हगणदरीमुक्त गावांची होणार फेरतपासणी!

By Admin | Updated: November 20, 2015 02:38 IST2015-11-20T02:38:36+5:302015-11-20T02:38:36+5:30

स्वच्छ भारत अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यातील ३५ गावे हगणदरीमुक्त.

Hundreds of villages will be recaptured! | हगणदरीमुक्त गावांची होणार फेरतपासणी!

हगणदरीमुक्त गावांची होणार फेरतपासणी!

मनोज भिवगडे / अकोला: स्वच्छ भारत अभियानांतर्गत १६ नोव्हेंबरपर्यंंत जिल्ह्यात ३५ गावे हगणदरीमुक्त घोषित करण्यात आली असून, हगणदरीमुक्त झालेल्या गावांची नोव्हेंबरअखेर शासनामार्फत नियुक्त राज्यस्तरीय समितीकडून फेरतपासणी करण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावर्षी जिल्ह्यात १७२ गावे हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदमार्फत ठरविण्यात आले आहे. त्यासाठी दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांच्या घरी शौचालय बांधण्याची मोहीमदेखील जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये बेसलाइन सर्व्हेनुसार जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात गत १६ नोव्हेंबरपर्यंंत शौचालयांची ९0 टक्के कामे पूर्ण झालेली ३५ गावे ऑनलाइन हगणदरीमुक्त घोषित करण्यात आली. ग्रामसेवकांमार्फत संबंधित गावांमध्ये करण्यात आलेल्या बेसलाइन सर्वेक्षणानुसार व त्यांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे स्वच्छ भारत अभियानच्या संकेतस्थळावर जिल्ह्यातील ही गावे ह्यऑनलाइनह्ण हगणदरीमुक्त घोषित करण्यात आली.

Web Title: Hundreds of villages will be recaptured!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.