शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

कापसाने भरलेल्या वाहनाला आग: २० क्विंटल कापसाची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 15:40 IST

हातरुण - वाहनात भरलेल्या २० क्विंटल कापसाला अचानक आग लागल्याने वाहनासह कापसाची राखरांगोळी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या आगीमुळे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे२ लाखाचे नुकसानहातरुण येथील घटना

- संतोष गव्हाळे

हातरुण - वाहनात भरलेल्या २० क्विंटल कापसाला अचानक आग लागल्याने वाहनासह कापसाची राखरांगोळी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या आगीमुळे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हातरुण येथील शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल यांनी शेतातील कापूस बुधवारी रात्री टाटा एस एम एच ०४ - डी. एस. ३५३९ या वाहनात भरून ठेवला होता. या वाहनात २० क्विंटल कापूस होता. गुरुवारी सकाळी  या कापूस भरलेल्या वाहनाला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर निघतांना दिसून आला. या गाडीवर असलेले टायर (स्टेपनी) आगीमुळे वर उडून टिनावर पडले.त्यामुळे आवाज झाल्याने बाजूने राहणारा अजय गिरी युवकाने गाडीकडे धाव घेतली असता गाडीने पेटलेली दिसून आली. अजय गिरी या युवकांसह चार ते पाच जणांनी मोठया प्रमाणात पाणी टाकून आग विझवली. मात्र या आगीत इंजिनसह गाडी व कापूस खाक झाला. या घटनेची माहिती मिळताच हातरुण चे तलाठी दत्तात्रय काळे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या जळलेल्या गाडीचे दीड लाखाचे व शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल यांच्या कापसाचे ४० हजार असे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. या घटनास्थळाची हातरुण पोलीस चौकीचे बिट जमादार विजय चव्हाण आणि सुरेश कुंभारे यांनी पाहणी करून तपास सुरू केला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल, अनिल अग्रवाल, माजी पंचायत समिती सदस्य मंजूर शाह, गजानन नसुर्डे उपस्थित होते.

टॅग्स :Accidentअपघातfireआग