शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
7
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
11
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
12
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
13
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
15
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
16
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
17
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
18
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
19
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
20
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात १८ शेतमजूरांना जेवणातून विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 14:02 IST

आलेगाव (जि. अकोला): पातूर तालुक्यातील कार्ला येथील एका शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या मजुराना जेवनातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

आलेगाव (जि. अकोला): पातूर तालुक्यातील कार्ला येथील एका शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या मजुराना जेवनातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या सर्व मजुरांवर उपचार करण्यत आले असून, त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.पातूर तालुक्यातील कार्ला शेत शिवारात कांदा मळणीचे काम सुरू आहे. यासाठी खामगाव तालुक्यातील अटाळी व पातुर तालुक्यातील तुलंगा येथील २६ मजूर काम करण्यासाठी कारला या गावांमध्ये आले होते. आज सकाळी अचानक यातील काही लोकांना मळमळ,उलट्या,पोट दुखणे,संडास असा त्रास होत होता त्यामुळे त्यांनी सकाळीच जवळच असलेल्या आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे धाव घेऊन उप्चचार घेतले. उपचार दरम्यान त्यांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र आलेगाव येथे उपचार सुरू आहे .त्यामध्ये अविनाश भोसले सुनील चव्हाण अरुण पवार शालू भोसले दिव्या चव्हाण पल्लवी चव्हाण दिलीप पवार वैजांती भोसले प्रवीण काळे खडकाळ सिंग पवार जनाबाई पवार देव चव्हाण साहिल भोसले महेश भोसले वैशाली भोसले यांचा समावेश आहे. यामध्ये काही महिला व लहान मुलांचा समावेश असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फैजान असलम यांनी सांगितले. दरम्यान बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुट्टी असूनही वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फैजान असलम हे प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होते. त्यामुळे शेतमजुरांना योग्य उपचार मिळाला.यावेळी डॉक्टरांना मदतीसाठी फार्मासिस्ट संदीप लांडगे परिचारिका इंगळे साबळे आदि कर्मचारी उपस्थित होतेअटाळी व तुलंगा येथील १८ मजूर यांना विषबाधा झाल्यामुळे त्यांना उलट्या, संडास व डोकेदुखी होती. त्यांच्यावर आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे.- डॉ. फैजान असलम, वैद्यकीय अधिकारी, आलेगाव.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी