शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election : सरपंच पदाचे आरक्षण नकोच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 11:03 IST

Gram Panchayat Election: हे सर्व प्रयोग सरपंचांच्या बाबतीतच का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देआरक्षण जाहीर झाल्यापासून सरपंच पदांसाठी इच्छुक उमेदवार कामाला लागले होते.शासनाने सरपंच पदांच्या आरक्षण साेडतीचा कार्यक्रम नव्याने राबविण्याचा निर्णय घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर सरपंच पदांची आरक्षण साेडत काढण्यासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाचा जिल्ह्यातील सरपंचांकडून विरोध होत आहे. यामुळे निवडणुकीनंतर सदस्यांचा घोडेबाजार वाढण्याची शक्यता आहे. गेल्या २५ वर्षांपासून सरपंचपदांचे आरक्षण निवडणुकीपूर्वी निश्चित केले जात असताना, अचानक निवडणूक झाल्यानंतर आरक्षण काढण्याचा सरकारने निर्णय घेतल्याने, हे सर्व प्रयोग सरपंचांच्या बाबतीतच का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीत राेजी मतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, २०२० ते २०२५ या कालावधीकरिता जिल्ह्यातील एकूण ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षणाची साेडत ८ डिसेंबर रोजी काढण्यात आली. त्यामध्ये सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

आरक्षण जाहीर झाल्यापासून सरपंच पदांसाठी इच्छुक उमेदवार कामाला लागले होते. अनेकांनी सर्वत्र जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच, शासनाने सरपंच पदांचे आरक्षण रद्द करून, ग्रामपंचायतींची निवडणूक झाल्यानंतर सरपंच पदांच्या आरक्षण साेडतीचा कार्यक्रम नव्याने राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निवडणूक झाल्यानंतर आरक्षण जाहीर होणार असल्याने सरपंचांमधून या निर्णयावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.

 

आरक्षणावर विश्वास राहणार नाही !

निवडणुकीपूर्वी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर केलेले असताना आता शासन निर्णयानुसार निवडणुकीनंतर सरपंच पदांची आरक्षण साेडत काढण्यात येणार आहे. त्यामध्ये आरक्षणात बदल झाला, तर नागरिकांचा या आरक्षणावरच विश्वास राहणार नाही. तसेच सरपंच पदांच्या निवडणुकीत घोडेबाजार वाढण्याची शक्यता जास्त आहे.

- अशाेक घाटे, माजी सरपंच, अडगाव

निर्णयावरून नागरिकांमध्ये संभ्रम

२५ वर्षांपासून ज्या नियमाने आरक्षण काढल्या जात होते, त्यामध्ये अचानक बदल करण्यात आले, यामुळे नागरिकांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविताना पॅनलला सर्वप्रथम आरक्षणानुसार सरपंच पदाचे नेतृत्व निवडावे लागते.

-रिना संजय सिरसाट, माजी सरपंच, शिर्ला

सरकारचा अजब कारभार !

सरपंचाला कधी अपत्याची अट, कधी शिक्षणाची अट, एक सरकार जनतेतून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय घेते, दुसरे सरकार त्याला रद्द करते. सरकारचा हा अजब कारभार असल्याचे मत काहींनी व्यक्त केले.

 

सरपंच परिषदेचे काय म्हणणे?

जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षण जाहीर केले आहे, एकदा आरक्षण जाहीर झाल्यानंतर, पुन्हा आरक्षण बदलले तर, गावातील वातावरणही बिघडण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मतभेद होतात. त्यामुळे सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत नकोच अशी भूमिका सरपंच परिषदेने मांडली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsarpanchसरपंच