शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दोन वर्षांनंतर मिळाला स्मार्ट ग्रामपंचायतींसाठी निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:28 PM

राज्यातील ३४ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ४० लाख रुपये निधी वाटप होणार आहे.

अकोला : जिल्हा स्मार्ट ग्राम योजनेत २०१७-१८ मध्ये निवड झालेल्या राज्यातील ३४ ग्रामपंचायतींना देय असलेल्या बक्षिसाची रक्कम ४० लाख रुपये उपलब्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्याचवेळी राज्यातील तालुका स्मार्ट ग्राम म्हणून निवड झालेल्या ३५१ ग्रामपंचायतींना बक्षिसाच्या निधीची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतींची निवड केली जाते. त्यामध्ये जिल्हा स्तरावर प्रथम ग्रामपंचायतींना ४० लाख तर तालुका स्तरावर प्रथम ग्रामपंचायतींना १० लाख रुपये निधी बक्षीस स्वरूपात दिला जातो. त्यासाठी राज्य शासनाकडून निधीची तरतूद केली जाते; मात्र शासनाकडून निधीची तरतूद करण्यात सातत्याने हात आखडता घेण्याचा प्रत्यय गत दोन वर्षांपासून ग्रामपंचायतींना आला आहे.२०१७-१८ मध्ये ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली. त्यावेळी जिल्हा स्तर आणि तालुका स्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व प्रतीकात्मक धनादेशही देण्यात आला. १ मे २०१८ रोजीच्या कार्यक्रमात मोठा गाजावाजा करीत हा पुरस्कार वाटप झाला. तेव्हापासून निवड झालेल्या स्मार्ट ग्रामपंचायतींना बक्षिसाच्या रकमेची प्रतीक्षाच करावी लागली.तालुका स्तरावर प्रथम क्रमांकावर निवड झालेल्या ३५१ ग्रामपंचायती तर जिल्हा स्तरावर ३४ ग्रामपंचायती आहेत. त्या ग्रामपंचायतींनी बक्षिसाची रक्कम म्हणून ८८ कोटी ९० लाख रुपये निधीची गरज आहे. शासनाने योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात तरतूद केली; मात्र वित्त विभागाने अर्थसंकल्पीय तरतुदीच्या केवळ ६० टक्के निधी खर्च करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ५३ कोटी ३४ लाख रुपये निधी वितरणासाठी उपलब्ध आहे. त्या निधीतून केवळ जिल्हा स्तरावर निवड झालेल्या स्मार्ट ग्रामपंचायतींना बक्षीस देण्याचे ग्रामविकास विभागाने ठरविले. राज्यातील ३४ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ४० लाख रुपये निधी वाटप होणार आहे. त्यासाठी १३ कोटी ६० लाख रुपये निधीचे वितरण करण्यात आले. अमरावती विभागाच्या जिल्ह्यांतील पाच गावांसाठी दोन कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे.निधी वितरित केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींनी निधी नावीन्यपूर्ण विकास कामांसाठी खर्च झाला आहे, याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने शासनाला सादर करण्याचेही निधी वाटपाच्या आदेशात म्हटले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत