शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे दाणादाण; नद्या, सिंचन प्रकल्प तुडूंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 15:21 IST

जिल्हाभरातील शेतकरी संकटात सापडले असून आगामी रब्बी हंगामावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदा आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले असून जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या व सर्वच सिंचन प्रकल्प तुडुंब झाले आहेत. अती पावसामुळे सोयाबिन, तूर, कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान होण्यासोबतच काहीठिकाणी शेतजमिनी देखील चिबडल्या आहेत. यामुळे जिल्हाभरातील शेतकरी संकटात सापडले असून आगामी रब्बी हंगामावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी शनिवारी जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये यंदा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पावसाने विश्रांती घेतली होती. तोपर्यंत ६९२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला नाही; मात्र त्यानंतर ऐन सोयाबिन सोंगणीच्या हंगामात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोंगून आणि ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुड्यांमध्ये पाणी शिरल्याने सोयाबिनला बुरशी चढण्यासोबतच चक्क कोंब फुटल्याचा गंभीर प्रकार घडला. यासह अती पावसामुळे ऐन बहरलेल्या अवस्थेत असलेल्या कपाशीची बोंडे पूर्णत: खराब झाली. तूर या पिकालाही जबर फटका बसला. याशिवाय संत्रा, ऊसाच्या बागा आणि शेवंती, झेंडू यासह अन्य फुलझाडांचेही पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी होऊन जमिनी चिबडल्या आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम तोंडावर असताना या हंगामात पेरणी करण्यासाठी जमिनीची मशागत करणे अवघड झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण आणि पंचनामे करण्याकरिता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा झटत असल्याचे दिसून येत आहे. पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना इशारावाशिम : बुलडाणा जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक पाहून बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग वाढवला अथवा कमी केला जात आहे. तसेच पैनगंगा नदीच्या वरील बाजूस असलेला बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी मध्यम प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला असून त्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता असून वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीवर असलेल्या ११ बॅरेजचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात जावू नये, अथवा आपली जनावरे नदीपात्रात सोडू नयेत, असा इशारा वाशिम पाटबंधारे विभागाने दिला आहे.

पैनगंगेच्या पुरामुळे झाले पिकांचे नुकसानरिसोड : बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरणातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे पैनगंगा नदीवरील काही बॅरेजेसचे दरवाजे शनिवारी उघडण्यात आले. यामुळे नदीला मोठा पूर येऊन त्याचे पाणी रिसोड तालुक्यातील वाकद या गावातील अनेक शेतकºयांच्या थेट शेतात घुसले. परिणामी, शेतात रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुड्या पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. यासह बाळखेडच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाकद व बाळखेड या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असल्याने गावकºयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती