शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

अखेर भारिप-बमसं ‘वंचित’मध्ये विलीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 2:40 PM

या विलीनीकरणामुळे गत दोन दशकांपासून असलेल्या भारिप-बमसंचे अस्तित्व आता संपणार आहे.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘भारिप-बहुजन महासंघ’ या नावाने सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय दिला होता. त्याच भारिप-बमसंचे अस्तित्व अधिकृतरीत्या शुक्रवारी संपुष्टात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप-बमसं विलीन करण्यात आला असून, २० नोव्हेंबरपर्यंत प्रदेश कार्यकारिणी तर ३० नाव्हेंबरपर्यंत जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच अ‍ॅड. आंबेडकरांनी भारिप-बमसं ‘वंचित’मध्ये विलीन करणार, असे सूतोवाच केले होते; मात्र ‘वंचित’च्या जिल्हा कार्यकारिणीही त्यांनी गठित करून भारिप-बमसंचे अस्तित्व कायम ठेवले होते. विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ला मिळालेली मते ही ‘वंचित’ची ताकद वाढली असल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर ८ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप-बमसं विलीन करण्याची घोषणा त्यांनी मुंबईत केली आहे. या विलीनीकरणामुळे गत दोन दशकांपासून असलेल्या भारिप-बमसंचे अस्तित्व आता संपणार आहे.अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी ‘सामाजिक अभियांत्रिकी’च्या माध्यमातून सत्ता मिळविण्याचा यशस्वी प्रयोग अकोल्यात केला. अकोला पॅटर्न नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रयोगाचे ‘भारिप बहुजन महासंघ’ हे राजकीय नाव होते. ८० च्या दशकात या प्रयोगाची सुरुवात झाली असली तरी १९९० ते २००४ पर्यंत या प्रयोगाने अकोल्यात सुवर्णकाळ अनुभवला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे एकहाती नेतृत्व अन् दलित समाजासोबत अठरापगड जातींची बांधलेली मोट, यामुळेच अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा अशा प्रत्येक ठिकाणी त्यांना यश अनुभवता आले. अकोला जिल्हा परिषदेत दोन दशकांपासून सत्ता स्थापन करण्यात त्यांना यश आले. मखराम पवार, दशरथ भांडे, रामदास बोडखे, हरिदास भदे, बळीराम सिरस्कार असे आमदारही विधानसभेत पोहोचले; मात्र अ‍ॅड. आंबेडकर हे स्वत: १९९९ नंतर सलग लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन करून अठरापगड जातींच्या अस्मितेला फुंकर घालून धनगर, माळी, भटके अशा विविध प्रवर्गाच्या परिषदा घेऊन बहुजन मतांचा जागर एकीकडे केला, तर दुसरीकडे कोरेगाव भीमा प्रकरणात आक्रमक भूमिका घेत दलितांची मते अन् मने एकवटण्याचाही प्रयोग केला. या प्रयोगांमुळे आंबेडकरांचे राजकीय वजन वाढले होते अन् वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला. लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ने चक्क एमआयएमसारख्या आक्रमक पक्षासोबम मैत्री करून निवडणूक लढविली; मात्र एमआयएमचा एक खासदार विजय झाला अन् अ‍ॅड. आंबेडकरांच्या झोळीत केवळ मतांची टक्केवारी वाढली. ‘वंचित’ ही भाजपाची ‘बी टीम’ आहे इथपासून तर आतातरी अ‍ॅड. आंबेडकरांनी भाजपाविरोधात महाआघाडी निर्माण करून आव्हान देण्याची गरज व्यक्त होऊ लागली. ‘वंचित’च्या माध्यमातून आंबेडकरांचे उपद्रवमूल्य सिद्ध झालेच होते.त्यामुळे विधानसभेत अशी महाआघाडी निर्माण होऊन उपयुक्तमूल्य सिद्ध होणार का, अशी चर्चा रंगत असतानाच ‘वंचित’चा मित्रपक्ष असलेल्या एमआयएमनेही काडीमोड घेतला व ‘वंचित’ने एकाकी झुंज देत विधानसभा लढविली. या निवडणुकीत ‘वंचित’च्या हाती एकही जागा लागली नाही. विधानसभेतील त्यांचे अस्तित्व शून्य ठरले. ‘वंचित’ला संख्यात्मक यश मिळाले नसले तरी गुणात्मकरीत्या ‘वंचित’ने अनेक विधानसभा मतदारसंघांत दुसºया क्रमांकाची मते मिळविली आहेत. त्यामुळे आगामी राजकीय वाटचाल ‘वंचित’च्याच माध्यमातून होणार असून, आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही महत्त्वाची परीक्षा ठरणार आहे.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण