शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिह्यात दुष्काळी सवलतींची आस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:19 AM

संतोष येलकर...........अकोला: जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे जाहीर करण्यात आल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याचे वास्तव समोर आले ...

संतोष येलकर...........अकोला: जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे जाहीर करण्यात आल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याचे वास्तव समोर आले आहे. अंतिम पैसेवारी जाहीर होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या नाही. त्यामुळे शासनामार्फत जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू होणार तरी केव्हा, याबाबतची आस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मूग व उडीद पिकांचे उत्पादन बुडाले तसेच सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर आदी पिकांच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील लागवडीयोग्य ९९० गावांमधील खरीप पिकांची अंतिम सरासरी पैसेवारी ४७ पैसे आहे. खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी म्हणजेच ४७ पैसे असल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट असल्याचे वास्तव समोर आले आहे. अंतिम पैसेवारी जाहीर होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू करण्याचा आदेश शासनाकडून केव्हा काढण्यात येणार, याबाबतची आस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली आहे.

लागवडीयोग्य गावांतील अंतिम

पैसेवारीचे असे आहे वास्तव!

तालुका गावे पैसेवारी

अकोला १८१ ४६

अकोट १८५ ४८

तेल्हारा १०६ ४५

बाळापूर १०३ ४७

पातूर ९४ ४८

मूर्तिजापूर १६४ ४७

बार्शीटाकळी १५७ ४८

...................................................................

एकूण ९९० ४७

‘या’ सवलती लागू होण्याची आहे प्रतीक्षा!

जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी म्हणजेच ४७ पैसे असल्याने दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात जमीन महसुलात सूट, कृषी पंपांच्या वीज देयकांत सूट, शेतकऱ्यांच्या पाल्यांना परीक्षा शुल्क माफी, शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्ज वसुलीस स्थगिती इत्यादी दुष्काळी सवलती लागू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.