शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करांना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
4
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
5
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
6
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
7
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
8
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
9
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
10
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
11
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
12
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
13
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
14
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
15
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
16
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
17
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
18
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
19
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
20
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव

पावसामुळे दाणादाण; नद्या, सिंचन प्रकल्प तुडूंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 15:21 IST

जिल्हाभरातील शेतकरी संकटात सापडले असून आगामी रब्बी हंगामावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदा आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले असून जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या व सर्वच सिंचन प्रकल्प तुडुंब झाले आहेत. अती पावसामुळे सोयाबिन, तूर, कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान होण्यासोबतच काहीठिकाणी शेतजमिनी देखील चिबडल्या आहेत. यामुळे जिल्हाभरातील शेतकरी संकटात सापडले असून आगामी रब्बी हंगामावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी शनिवारी जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये यंदा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पावसाने विश्रांती घेतली होती. तोपर्यंत ६९२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला नाही; मात्र त्यानंतर ऐन सोयाबिन सोंगणीच्या हंगामात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोंगून आणि ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुड्यांमध्ये पाणी शिरल्याने सोयाबिनला बुरशी चढण्यासोबतच चक्क कोंब फुटल्याचा गंभीर प्रकार घडला. यासह अती पावसामुळे ऐन बहरलेल्या अवस्थेत असलेल्या कपाशीची बोंडे पूर्णत: खराब झाली. तूर या पिकालाही जबर फटका बसला. याशिवाय संत्रा, ऊसाच्या बागा आणि शेवंती, झेंडू यासह अन्य फुलझाडांचेही पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी होऊन जमिनी चिबडल्या आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम तोंडावर असताना या हंगामात पेरणी करण्यासाठी जमिनीची मशागत करणे अवघड झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण आणि पंचनामे करण्याकरिता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा झटत असल्याचे दिसून येत आहे. पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना इशारावाशिम : बुलडाणा जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक पाहून बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग वाढवला अथवा कमी केला जात आहे. तसेच पैनगंगा नदीच्या वरील बाजूस असलेला बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी मध्यम प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला असून त्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता असून वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीवर असलेल्या ११ बॅरेजचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात जावू नये, अथवा आपली जनावरे नदीपात्रात सोडू नयेत, असा इशारा वाशिम पाटबंधारे विभागाने दिला आहे.

पैनगंगेच्या पुरामुळे झाले पिकांचे नुकसानरिसोड : बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरणातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे पैनगंगा नदीवरील काही बॅरेजेसचे दरवाजे शनिवारी उघडण्यात आले. यामुळे नदीला मोठा पूर येऊन त्याचे पाणी रिसोड तालुक्यातील वाकद या गावातील अनेक शेतकºयांच्या थेट शेतात घुसले. परिणामी, शेतात रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुड्या पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. यासह बाळखेडच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाकद व बाळखेड या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असल्याने गावकºयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती