शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

मुसळधार पावसाचा महावितरणला फटका, अनेक गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:17 AM

विदर्भासह राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मोर्णा व पुर्णा नदीकाठची गावे पाण्यात गेली आहेत. पुराच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड ...

विदर्भासह राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मोर्णा व पुर्णा नदीकाठची गावे पाण्यात गेली आहेत. पुराच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की, या पुरात मोर्णा नदीच्या काठालगतचे १५ उच्चदाब वाहिनीचे तर २ लघुदाब वाहिनीचे वीज खांब आणि त्यावरील वीजवाहिन्या वाहून गेल्या आहेत. उच्च व लघुदाब वाहिनीचे १७५ वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. ६१ वीज खांब तुटले आहेत तर २८१ वीज खांब जमिनीलगत झुकले आहेत. याचबरोबर १० वितरण रोहित्रे पडल्याने मोर्णा आणि पुर्णा नदी परिसरातील २४ गावे अंधारात गेली होती.

या गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत

अशा परिस्थितीतही महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यांसह, कंत्राटदारांच्या मदतीने युद्धस्तरावर कामाला सुरुवात केली. सर्वत्र चिखल, पाणी असल्याने वीज खांब, वीज वाहिन्या वाहून नेणे आणि अशा दलदलीत वीज यंत्रणेची उभारणी करणे अशक्यप्राय कामे करण्यात आली. परिणामी, निंबी, म्हैसपूर, रिधोरा, सुकोडा, पाचमोरी, न्यू सुकोडा, जुना सुकोडा, अमानतपूर, ताकोडा, जलम, टाकळी, वाकापूर, गडंकी या गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.

ही गावे अंधारातच

लोणी, भोड, सांगवी, मोहाडी, कानडी, वाखी, आखतवाडा, आगर, लोणाग्रा, दुधाळा, मांडला, कांचनपूर, बदलापूर, नवथळ आणि खेकडी या गावांचा वीजपुरवठा खंडित आहे. वीजपुरवठा बंद असलेली सर्व गावे ही उगवा वाहिनीवर असून या वाहिनीचे वीज खांब मोर्णा नदीच्या पुरात वाहून गेले आहेत. शिवाय मोर्णा व पुर्णा नदीच्या पूरस्थितीमुळे या गावांना जोडणारे रस्ते बंद असल्याने संपर्क होणे कठीण झाले आहे. पूरस्थिती ओसरताच या गावांचाही वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांच्या मार्गदर्शनात आणि उपकार्यकारी अभियंता सारंगधर केनेकर यांच्या नेतृत्वात तसेच अभियंते अजय भोकरे, हेमलता पाटील, तायडे, दीपक देशमुख, प्रवीण बदुकाले, सचिन कळुसे यांच्यासह जनमित्र श्रीशिव निंबेकर, प्रशांत शेळके, जितू गवई, शुभम मोहोड, आमटे, भागवत, अभय भारसाकळे, संजय कागणे, सोळंके, वाघोलीकर, तायडे, विजय केने आदी कार्यरत आहेत.