धान्य, फळे, भाजीपाला आता अल्पावधीतच वाळणार!
By Admin | Updated: February 18, 2017 03:24 IST2017-02-18T03:24:08+5:302017-02-18T03:24:08+5:30
डॉ. पंदेकृविने तयार केले ‘सोलर ड्रायर’ तंत्रज्ञान

धान्य, फळे, भाजीपाला आता अल्पावधीतच वाळणार!
राजरत्न सिरसाट
अकोला, दि. १७- सौर ऊर्जा वापरून धान्य, फळे तसेच भाजीपाला अल्पावधीतच वाळण्यासाठीचे तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. हे ह्यसोलर ड्रायरह्ण (सोलर शुष्कक) तंत्रज्ञान असून, वाळविताना भाजीपाला, फळांची गुणवत्ता कायम राहत असल्याने या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यात येत आहे.
देशात मुबलक सौर ऊर्जा उपलब्ध आहे. त्याचा उपयोग धान्य, फळे व भाजीपाला वाळविण्यासाठी करता येतो. सौर शुष्कक वापरल्यास पदार्थातील पोषण, तत्त्वे, चव, रंग आणि गुणवत्ता कायम राहते. तसेच कमीत, कमी वेळेत सुकवता, तर येतेच शिवाय जास्त काळ टिकवून ठेवता येत असल्याने या तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. याकरिता कृषी विद्यापीठाने सोलर शुष्ककचे प्रात्यक्षिक शेतकर्यांना दाखविण्यात येत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने अकोला येथे अर्धगोलाकार आकाराचे शुष्कक विकसित केले आहे. या सौर शुष्ककाची उत्पादन वाळविण्याची क्षमता १00 किलो एवढी आहे. यामध्ये औषधी वनस्पती, सफेद मुसळी, पानपिंपरी, हळद, मिरची, तसेच आवळा कॅन्डी, बटाटे चिप्स, हिरवा भाजीपाला इत्यादी वाळविण्यासाठी शुष्ककाचा वापर केल्यास पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत फायदेशीर आहे.
कृषी विद्यापीठात अर्ध दंडगोलाकार शुष्कक बनविण्यात आला असून, यावर पाईपचे सांगाडे लावले आहे. त्याला अल्ट्राव्हायलेट पॉलीथिलीन फिल्मने झाकली आहे. या शुष्ककामध्ये दिवसा हरितगृह परिणामामुळे आतील तापमानात वाढ होते. आतील तापमान हे वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २0डिग्री से. अधिक राहते.व दुपारी १२ ते २ या वेळेत ते ६0 ते ६५ डीग्री से. पर्यंत पोहोचते. जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट काँक्रीटचा बनवलेला आहे. त्यावर काळा रंग दिलेला आहे. काळ्य़ा रंगाच्या गुणधर्मानुसार १00 टक्के उष्णता शोषून घेतली जाते. त्यामुळे जमिनीचे तापमान वाढते. शुष्ककातील वाढलेल्या तापमानामुळे व गरम हवेच्या प्रवाहामुळे धान्य, भाजीपाला तसेच फळे लवकर वाळण्यास मदत होते. या शुष्ककातील गरम हवा व अतिनील किरणामुळे पदार्थातील आद्र्रता कमी होऊन पदार्थ वाळतात. विशेष म्हणजे यावर पावसाचा तेवढा परणिाम होत नाही. गृहोद्योग, कृषी उद्योगाकरिता या तंत्रज्ञानाचा उत्तम फायदा होणार आहे.
पारंपरिक पद्धतीत पदार्थावर धूळ बसते, पक्षी, प्राण्यांची विष्ठा पडते व वाळण्यास बराच वेळ लागतो. म्हणूनच या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यात येत आहे.
-
सोलर शुष्कक तंत्रज्ञान किफायतशीर असून, गृह, कृषी उद्योग उभारण्यासाठी फायदेशीर आहे. शेतकर्यांना हे तंत्रज्ञान बघण्यासाठी खुले आहे.
- डॉ. सुरेंद्र काळबांडे,
संशोधन अभियंता,
नवीकरणीय ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी,
डॉ. पंदेकृवि,अकोला.