शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

टंचाई समस्येचा गावपातळीवर पाठपुरावा करा - प्रकाश आंबेडकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 3:29 PM

जिल्हा परिषदेचे सत्ताधारी, भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे निर्देश पक्षाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या बैठकीत सोमवारी दिले.

अकोला : जिल्ह्यातील टंचाईच्या समस्येशी लढणाऱ्या गावांमध्ये कोणत्या उपाययोजना झाल्या, कोणत्या करावयाच्या आहेत, यावर गावनिहाय माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सत्ताधारी, भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे निर्देश पक्षाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या बैठकीत सोमवारी दिले. उमरी येथील विद्यालयाच्या प्रांगणात ही बैठक दुपारी पार पडली.बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट, राजेंद्र पातोडे, ज्ञानेश्वर सुलताने, शोभा शेळके, हरिदास वाघोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील टंचाई समस्येची तीव्रता मांडण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य प्रत्येक गावात जाऊन माहिती घेणार आहेत. त्यांच्यासोबत पक्षाच्या पदाधिकाºयांवरही जबाबदारी देण्यात आली आहे. गावनिहाय टंचाई आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांचा पाठपुरावाही ते करणार आहेत. त्याशिवाय, अ‍ॅड. आंबेडकर मुख्यमंत्र्यांकडे स्वत: या विषयावर उपाययोजनांची मागणी करणार आहेत. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी बैठकीत केले.- निवडणुका येत राहतील..लोकशाहीत निवडणुका येत राहतील. जय-पराजय होत राहतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नाउमेद न होता पक्षाचे कार्य सातत्याने सुरूच ठेवावे, जनसामान्यांशी नाळ जोडून ठेवावी, असा धीरही अ‍ॅड. आंबेडकर यांनी उपस्थितांना दिला. सर्वसामान्यांच्या समस्यांशी लढाई सुरूच ठेवा, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोलाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघAkola ZPअकोला जिल्हा परिषद