शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

Gram Panchayat Election : सरपंच पदाचे आरक्षण नकोच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 11:03 IST

Gram Panchayat Election: हे सर्व प्रयोग सरपंचांच्या बाबतीतच का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देआरक्षण जाहीर झाल्यापासून सरपंच पदांसाठी इच्छुक उमेदवार कामाला लागले होते.शासनाने सरपंच पदांच्या आरक्षण साेडतीचा कार्यक्रम नव्याने राबविण्याचा निर्णय घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर सरपंच पदांची आरक्षण साेडत काढण्यासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाचा जिल्ह्यातील सरपंचांकडून विरोध होत आहे. यामुळे निवडणुकीनंतर सदस्यांचा घोडेबाजार वाढण्याची शक्यता आहे. गेल्या २५ वर्षांपासून सरपंचपदांचे आरक्षण निवडणुकीपूर्वी निश्चित केले जात असताना, अचानक निवडणूक झाल्यानंतर आरक्षण काढण्याचा सरकारने निर्णय घेतल्याने, हे सर्व प्रयोग सरपंचांच्या बाबतीतच का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीत राेजी मतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, २०२० ते २०२५ या कालावधीकरिता जिल्ह्यातील एकूण ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षणाची साेडत ८ डिसेंबर रोजी काढण्यात आली. त्यामध्ये सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

आरक्षण जाहीर झाल्यापासून सरपंच पदांसाठी इच्छुक उमेदवार कामाला लागले होते. अनेकांनी सर्वत्र जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच, शासनाने सरपंच पदांचे आरक्षण रद्द करून, ग्रामपंचायतींची निवडणूक झाल्यानंतर सरपंच पदांच्या आरक्षण साेडतीचा कार्यक्रम नव्याने राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निवडणूक झाल्यानंतर आरक्षण जाहीर होणार असल्याने सरपंचांमधून या निर्णयावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.

 

आरक्षणावर विश्वास राहणार नाही !

निवडणुकीपूर्वी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर केलेले असताना आता शासन निर्णयानुसार निवडणुकीनंतर सरपंच पदांची आरक्षण साेडत काढण्यात येणार आहे. त्यामध्ये आरक्षणात बदल झाला, तर नागरिकांचा या आरक्षणावरच विश्वास राहणार नाही. तसेच सरपंच पदांच्या निवडणुकीत घोडेबाजार वाढण्याची शक्यता जास्त आहे.

- अशाेक घाटे, माजी सरपंच, अडगाव

निर्णयावरून नागरिकांमध्ये संभ्रम

२५ वर्षांपासून ज्या नियमाने आरक्षण काढल्या जात होते, त्यामध्ये अचानक बदल करण्यात आले, यामुळे नागरिकांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविताना पॅनलला सर्वप्रथम आरक्षणानुसार सरपंच पदाचे नेतृत्व निवडावे लागते.

-रिना संजय सिरसाट, माजी सरपंच, शिर्ला

सरकारचा अजब कारभार !

सरपंचाला कधी अपत्याची अट, कधी शिक्षणाची अट, एक सरकार जनतेतून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय घेते, दुसरे सरकार त्याला रद्द करते. सरकारचा हा अजब कारभार असल्याचे मत काहींनी व्यक्त केले.

 

सरपंच परिषदेचे काय म्हणणे?

जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षण जाहीर केले आहे, एकदा आरक्षण जाहीर झाल्यानंतर, पुन्हा आरक्षण बदलले तर, गावातील वातावरणही बिघडण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मतभेद होतात. त्यामुळे सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत नकोच अशी भूमिका सरपंच परिषदेने मांडली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsarpanchसरपंच