शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

आतषबाजी : सोलापूर, नागपूर, मुंबईत गुन्हे दाखल; अकोला पोलीस परिपत्रकावर अडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 13:18 IST

 अकोला: दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रचंड प्रदूषण होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने दोन तासांचा कालावधी फटाके उडविण्यासाठी दिला होता, तर या वेळेनंतर किंवा आधी फटाके उडविणाºयांवर फौजदारी कारवाईचा आदेश दिला होता; मात्र अकोला पोलिसांनी परिपत्रक न आल्याच्या कारणावरून एकही गुन्हा दाखल केला नाही.

- सचिन राऊत

 अकोला: दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रचंड प्रदूषण होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने दोन तासांचा कालावधी फटाके उडविण्यासाठी दिला होता, तर या वेळेनंतर किंवा आधी फटाके उडविणाºयांवर फौजदारी कारवाईचा आदेश दिला होता; मात्र अकोलापोलिसांनी परिपत्रक न आल्याच्या कारणावरून एकही गुन्हा दाखल केला नाही, तर मुंबई, नागपूर व सोलापूर शहरात तब्बल २०० च्यावर नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरून वेळेनंतर फटाके फोडणाºयांना अकोला पोलिसांनी अभय दिल्याची चर्चा आहे.दिवाळीच्या रात्री ८ ते १० वाजेदरम्यान फटाके उडविण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली होती, तर यावेळेच्या आधी किंवा नंतर फटाके उडविल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; मात्र पोलीस महासंचालक कार्यालयाने परिपत्रक न काढल्याने कारवाईची दिशा स्पष्ट नसल्याच्या कारणावरून अकोला पोलिसांनी नियमित वेळेनंतर फटाके उडविणाºयांवर कोणतीही कारवाई केली नाही. या उलट सोलापूर पोलीस आयुक्तांनी पहाटे आणि रात्री १० वाजेनंतर फटाके उडविणाºयांवर कारवाईचे निर्देश देताच तेथील ठोणदारांनी तब्बल १३६ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १८८, १९० आणि १९१ नुसार गुन्हे दाखल केले आहेत, तर मुंबई व नागपूरमध्येही अशाच प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; मात्र अकोल्यात दिवाळीच्या पहाटे व रात्री १० वाजेनंतर कानठळ्या बसविणाºया मोठ्या फटाक्यांची प्रचंड आतषबाजी सुरू असताना पोलीस यंत्रणा मात्र झोपेचे सोंग घेऊन असल्याचे वास्तव आहे. या कलमान्वये केली कारवाईसोलापूर, नागपूर व मुंबई पोलिसांसह राज्यातील बहुतांश शहरातील पोलिसांनी फटाके उडविणाºयांवर भारतीय दंड विधानाच्या कलम १८८, १९०, १९१ नुसार गुन्हे दाखल केले, तर अकोला पोलिसांनी मात्र एकही गुन्हा दाखल न करता वरिष्ठ स्तरावरून परिपत्रक न आल्याचे कारण समोर करून कारवाईस टाळाटाळ केली. कारवाईची अशीही तत्परतासोलापूर शहरात दिवाळीच्या पहाटे मोठ्या प्रमाणात फटाके उडविण्यात येत असल्याचे सोलापूर पोलीस आयुक्तांना कळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुखांना प्रमूखांना बोलावून फटाके उडविणाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देष दिले. यावरून सोलापूर पोलिसांनी तब्बल १३६ जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले; मात्र अकोला पोलीस माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवित असून, प्रत्यक्षात अशा प्रकारच्या कारवाईकडे सपशेल कानाडोळा करण्यात आल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrackers Banफटाके बंदीPoliceपोलिस