शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निम्मी तूर शेतकऱ्यांच्या घरातच!

By admin | Updated: April 18, 2017 01:55 IST

मुदतवाढ तोकडी : जिल्ह्यात ‘नाफेड’द्वारे दोन लाख क्विंटल तुरीची खरेदी

संतोष येलकर - अकोलाहमी दराच्या तूर खरेदीत ‘नाफेड’द्वारे जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर सोमवारपर्यंत २ लाख २६ हजार ८५९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली; मात्र ‘नाफेड’द्वारे तूर खरेदीत खरेदी केंद्रांवर मोजमापासाठी करावी लागणारी प्रचंड प्रतीक्षा आणि बाजारात तुरीला कमी भाव मिळत असल्याने, जिल्ह्यात निम्मी अधिक तूर अद्याप तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. त्यामुळे हमी दराने तूर खरेदीसाठी ‘नाफेड’द्वारे देण्यात आलेली आठ दिवसांची मुदतवाढ तोकडी असल्याची स्थिती आहे.शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये हमी दराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात येत आहे, तर अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी खरेदी केंद्रांवर ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी करण्यात येत आहे. खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे; मात्र बारदान्याचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या असल्याने तूर खरेदी संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दीड महिना उलटून जात असला, तरी तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. तुरीच्या मोजमापासाठी शेतकरी प्रतीक्षेत असतानाच १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजतापासून बंद करण्यात येणाऱ्या तूर खरेदीला नाफेडमार्फत २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यावर्षी जिल्ह्यात तुरीचे उत्पादन चांगले झाल्याने खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर १७ एप्रिलपर्यंत २ लाख २६ हजार ८५९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली; मात्र नाफेडद्वारे संथतीने करण्यात येत असलेली तूर खरेदी, मोजमापाला होणारा प्रचंड विलंब आणि बाजारात व्यापाऱ्यांकडून तुरीला मिळणारा कमी भाव यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रांवर आणि बाजारात तूर विकण्यासाठी आणणे टाळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात निम्म्यापेक्षा अधिक तूर अद्याप शेतकऱ्यांच्या घरातच पडून असल्याची स्थिती आहे. या पृष्ठभूमीवर हमी दराने तूर खरेदीसाठी नाफेडद्वारे देण्यात आलेली आठ दिवसांची मुदतवाढ अत्यंत तोकडी असून, तूर खरेदीला महिनाभराची मुदतवाढीची गरज असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.खरेदीची गती वाढवा; मुदतवाढ एक महिन्याची द्या!नाफेडद्वारे तूर खरेदीत तुरीच्या मोजमापाला दीड-दोन महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे आणि बाजारात तुरीला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी निम्म्यापेक्षा अधिक तूर विकण्यासाठी न आणता घरातच ठेवली आहे. त्यामुळे नाफेडमार्फत तूर खरेदीची गती वाढविण्यात यावी आणि हमी दराने तूर खरेदी करण्यासाठी १५ मेपर्यंत महिनाभराची मुदतवाढ दिली पाहिजे, अशी मागणी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांच्यासह अकोला तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष गजानन पावसाळे, देवेंद्र देवर,, गोवर्धन काकड (सांगळूद), ज्ञानेश्वर महल्ले (दुधलम),सुनील गोंडचवर (खरप खुर्द, रवींद्र अवचार (कोठारी) इत्यादी शेतकऱ्यांनी केली आहे.‘नाफेड’द्वारे खरेदी करण्यात आलेली अशी आहे तूर! नाफेडद्वारे जिल्ह्यातील सातही तालुक्यातील तूर पाच खरेदी केंद्रांवर करण्यात येत आहे. पाचही खरेदी केंद्रांवर १७ एप्रिलपर्यंत २ लाख २६ हजार ८५९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यामध्ये अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अकोला, पातूर व बाळापूर या तीन तालुक्यातील ७७ हजार ६७९ क्विंटल, तेल्हारा खरेदी केंद्रावर २७ हजार ५०० क्विंटल, बार्शीटाकळी खरेदी केंद्रावर ३४ हजार ७०० क्विंटल, अकोट येथील खरेदी केंद्रावर ५२ हजार क्विंटल आणि मूर्तिजापूर येथील खरेदी केंद्रावर ३५ हजार क्विंटल तूर करण्यात आली आहे.तीन लाख क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात!हमी दराने नाफेडद्वारे तूर खरेदी केंद्रांवर तुरीच्या मोजमापासाठी दीड महिना करावी लागणारी प्रतीक्षा आणि बाजारात व्यपाऱ्यांकडून तुरीला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत १७ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात २ लाख २६ हजार ८५९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असली तरी, त्यापेक्षा अधिक तीन क्विंटल तूर अद्याप शेतकऱ्यांच्या घरातच पडून असल्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.