शासनाचे निर्देश; तरीही रिचार्ज शाफ्टचे घाेडे अडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:02+5:302021-07-11T04:15:02+5:30
महापालिका क्षेत्रात पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी जलपुर्नभरण माेहीम राबविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी, छतावरील पाणी ...

शासनाचे निर्देश; तरीही रिचार्ज शाफ्टचे घाेडे अडले !
महापालिका क्षेत्रात पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी जलपुर्नभरण माेहीम राबविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी, छतावरील पाणी तसेच घरगुती वापरातील सांडपाण्याचे पुनर्भरण करणे अपेक्षित असताना तसे हाेत नसल्यामुळे अनेक भागात भूगर्भातील पाणी पातळीत घसरण झाल्याचे समाेर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने संत तुकाराम चाैक परिसर, मलकापूर,काेठारी वाटिका, खडकी, जिल्हा परिषद काॅलनी, श्रद्धा काॅलनी, जठारपेठ परिसर, सातव चाैक परिसरासह विविध भागाचा समावेश असून सबमर्सिबल पंप, कूपनलिकांची भूजल पातळी कमी झाली आहे. भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशातून मे महिन्यांत मनपाने भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून शहरात ‘रिचार्ज शाफ्ट’ तयार करण्याचा निर्णय घेत तसे पत्र भूजल सर्वेक्षण विभागाला दिले हाेते.
सर्व्हे कधी करणार ?
भूजल सर्वेक्षण विभागाकडून तयार केल्या जाणाऱ्या ‘रिचार्ज शाफ्ट’साठी मनपा प्रशासनाकडून ३ काेटी रुपयांपर्यंत खर्च केला जाणार हाेता. त्यासाठी १५ व्या वित्त आयाेगातून हा निधी प्रस्तावित केला जाईल. या कामासाठी भूजल विभाग शहरात सर्व्हे करणार असल्याचे मनपाने नमूद केले हाेते. आजपर्यंत या विभागाने नेमका काेठे सर्व्हे केला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहेत.
पाठपुरावा करण्यात मनपा कुचकामी
मनपाने भूजल सर्वेक्षण विभागाला प्रस्ताव दिल्यानंतर त्या प्रस्तावाचे पुढे काय झाले, याचा पाठपुरावा करण्यात प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहे. हा प्रकार पाहता आयुक्त अराेरा यांच्या उद्देशालाच नख लावल्या जात असल्याचे चित्र आहे.