शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चार महिन्यांत ३७ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 10:30 IST

Akola News : कोरोना काळातही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे वास्तव समोर येत आहे.

अकोला : कोरोना काळात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आलेख वाढत असतानाच जानेवारी ते एप्रिलअखेर या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करीत जीवनयात्रा संपविली. त्यामुळे कोरोना काळातही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे वास्तव समोर येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गत जानेवारी महिन्याच्या अखेरपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, कोरोनामुळे मृत्यूचा आलेखही वाढतच आहे. त्यामध्ये कोरोना काळात जानेवारी ते एप्रिलअखेरपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. कोरोना काळात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यासह विविध उपाययोजना शासन व प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्येत वाढ होत असतानाच कोरोना काळात गत चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ३७ शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यानुषंगाने कोरोना काळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे.

दोन वर्षांतील जानेवारी ते एप्रिलअखेरपर्यंत

शेतकरी आत्महत्यांची अशी आहे आकडेवारी!

वर्ष             महिना             आत्महत्या

२०२० जानेवारी             १६

             फेब्रुवारी             १७

             मार्च             ०७

             एप्रिल             ०४

..............................................................

             एकूण             ४४

वर्ष            महिना             आत्महत्या

२०२१ जानेवारी             ०९

             फेब्रुवारी             १४

             मार्च             ०९

             एप्रिल             ०५

.............................................................

             एकूण             ३७

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या