शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

पावसामुळे दाणादाण; नद्या, सिंचन प्रकल्प तुडूंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 15:21 IST

जिल्हाभरातील शेतकरी संकटात सापडले असून आगामी रब्बी हंगामावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदा आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले असून जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या व सर्वच सिंचन प्रकल्प तुडुंब झाले आहेत. अती पावसामुळे सोयाबिन, तूर, कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान होण्यासोबतच काहीठिकाणी शेतजमिनी देखील चिबडल्या आहेत. यामुळे जिल्हाभरातील शेतकरी संकटात सापडले असून आगामी रब्बी हंगामावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी शनिवारी जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये यंदा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पावसाने विश्रांती घेतली होती. तोपर्यंत ६९२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला नाही; मात्र त्यानंतर ऐन सोयाबिन सोंगणीच्या हंगामात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोंगून आणि ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुड्यांमध्ये पाणी शिरल्याने सोयाबिनला बुरशी चढण्यासोबतच चक्क कोंब फुटल्याचा गंभीर प्रकार घडला. यासह अती पावसामुळे ऐन बहरलेल्या अवस्थेत असलेल्या कपाशीची बोंडे पूर्णत: खराब झाली. तूर या पिकालाही जबर फटका बसला. याशिवाय संत्रा, ऊसाच्या बागा आणि शेवंती, झेंडू यासह अन्य फुलझाडांचेही पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी होऊन जमिनी चिबडल्या आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम तोंडावर असताना या हंगामात पेरणी करण्यासाठी जमिनीची मशागत करणे अवघड झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण आणि पंचनामे करण्याकरिता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा झटत असल्याचे दिसून येत आहे. पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना इशारावाशिम : बुलडाणा जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक पाहून बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग वाढवला अथवा कमी केला जात आहे. तसेच पैनगंगा नदीच्या वरील बाजूस असलेला बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी मध्यम प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला असून त्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता असून वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीवर असलेल्या ११ बॅरेजचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात जावू नये, अथवा आपली जनावरे नदीपात्रात सोडू नयेत, असा इशारा वाशिम पाटबंधारे विभागाने दिला आहे.

पैनगंगेच्या पुरामुळे झाले पिकांचे नुकसानरिसोड : बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरणातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे पैनगंगा नदीवरील काही बॅरेजेसचे दरवाजे शनिवारी उघडण्यात आले. यामुळे नदीला मोठा पूर येऊन त्याचे पाणी रिसोड तालुक्यातील वाकद या गावातील अनेक शेतकºयांच्या थेट शेतात घुसले. परिणामी, शेतात रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुड्या पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. यासह बाळखेडच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाकद व बाळखेड या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असल्याने गावकºयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती