शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

मूर्तिजापूरची शासकीय कार्यालये चालतात रेल्वे वेळापत्रकानुसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 16:52 IST

शासकीय कार्यालयातील बहुतेक कर्मचारी-अधिकारी अकोला, अमरावती, बडनेरा, शेगाव, चांदुर रेल्वे, येथून रेल्वे गाड्यांनी ये - जा करतात

ठळक मुद्दे रेल्वे गाड्या या कधीच वेळेवर येत नसल्याने संबंधित कर्मचारी व अधिकारी हे कार्यालयात कधीच वेळेवर पोहचत नाहीत. याच बरोबर अधिकारी सुद्धा कार्यालयीन वेळेवर पोहोचत नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचाच अंकूश राहिला नाही. कार्यालयीन कामकाजासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या गरजूंना मात्र कर्मचारी येई पर्यंत त्यांची वाट पहात बसावे लागते.

- संजय उमकमूर्तिजापूर.-शासकीय कार्यालये म्हटले की, त्यात नियमितता आली पण मूर्तिजापूरची सर्वच शासकीय कार्यालये त्याला अपवाद  आहे.मूर्तिजापूर हे शहर लोहमार्गावर असुन शासकीय कार्यालयातील बहुतेक कर्मचारी-अधिकारी अकोला, अमरावती, बडनेरा, शेगाव, चांदुर रेल्वे, येथून रेल्वे गाड्यांनी ये - जा करतात; परंतु रेल्वे गाड्या या कधीच वेळेवर येत नसल्याने संबंधित कर्मचारी व अधिकारी हे कार्यालयात कधीच वेळेवर पोहचत नाहीत. याच बरोबर अधिकारी सुद्धा कार्यालयीन वेळेवर पोहोचत नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचाच अंकूश राहिला नाही. यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या गरजूंना मात्र कर्मचारी येई पर्यंत त्यांची वाट पहात बसावे लागते. यामध्ये पंचायत समिती, तहसील,तालुका कृषी अधिकारी, पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, विज वितरण, शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषद बांधकाम विभागा, बॅंका, आदी कार्यालये येत असल्याने संबंधित कार्यालयांचे कामकाज ढेपाळलेले आहे. यामुळे आपल्या कामासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्तीचे एकादिवशी होणारे काम त्यासाठी त्याला चार-चार दिवस वाट पहावी लागते. येवढेच नव्हे तर शासकीय कामकाजाची वेळ ५- ३० ची असताना कार्यालयातील कर्मचारी संख्या ४-३० पासूनच कमी होत जाते कारण त्यांच्या परतीच्या गाडीची वेळ झालेली असते, अशा अवस्थेत शासकीय कार्यालये चालणार कसे, आणि लोकांची कामे वेळेवर कशी होणार हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

 शासनाला लाखो रुपयांचा चुना नियमाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात घरभाडे भत्ता प्रवास भत्त्याची तरतूद केलेली असते हा घरभाडे व प्रवास भत्ता त्यांच्या मुळ वेतनश्रेणी नुसार लागू होतो सदर्हू भत्ता हजारो रुपयांच्या घरात जात असल्याने महिन्यागाठी शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात ७० ते ८० कर्मचारी मुख्यालयी ये जा करतात यातुन शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे, असे असताना कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता का गोठवण्यात आला नाही हा चिंतनाचा विषय असला तरी, सामान्य जनतेला मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मुख संमतीने बिनबोभाट पणे चालू असलेल्या या प्रक्रियेला कोण आळा घालणार हाही औत्सुक्याचा विषय आहे. म्हणजेच अधिकारी आणि कर्मचारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे स्पष्ट होते. यात महिन्याला अधिकारी कर्मचारी यांचा आर्थिक देवाण- घेवाण होत असल्याची बाब समोर आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरrailwayरेल्वे