शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

दुकानाचा बेकायदा ताबा; परस्परांविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 01:31 IST

मंजूर इलाही खान महम्मद खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दूकानाबाबत न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला असून, अ. हबीब यांनी स्वत:च दुकान रिकामे करून दिल्याचे त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. 

ठळक मुद्दे ताबा घेण्याची प्रक्रिया चुकीची

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मोहम्मद अली रोड परिसरातील दुकानामध्ये बुधवारी रात्री उशिरा दुकानाचे कुलूप तोडून गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी दुकानाचा बेकायदा ताबा घेतल्याची तक्रार अ. हबीब यांनी केली, तर मंजूर इलाही खान महम्मद खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दूकानाबाबत न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला असून, अ. हबीब यांनी स्वत:च दुकान रिकामे करून दिल्याचे त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. अब्दुल हबीब अब्दुल सलाम (६0) आणि मंजूर इलाही खान महम्मद खान या दोघांमध्ये मोहम्मद अली रोडवर हैदराबाद येथील शब्बीरभाई कादरभाई यांचे बेरार सोडा फॅक्टरी नावाच्या दुकान मालकीवरून दिवाणी न्यायालय व मुंबई येथील न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयाने मंजूर इलाही यांच्या बाजूने निकाल दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या निकालानंतर मंजूर इलाही यांनी त्यांचे दुकान रिकामे करून देण्यासाठी अ. हबीब यांना सांगितले होते, त्यानुसार हबीब यांनी बुधवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान स्वत:च दुकान खाली करून दिल्याचे मंजूर इलाही यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पैशासाठी हबीब हे खोट्या तक्रारी करीत असल्याचे मंजूर इलाही यांचे म्हणणे आहे. तर अ. हबीब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे दुकान रात्री ३ वाजता जबरदस्तीने गुन्हेगारांनी खाली केले आहे. दोन्ही गटाकडून परस्पर तक्रारी करण्यात आलेल्या असून, पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.   दरम्यान या प्रकरणात दूकान रिकामे करण्याची प्रक्रिया सीसी कॅमेर्‍यात कैद झालीआहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास करायला हवा, न्यायालयाने विरोधी गटाच्या बाजूने निकाल दिलेला असेल तर त्यांनी गुंडांचा वापर करून अशा प्रकारे रात्रीच्या दरम्यान हातात शस्त्र घेऊन दुकान खाली करण्याची प्रक्रिया चुकीची असल्याचे  स्पष्ट होत आहे. 

ताबा घेण्याची प्रक्रिया चुकीचीन्यायालयाने दुकान मालकाच्या बाजूने निकाल दिला असला तरी दुकानाचा रात्री ताबा घेण्याची प्रक्रिया चुकीची असल्याची माहिती एका ज्येष्ठ विधिज्ञाने दिली. न्यायालयाच्या निकालानंतर दिलेल्या कालावधीत दुकान रिकामे न केल्यास न्यायालयात ऑर्डर २१ रूल २२ नुसार याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे, त्यानंतर न्यायालय निर्णय देइल त्यानुसार दुकानाचा ताबा मिळविता येतो; मात्र रात्रीच्यावेळी  जबरदस्तीनेदुकान खाली करण्याचा पर्याय नसून, ही प्रक्रिया चुकीची आहे.

मी माझे दुकान स्वत: रिकामे केले नाही. रात्रीच्यावेळी दुकान खाली करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. बुधवारी रात्री ३ च्या दरम्यान गुंडांचा वापर करून माझे दुकान रिकामे केले आहे. न्यायालयाने माझ्या विरोधात निकाल दिलेला आहे की नाही, या संदर्भात पूर्ण माहिती नाही; मात्र अशा प्रकारे दुकान खाली केल्यामुळे मी तणावाखाली आहे. - अ. हबीब अ. सलाम-

टॅग्स :Ramdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनAkola cityअकोला शहरCrimeगुन्हा