शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Gram Panchayat Election : सरपंच पदाचे आरक्षण नकोच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 11:03 IST

Gram Panchayat Election: हे सर्व प्रयोग सरपंचांच्या बाबतीतच का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देआरक्षण जाहीर झाल्यापासून सरपंच पदांसाठी इच्छुक उमेदवार कामाला लागले होते.शासनाने सरपंच पदांच्या आरक्षण साेडतीचा कार्यक्रम नव्याने राबविण्याचा निर्णय घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर सरपंच पदांची आरक्षण साेडत काढण्यासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाचा जिल्ह्यातील सरपंचांकडून विरोध होत आहे. यामुळे निवडणुकीनंतर सदस्यांचा घोडेबाजार वाढण्याची शक्यता आहे. गेल्या २५ वर्षांपासून सरपंचपदांचे आरक्षण निवडणुकीपूर्वी निश्चित केले जात असताना, अचानक निवडणूक झाल्यानंतर आरक्षण काढण्याचा सरकारने निर्णय घेतल्याने, हे सर्व प्रयोग सरपंचांच्या बाबतीतच का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीत राेजी मतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, २०२० ते २०२५ या कालावधीकरिता जिल्ह्यातील एकूण ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षणाची साेडत ८ डिसेंबर रोजी काढण्यात आली. त्यामध्ये सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

आरक्षण जाहीर झाल्यापासून सरपंच पदांसाठी इच्छुक उमेदवार कामाला लागले होते. अनेकांनी सर्वत्र जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच, शासनाने सरपंच पदांचे आरक्षण रद्द करून, ग्रामपंचायतींची निवडणूक झाल्यानंतर सरपंच पदांच्या आरक्षण साेडतीचा कार्यक्रम नव्याने राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निवडणूक झाल्यानंतर आरक्षण जाहीर होणार असल्याने सरपंचांमधून या निर्णयावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.

 

आरक्षणावर विश्वास राहणार नाही !

निवडणुकीपूर्वी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर केलेले असताना आता शासन निर्णयानुसार निवडणुकीनंतर सरपंच पदांची आरक्षण साेडत काढण्यात येणार आहे. त्यामध्ये आरक्षणात बदल झाला, तर नागरिकांचा या आरक्षणावरच विश्वास राहणार नाही. तसेच सरपंच पदांच्या निवडणुकीत घोडेबाजार वाढण्याची शक्यता जास्त आहे.

- अशाेक घाटे, माजी सरपंच, अडगाव

निर्णयावरून नागरिकांमध्ये संभ्रम

२५ वर्षांपासून ज्या नियमाने आरक्षण काढल्या जात होते, त्यामध्ये अचानक बदल करण्यात आले, यामुळे नागरिकांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविताना पॅनलला सर्वप्रथम आरक्षणानुसार सरपंच पदाचे नेतृत्व निवडावे लागते.

-रिना संजय सिरसाट, माजी सरपंच, शिर्ला

सरकारचा अजब कारभार !

सरपंचाला कधी अपत्याची अट, कधी शिक्षणाची अट, एक सरकार जनतेतून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय घेते, दुसरे सरकार त्याला रद्द करते. सरकारचा हा अजब कारभार असल्याचे मत काहींनी व्यक्त केले.

 

सरपंच परिषदेचे काय म्हणणे?

जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षण जाहीर केले आहे, एकदा आरक्षण जाहीर झाल्यानंतर, पुन्हा आरक्षण बदलले तर, गावातील वातावरणही बिघडण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मतभेद होतात. त्यामुळे सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत नकोच अशी भूमिका सरपंच परिषदेने मांडली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsarpanchसरपंच