शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नुकसान मोठे; मदत तुटपुंजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 10:46 IST

जिल्ह्यात १ हजार ४ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पीक नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून शनिवारी मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार दोन हेक्टर मर्यादेपर्यंत खरीप पिकांसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. जिल्ह्यात ३ लाख ९ हजार ३४१ शेतकऱ्यांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांच्या लागवडीसाठी शेतकºयांनी केलेला खर्च आणि हाताशी आलेल्या पिकांचे बुडालेले उत्पादन बघता, पिकांचे नुकसान मोठे असून, त्या तुलनेत जाहीर झालेली मदत ही अत्यंत तुटपुंजी ठरणार आहे.गत महिनाभराच्या कालावधीत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर इत्यादी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले, तसेच बागायती व फळ पिकांचेही नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने शेतकरी संकटात सापडला. जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात १ हजार ४ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामध्ये जिरायत, बागायत व फळ पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी राज्यपालांकडून १६ नोव्हेंबर रोजी मदत जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत मर्यादेत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शेतकºयांना मिळणार आहे; परंतु पिकांच्या लागवडीसाठी शेतकºयांनी केलेला खर्च आणि पिकांचे बुडालेले उत्पादन लक्षात घेता, पिकांचे नुकसान प्रचंड असून, त्या तुलनेत जाहीर झालेली नुकसान भरपाईची मदत अत्यंत तोकडी ठरणार असल्याचे वास्तव आहे.दोन हेक्टरची मर्यादा; अनेक शेतकºयांवर अन्याय!पीक नुकसान भरपाईपोटी राज्यपालांकडून जाहीर झालेली मदत दोन हेक्टर मर्यादेपर्यंतच मिळणार आहे; परंतु अवकाळी पावसाच्या तडाख्यात अनेक शेतकºयांच्या दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे उत्पादन बुडाले आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाईच्या मदतीत दोन हेक्टर क्षेत्राची मर्यादा अनेक बाधित शेतकºयांवर अन्याय करणारी ठरणार आहे.अवकाळी पावसाने पीक नुकसान भरपाईची दोन हेक्टरपर्यंत मर्यादेत खरीप पिकांसाठी जाहीर करण्यात आलेली हेक्टरी ८ हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकºयांची थट्टा आहे. पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च आणि पिकांचे बुडालेले उत्पादन यासंदर्भात विचार केल्यास जाहीर झालेली मदत ही अत्यंत कमी आहे. तसेच दोन हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांवर अन्याय होणार आहे.- शिवाजीराव भरणे,शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती