शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मूर्तिजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 18:21 IST

Agriculture News : सोयाबीन काढणीच्या वेळी जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात पडून असल्याने ते सडले आहे.

-संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात परतीच्या पावसाने शनिवार दुपारपासूनच जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत होऊन बळीराजा संकटात पडला आहे.ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात पडून असल्याने ते सडले आहे. या अस्मानी संकटाने शेतकऱ्याच्या नाकी नऊ आणले आहे.             दिवाळी सण तोंडावर असतांना निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे दिवाळ निघाले आहे. वर्षभर  शेतात राब-राब राबून अथक परिश्रमाने पिकविलेले सोयाबीन, कपासी, तूर, मुग आदी पिकाचे परतीच्या पावसामुळे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहे. सोयाबीन व ज्वारी पिकाची काढणी सुरू असताना त्यावर धो-धो पाऊस आल्याने संपूर्ण पिके उध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात शनिवार पासून सतत पाऊस सुरू आहे. मध्यंतरी काही दिवस पावसाने सवड दिल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी, मका, कापूस, भूईमुग यांसारखी पिके काढणी सुरू असतांना पाण्याखाली गेली आहे. बहुतेक शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहे. आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हा हिरावल्याचे चित्र आहे. सोयाबीन, कापसाच्या बोंड्या पावसामुळे सडल्या आहे. शासनाने नुकसान ग्रस्तांची त्वरित पाहणी करून कृषी विभागाच्या व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे व प्रशासनाच्या वतीने दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेती