शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या प्रथम झटक्यात अमरावती विभागातील ३२ तालुके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 12:45 IST

अकोला: दुष्काळ ठरविण्याच्या निकषानुसार प्रथम कळ लागू होणाऱ्या राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये अमरावती महसूल विभागातील ३२ तालुक्यांचा समावेश आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: दुष्काळ ठरविण्याच्या निकषानुसार प्रथम कळ लागू होणाऱ्या राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये अमरावती महसूल विभागातील ३२ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामध्ये अकोल्यातील अकोट, पातूर तालुके वगळण्यात आले. उर्वरित पाच तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता मध्यम किंवा गंभीर असल्यास दुसरी कळ लागू होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.चालू वर्षातील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, जलसाठे, पाणी पातळीची दृश्य स्थिती पाहता राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये प्रथम टप्प्यातील दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. दुष्काळाची प्रथम कळ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये विभागातील ३१ पैकी पाच अकोला जिल्ह्यातील आहेत. त्यामध्ये अकोला, बाळापूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी या तालुक्यांचा समावेश आहे. शासनाने आॅक्टोबर २०१७ मध्ये दुष्काळ ठरविण्याचे निकष निश्चित केले आहेत. त्या निकषानुसार तीन टप्प्यातील तपासणी, विविध घटकांच्या अहवालावरून दुष्काळ जाहीर केला जातो. प्रत्येक टप्प्याच्या माहितीनुसारच दुसरा टप्पा निश्चित केला जातो. त्यामुळे दुष्काळाचा पहिला टप्पा म्हणजे ‘प्रथम कळ’ लागू झाली तरी दुष्काळ जाहर होईल, याची कोणतीच शाश्वती नाही. अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यातील इतर घटकांसंदर्भात अहवाल जिल्हास्तरीय समिती देणार आहे. 

जिल्हास्तरीय समिती ठरविणार दुष्काळाची तीव्रता!जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सचिव म्हणून आहेत. इतर अधिकाºयांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक, महाराष्ट्र रिमोट सेंसिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर नागपूर येथील तज्ज्ञ व्यक्ती, निवासी उपजिल्हाधिकारी, निमंत्रित सदस्य जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता ठरविणार आहेत. दुष्काळ मध्यम किंवा गंभीर ठरविला जाणार आहे.

५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असल्यास दुष्काळज्या तालुक्यातील पिकांचे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा अधिक असेल, तेथेच दुष्काळाची तीव्रता गंभीर समजली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील पीक परिस्थितीचा अहवाल घेणे आवश्यक आहे.

निर्देशांकानुसार ठरेल दुष्काळ!वनस्पतीशी संबंधित निर्देशांकामध्ये पीक परिस्थितीचा विचार केला जाणार आहे. सोबतच पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक आर्द्रता निर्देशांक, भूजल पातळी निर्देशांक या सर्व घटकांची तालुकानिहाय आकडेवारी गृहीत धरून दुष्काळ किती प्रभावी आहे, याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या अहवालावरून घेतला जाणार आहे. सद्यस्थितीत पर्जन्यमानात तूट असणे या निकषावर दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू झाली आहे; मात्र तीव्र किंवा गंभीर दुष्काळ जाहीर होईलच, याची कोणतीही शाश्वती नसल्याचे या निकषावरून स्पष्ट होत आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावतीdroughtदुष्काळ