शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

Gram Panchayat Election : सरपंच पदाचे आरक्षण नकोच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 11:03 IST

Gram Panchayat Election: हे सर्व प्रयोग सरपंचांच्या बाबतीतच का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देआरक्षण जाहीर झाल्यापासून सरपंच पदांसाठी इच्छुक उमेदवार कामाला लागले होते.शासनाने सरपंच पदांच्या आरक्षण साेडतीचा कार्यक्रम नव्याने राबविण्याचा निर्णय घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर सरपंच पदांची आरक्षण साेडत काढण्यासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाचा जिल्ह्यातील सरपंचांकडून विरोध होत आहे. यामुळे निवडणुकीनंतर सदस्यांचा घोडेबाजार वाढण्याची शक्यता आहे. गेल्या २५ वर्षांपासून सरपंचपदांचे आरक्षण निवडणुकीपूर्वी निश्चित केले जात असताना, अचानक निवडणूक झाल्यानंतर आरक्षण काढण्याचा सरकारने निर्णय घेतल्याने, हे सर्व प्रयोग सरपंचांच्या बाबतीतच का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीत राेजी मतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, २०२० ते २०२५ या कालावधीकरिता जिल्ह्यातील एकूण ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षणाची साेडत ८ डिसेंबर रोजी काढण्यात आली. त्यामध्ये सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

आरक्षण जाहीर झाल्यापासून सरपंच पदांसाठी इच्छुक उमेदवार कामाला लागले होते. अनेकांनी सर्वत्र जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच, शासनाने सरपंच पदांचे आरक्षण रद्द करून, ग्रामपंचायतींची निवडणूक झाल्यानंतर सरपंच पदांच्या आरक्षण साेडतीचा कार्यक्रम नव्याने राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निवडणूक झाल्यानंतर आरक्षण जाहीर होणार असल्याने सरपंचांमधून या निर्णयावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.

 

आरक्षणावर विश्वास राहणार नाही !

निवडणुकीपूर्वी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर केलेले असताना आता शासन निर्णयानुसार निवडणुकीनंतर सरपंच पदांची आरक्षण साेडत काढण्यात येणार आहे. त्यामध्ये आरक्षणात बदल झाला, तर नागरिकांचा या आरक्षणावरच विश्वास राहणार नाही. तसेच सरपंच पदांच्या निवडणुकीत घोडेबाजार वाढण्याची शक्यता जास्त आहे.

- अशाेक घाटे, माजी सरपंच, अडगाव

निर्णयावरून नागरिकांमध्ये संभ्रम

२५ वर्षांपासून ज्या नियमाने आरक्षण काढल्या जात होते, त्यामध्ये अचानक बदल करण्यात आले, यामुळे नागरिकांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविताना पॅनलला सर्वप्रथम आरक्षणानुसार सरपंच पदाचे नेतृत्व निवडावे लागते.

-रिना संजय सिरसाट, माजी सरपंच, शिर्ला

सरकारचा अजब कारभार !

सरपंचाला कधी अपत्याची अट, कधी शिक्षणाची अट, एक सरकार जनतेतून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय घेते, दुसरे सरकार त्याला रद्द करते. सरकारचा हा अजब कारभार असल्याचे मत काहींनी व्यक्त केले.

 

सरपंच परिषदेचे काय म्हणणे?

जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षण जाहीर केले आहे, एकदा आरक्षण जाहीर झाल्यानंतर, पुन्हा आरक्षण बदलले तर, गावातील वातावरणही बिघडण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मतभेद होतात. त्यामुळे सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत नकोच अशी भूमिका सरपंच परिषदेने मांडली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsarpanchसरपंच