शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मूर्तिजापूरची शासकीय कार्यालये चालतात रेल्वे वेळापत्रकानुसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 16:52 IST

शासकीय कार्यालयातील बहुतेक कर्मचारी-अधिकारी अकोला, अमरावती, बडनेरा, शेगाव, चांदुर रेल्वे, येथून रेल्वे गाड्यांनी ये - जा करतात

ठळक मुद्दे रेल्वे गाड्या या कधीच वेळेवर येत नसल्याने संबंधित कर्मचारी व अधिकारी हे कार्यालयात कधीच वेळेवर पोहचत नाहीत. याच बरोबर अधिकारी सुद्धा कार्यालयीन वेळेवर पोहोचत नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचाच अंकूश राहिला नाही. कार्यालयीन कामकाजासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या गरजूंना मात्र कर्मचारी येई पर्यंत त्यांची वाट पहात बसावे लागते.

- संजय उमकमूर्तिजापूर.-शासकीय कार्यालये म्हटले की, त्यात नियमितता आली पण मूर्तिजापूरची सर्वच शासकीय कार्यालये त्याला अपवाद  आहे.मूर्तिजापूर हे शहर लोहमार्गावर असुन शासकीय कार्यालयातील बहुतेक कर्मचारी-अधिकारी अकोला, अमरावती, बडनेरा, शेगाव, चांदुर रेल्वे, येथून रेल्वे गाड्यांनी ये - जा करतात; परंतु रेल्वे गाड्या या कधीच वेळेवर येत नसल्याने संबंधित कर्मचारी व अधिकारी हे कार्यालयात कधीच वेळेवर पोहचत नाहीत. याच बरोबर अधिकारी सुद्धा कार्यालयीन वेळेवर पोहोचत नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचाच अंकूश राहिला नाही. यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या गरजूंना मात्र कर्मचारी येई पर्यंत त्यांची वाट पहात बसावे लागते. यामध्ये पंचायत समिती, तहसील,तालुका कृषी अधिकारी, पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, विज वितरण, शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषद बांधकाम विभागा, बॅंका, आदी कार्यालये येत असल्याने संबंधित कार्यालयांचे कामकाज ढेपाळलेले आहे. यामुळे आपल्या कामासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्तीचे एकादिवशी होणारे काम त्यासाठी त्याला चार-चार दिवस वाट पहावी लागते. येवढेच नव्हे तर शासकीय कामकाजाची वेळ ५- ३० ची असताना कार्यालयातील कर्मचारी संख्या ४-३० पासूनच कमी होत जाते कारण त्यांच्या परतीच्या गाडीची वेळ झालेली असते, अशा अवस्थेत शासकीय कार्यालये चालणार कसे, आणि लोकांची कामे वेळेवर कशी होणार हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

 शासनाला लाखो रुपयांचा चुना नियमाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात घरभाडे भत्ता प्रवास भत्त्याची तरतूद केलेली असते हा घरभाडे व प्रवास भत्ता त्यांच्या मुळ वेतनश्रेणी नुसार लागू होतो सदर्हू भत्ता हजारो रुपयांच्या घरात जात असल्याने महिन्यागाठी शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात ७० ते ८० कर्मचारी मुख्यालयी ये जा करतात यातुन शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे, असे असताना कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता का गोठवण्यात आला नाही हा चिंतनाचा विषय असला तरी, सामान्य जनतेला मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मुख संमतीने बिनबोभाट पणे चालू असलेल्या या प्रक्रियेला कोण आळा घालणार हाही औत्सुक्याचा विषय आहे. म्हणजेच अधिकारी आणि कर्मचारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे स्पष्ट होते. यात महिन्याला अधिकारी कर्मचारी यांचा आर्थिक देवाण- घेवाण होत असल्याची बाब समोर आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरrailwayरेल्वे