शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 18:32 IST

अकोला:  पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या  अध्यक्षतेखाली पावसाळी अधिवेशनानंतर आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

अकोला:  पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या  अध्यक्षतेखाली पावसाळी अधिवेशनानंतर आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.  आज झालेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या 202 तक्रारी प्राप्त झाल्या.  या सभेच्या माध्यमातून  तक्रारदारांना दिलासा मिळाला असून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री   डॉ. रणजीत पाटील  यांनी स्वत: लोकांकडे जाऊन त्यांच्या  तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसाच्या आत  निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही त्यांना दिला.

जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात  करण्यात आले होते.   यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर,  अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिल्लारे , प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे आदींसह विविध विभागांचे  विभागप्रमुख उपस्थित होते.

 मागील तक्रारीचे  सर्व विभागांनी 90 टक्के अनुपालन केल्यामुळे सर्व विभागाच्या अधिका-यांचे त्यांनी कौतुक केले. यापुढेही आपली सामाजिक बांधिलीकी समजुन नागरीकांच्या  तक्रारींचे निरासरण करून त्यांना  योग्य न्याय दयावा. अशा सुचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केल्यात. अर्ध न्यायीक  प्रकरणाबाबत  वरीष्ठ अधिका-यांकडे अपील करून न्याय मिळवावा किंवा  पालकमंत्री यांच्या कडे  प्रकरणाबाबत  निवेदन दयावे असे त्यांनीही सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदने स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली या बाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली. व संबंधीत अधिका-यांना तशा सुचना दिल्यात. जनतेच्या तक्रारीचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा  उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले.     या तक्रार निवारण दिनाला उपविभागीय अधिकारी  डॉ. निलेश अपार , अभयसिंग मोहिते, रमेश पवार, रामदास सिध्दभट्टी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अतुल तराणीया , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरुण वाघमारे, तहसिलदार गटविकास अधिकारी  तसेच विविध विभागाचे  प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

  विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील

 महसूल विभाग –58  तक्रारी,  पोलीस विभाग—21,  जिल्हा परिषद-- 43,  मनपा-24,  विद्युत विभाग –16,  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था-06,  भूमी अभिलेख – 05, कृषी विभाग –04, जिल्हा अग्रणी बँक –03,एस.टी. महामंडळ-1, पाटबंधारे विभाग-05, पीकेव्ही-01, जिल्हा शल्य चिकित्सक-02,  जिल्हा विपनण अधिकारी – 2,उपसंचालक आरोग्य सेवा-02- , पाटबंधारे विभाग- 03, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 01,वनविभाग-03, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी- 01, सार्वजनिक बांधकाम- 03,  सहाय्यक आयुक्त कामगार कल्याण-01, जिल्हा शल्य चिकित्सक- 02,  जात पडताळणी समिती-02, जिल्हा अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क -02,   अशा एकुण नविन 202 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या.

       

टॅग्स :Dr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलAkolaअकोला