विभागाच्या कामकाजाला मोठा फटका बसणार आहे. तहसील कार्यालयात ४३ रिक्त पदे आहेत. त्या पदांवर भरती व्हावी, यासाठी मी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. या रिक्त पदांमुळे कामकाजावर निश्चितपणे परिणाम होत असल्याची स्विकारोक्ती तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांनी दिली.