‘अमृत’च्या पहिल्या टप्प्यातून नवीन प्रभाग बेदखल!
By Admin | Updated: April 3, 2017 02:50 IST2017-04-03T02:50:01+5:302017-04-03T02:50:01+5:30
नवीन प्रभागात पाणीपुरवठा कधी?

‘अमृत’च्या पहिल्या टप्प्यातून नवीन प्रभाग बेदखल!
अकोला, दि. २- महापालिकेसाठी मंजूर झालेल्या ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्याचा समावेश आहे. शासनाकडून ११0 कोटी ८४ लाख रुपये मंजूर झाले असून, मनपा प्रशासनाच्या ८७ कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरीदेखील मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात होणार्या कामामध्ये नवीन प्रभागांचा समावेश नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा कधी होणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
महापालिकेसाठी केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने २५४ कोटींचा ह्यडीपीआरह्ण(प्रकल्प अहवाल) तयार केला. शासनाने पहिल्या टप्प्यात ११0 कोटी ८४ लाखांचा प्रस्ताव मंजूर केला. महान धरण ते अकोला शहरापर्यंंंतची मुख्य जलवाहिनी बदलणे, शहरातील मुख्य जुन्या जलवाहिनीच्या बदल्यात नवीन जलवाहिनी टाक णे, शहराच्या विविध भागात आठ जलकुंभांची उभारणी करणे आदींसह विविध कामांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी जारी केलेल्या ८७ कोटी ३५ लाखांच्या कामाच्या निविदेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. शहरात पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात होणार असली, तरी यामध्ये नवीन प्रभागातील कामांचा समावेश नसल्याची माहिती आहे.
हद्दवाढीनंतरही प्रभाग दुर्लक्षित का?
महापालिकेच्या हद्दवाढीची घोषणा ३0 ऑगस्ट २0१६ रोजी झाली. हद्दवाढीनुसार सामील झालेल्या मलकापूर, शिवणी, शिवर, खरप, मोठी उमरी, गुडधी, डाबकी, गजानन नगर, शिलोडा, न्यू तापडिया नगर, सोमठाणा, अकोली खु. आदी भागात पाणीपुरवठय़ाची ठोस यंत्रणा कार्यान्वित नसल्याची परिस्थिती होती. मजीप्राने तयार केलेल्या ह्यडीपीआरह्णमध्ये नवीन प्रभागांचा समावेश करण्यासाठी मनपाने पुढाकार घेण्याची गरज होती. हद्दवाढीनंतरही नवीन प्रभाग दुर्लक्षित राहिल्यामुळे मजीप्रा व महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होतात.
पाण्याचा धर्म झाला भ्रष्ट!
कधीकाळी नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्यास त्यांना मोफत पाणी उपलब्ध करून दिल्या जात होते. त्यासाठी समाजसेवी व्यक्ती तसेच सामाजिक संस्था पुढाक ार घेत. आता मात्र नागरिकांना पाणी हवे असल्यास चक्क पैशांच्या मोबदल्यात त्याची विक्री केली जाते. नवीन प्रभागांमध्येदेखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना पाण्याची खरेदी करून तहान भागविण्याची वेळ आली आहे.